एक्स्प्लोर

समाजातील तेढ, भेदभाव दूर करणारं नवं शैक्षणिक धोरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी

समाजातील तेढ, भेदभाव दूर करणारं हे नवं शैक्षणिक धोरण आहे. नव्या भारताच्या पायाभरणीसाठी नवं शैक्षणिक धोरण उपयुक्त ठरणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील बैठकीला संबोधित केलं.

नवी दिल्ली : समाजातील तेढ, भेदभाव दूर करणारं हे नवं शैक्षणिक धोरण आहे. नव्या भारताच्या पायाभरणीसाठी नवं शैक्षणिक धोरण उपयुक्त ठरणार आहे. शिक्षण क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास उपयुक्त असं हे धोरण आहे. हे धोरणाने देशाला, देशवासियांना अधिक मजबूत करण्याचा हेतू आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भविष्याचा विचार करुनच नवं शैक्षणिक धोरण तयार केलं असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील बैठकीला संबोधित केलं. यावेळी मोदी म्हणाले की, इतका बदल कागदावर केला पण प्रत्यक्षात कसा आणणार? असंही अनेकजण म्हणत असतील. या धोरणाची अंमलबजावणी कशी केली जाणार याकडे सर्वांच लक्ष आहे. जे बदल करावे लागतील ते सर्वांनी मिळून करावे लागतील. जिथवर राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे तर मी पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. भारताला शक्तिशाली बनवण्यासाठी, विकासाची नवी उंची गाठण्यासाठी, नागरिकांना अजून सशक्त करण्यासाठी, जास्तीत जास्त संधी देण्यासाठी या धोरणात विशेष लक्ष देण्यात आलं आहे, असं ते म्हणाले. पंतप्रधान पुढे म्हणाले की,  देशभरात नव्या शिक्षण धोरणावर चर्चा होत आहे. वेगवेगळ्या विचारांचे लोक आपलं मत मांडत आहे. शिक्षण धोरणावर मंथन करत आहेत. यावर जितकी जास्त चर्चा होईल तितका शिक्षण व्यवस्थेला फायदा होणार आहे. देशातील कोणत्याही क्षेत्र, वर्गाकडून यामध्ये एकतर्फी निर्णय असल्याची टीका झालेली नाही. लोक वर्षांपासून सुरु असलेल्या शिक्षण धोरणात बदल अपेक्षित करत होते आणि तो पाहायला मिळत आहे, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, आमच्या युवकांमध्ये वेगळा विचार विकसित होण्यासाठी शिक्षणाचा हेतूही बदलण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञानाला सर्जनशीलतेची जोड देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तीन ते चार वर्ष चर्चा केल्यानंतर तसंच लाखोंच्या संख्येने आलेले सल्ले लक्षात घेऊनच राष्ट्रीय धोरण तयार करण्यात आलं आहे, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. आज शिक्षणक्षेत्रात बदल होत आहेत. बदलत्या वेळेसोबत जगदेखील बदलत असून नवे जागतिक मापदंड तयार होत आहेत. हे लक्षात घेता आपल्या शिक्षण धोरणात बदल करणं गरजेचं होतं. शालेय अभ्यासक्रमात 10+2 ऐवजी 5+3+3+4 ची रचना करणं हा त्याचाच एक भाग आहे. घरात बोलली जाणारी भाषा आणि शाळेत शिकवली जाणारी भाषा एकच असल्याने मुलांचा शिकण्याचा वेग वाढतो यामध्ये काही दुमत नाही. यामुळेच पाचवीपर्यंत शक्य झाल्यास मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिकवण्याची परवानगी दिली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. PM Modi UNCUT Speech on NEP | भविष्याचा विचार करुनच नवं शैक्षणिक धोरण : पंतप्रधान मोदी

