एक्स्प्लोर

Mumbai Crime: मुंबईत प्रियकरानेच विवाहीत प्रेयसीला संपवलं, आरोपी पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

Mumbai Crime News: मुंबईतील साकीनाका परिसरात एका महिलेची हत्या करुन आरोपी पसार झाला होता. मात्र पोलिसांनी आता आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Mumbai Crime:  मुंबईतील (Mumbai) साकीनाका परिसरात एका विवाहित महिलेची भर रस्त्यात गळा चिरुन हत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली, आरोपीने मात्र हत्या करुन घटनास्थळावरुन पळ काढला. दीपक बोरसे असे या आरोपीचे नाव आहे. आरोपीचे विवाहीत महिलेसोबत प्रेमसंबंध होते, अशी माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेमुळे सध्या साकीनाका परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध सुरु केला आणि त्याला मुंबई मधूनच अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी त्यांच्या ट्विटमधून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. 

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकीनाक्यातील खैराणी रोड येथे ही घटना घडली आहे. आरोपी हा मृत महिलेचा प्रियकर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे दोघे रिक्षातून जात असतांना काही कारणांवरुन त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर त्याने रिक्षामध्येच तिची हत्या केली आणि नंतर रिक्षातून पळ काढला. सध्या पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.  दरम्यान मृत महिला विवाहीत असून तिला एक मुलगा देखील आहे. सध्या, तिचे तिच्या पतीसोबत जुळत नसल्याने ती तिच्या माहेरी आईसोबत राहत होती. दीपक हा हत्येच्या इराद्यानेच बसला होता. त्याने त्याच्याकडील हत्याराने तिचा गळा चिरला आणि स्वतः देखील जखमी झाला. 

ट्वीटमध्ये काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत या संपूर्ण प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणात गृहमंत्र्यांनी लक्ष घालण्याची विनंती देखील त्यांनी त्यांच्या ट्विटमधून केली आहे.  त्यांनी ट्विट करत म्हटलं की, 'साकीनाका, मुंबई येथे एका महिलेचा भररस्त्यात गळा चिरून खून करुन आरोपी पसार झाला. ही अतिशय संतापजनक घटना आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगार मोकाट असून नागरीक दहशतीखाली आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून तपासयंत्रणा सक्रिय करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांना कायद्याची जरब बसणे गरजेचे आहे.' 

मुंबईत महिलांच्या हत्येचं सत्र

मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये महिलांच्या हत्येचं सत्र सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे मायानगरीतील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आता सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील एका शासकीय वसतीगृहातील मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपीने देखील ट्रेनखाली उडी मारुन जीव दिला. दरम्यान मुंबईतील मिरारोड परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पार्टनरची निघृण हत्या करण्यात करुन तिच्या शरीराचे तुकडे करुन विल्हेवाट लावण्यात आली होती.  मनोज साने असं आरोपीचं नाव असून  तर मृत महिलेचं नाव सरस्वती वैद्य असं होतं. त्यानंतर पोलिसांनी सानेला अटक देखील केली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Mumbai Crime : 'त्या' तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड, तरुणीच्या शरीरावरील सीमेन सँपलचे नमुने आरोपीच्या DNA शी जुळले

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
Embed widget