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
Arvind Kejriwal: दिल्लीत निवडणूक घ्या, भाजपच्या 10 पेक्षा अधिक जागा आल्यास राजकारण सोडेन, अरविंद केजरीवालांचं मोदींना चॅलेंज
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, अरविंद केजरीवालांची मागणी, दिल्लीत निवडणूक घेण्याचं चॅलेंज
Satej Patil on Sugar Factory Crisis: बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला
बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला
देवाच्या कृपेने फसवणुकीपासून वाचले; अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने सांगितली आपबिती, फसवणुकीचा नवा फंडा
देवाच्या कृपेने फसवणुकीपासून वाचले; अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने सांगितली आपबिती, फसवणुकीचा नवा फंडा

व्हिडीओ

Nagpur 12 Exam : नागपूरच्या वैशाली नगरच्या सक्सेस क्लासच्या पेपरफुटी प्रकरणात सहभाग
Sunetra Pawar PC Video : बोलून झाल्यावर उठा, पीसीपूर्वी काय काय घडलं?
Rohit Pawar on Raj Thackeray : राज म्हणाले दादा असो व इतर कुणी मराठी माणसाला न्याय देऊ
Raj Thackeray on Rohit Pawar : दादांचा अपघात कसा झाला हे अजून महराष्ट्राला समजलेलं नाही
Atideb Sarkar Speech : आयडियाज ऑफ इंडियामध्ये एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक अतिदेब सरकार यांचं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
Arvind Kejriwal: दिल्लीत निवडणूक घ्या, भाजपच्या 10 पेक्षा अधिक जागा आल्यास राजकारण सोडेन, अरविंद केजरीवालांचं मोदींना चॅलेंज
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, अरविंद केजरीवालांची मागणी, दिल्लीत निवडणूक घेण्याचं चॅलेंज
Satej Patil on Sugar Factory Crisis: बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला
बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला
देवाच्या कृपेने फसवणुकीपासून वाचले; अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने सांगितली आपबिती, फसवणुकीचा नवा फंडा
देवाच्या कृपेने फसवणुकीपासून वाचले; अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने सांगितली आपबिती, फसवणुकीचा नवा फंडा
'जिथं गिरीश महाजन तिथं बिबटे कसे घुसतील? कोणाची हिंमत आहे?? त्यांनी खूप वाघ, बिबट फाडून जेरबंद केलेत' बिबट्यांवरून संकटमोचकांना चिमट्यावर चिमटे
'जिथं गिरीश महाजन तिथं बिबटे कसे घुसतील? कोणाची हिंमत आहे?? त्यांनी खूप वाघ, बिबट फाडून जेरबंद केलेत' बिबट्यांवरून संकटमोचकांना चिमट्यावर चिमटे
बिहार सरकारकडून मायक्रो फायनान्स कंपन्यांना चाप, कर्जदारांना दिलासा;  एका निर्णयानं मायक्रो फायनान्स कंपन्यांचे स्टॉक पडले
मुद्दलापेक्षा जास्त व्याज घेऊ नका, कर्जदारांना धमकावल्यास कारवाई, बिहार सरकारकडून मायक्रो फायनान्स कंपन्यांचा चाप
अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं? सरकार किंवा पोलीस स्टेशनला FIR का नकोय? सरकार संशयाची भूतं नाचवत आहे; मरीन ड्राईव्हला अधिकारी FIR लिहायला बसला आणि DCPनं थांबवला; आता राज ठाकरेंचाही थेट सवाल
अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं? सरकार किंवा पोलीस स्टेशनला FIR का नकोय? सरकार संशयाची भूतं नाचवत आहे; मरीन ड्राईव्हला अधिकारी FIR लिहायला बसला आणि DCPनं थांबवला; आता राज ठाकरेंचाही थेट सवाल
दिल्लीतही बापाचा जामीन फेटाळला, वाल्मिक कराडच्या लेकाची फेसबुक पोस्ट; म्हणाला, आता मात्र सर्वांसमोर
दिल्लीतही बापाचा जामीन फेटाळला, वाल्मिक कराडच्या लेकाची फेसबुक पोस्ट; म्हणाला, आता मात्र सर्वांसमोर
Embed widget