एक्स्प्लोर

मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार

सोलापुरातील तब्बल 11 एकरचा परिसर असलेले हे इंदिरा गांधी स्टेडियम भाड्याने MCA ला देण्यासाठी अंदाजे साडे तीन कोटी रुपयांचे मुंद्राक शुल्क भरणे गरजेचे आहे.

सोलापूर : शहरातील (Solapur) इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियम म्हणजे जिल्ह्यातील क्रिकेट चाहते आणि क्रीडाप्रेमीचं वैभवच म्हणता येईल. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच स्टेडियमवर रणजी सामने खेळवण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे इतिहासाच्या अनेक क्रीडा क्षणांचे साक्षीदार असलेलं हे स्टेडियम 29 वर्षांच्या करारवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला (MCA) देण्यात आलं. मात्र, नियमानुसार मुंद्राक शुल्क भरून रजिस्टर न करता केवळ 500 रुपयांच्या बॉण्डवर एमसीएला हे मैदान देण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.कारण, गेल्याच महिन्यात पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणी तब्बल 21 कोटी रुपयांचा महसूल बुडविण्यात आल्याची घटना समोर आली होती. आता, सोलापूरचं हे मैदान चर्चेत आहे. 

सोलापुरातील तब्बल 11 एकरचा परिसर असलेले हे इंदिरा गांधी स्टेडियम भाड्याने MCA ला देण्यासाठी अंदाजे साडे तीन कोटी रुपयांचे मुंद्राक शुल्क भरणे गरजेचे आहे. मात्र, MCA ने हे शुल्क माफ करण्यात यावं यासाठी महसूल मंत्र्यांना पत्र लिहलंय. अद्यापही या पत्रावर महसूल मंत्र्याकडून कोणतेही उत्तर आलेले नसताना महापालिकेने केवळ 500 रुपयांच्या बॉण्डवर करार करून स्टेडियमचा ताबा MCA कडे दिला आहे. ‘’MCA चे अध्यक्ष रोहित पवार यांना खुश करण्यासाठी महापालिकेने घाई केल्याचा आरोप भाजप नेते अनंत जाधव यांनी केलाय. तसेच, हा संपूर्ण करार रद्द करण्यात यावा अशी मागणी देखील अनंत जाधव यांनी केलीय. दरम्यान, आधीच पार्थ पवार यांच्या कंपनीला जमीन देताना मुद्रांक शुल्क बुडवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना आता, हे नवं प्रकरण चर्चेत आलं आहे. 

लवकरच प्रकिया पूर्ण करुन करारनामा- ओंबासे

सोलापूरच्या इंदिरा गांधी स्टेडियमचा हा करारनामा तात्पुरता स्वरूपाचा असून मुंद्राक शुल्काबाबतीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून अंतिम करारनामा करण्यात यावा, अन्यथा कराराची प्रक्रिया रद्द करण्यात येईल असे MCA ला कळवण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली. 

500 रुपयांच्या बॉण्डवर करार करता येत नाही

दरम्यान, महापालिका आयुक्तानी तात्पुरता स्वरूपात ताबा देण्यासाठी 500 रुपयांच्या बॉण्डवर करार केल्याच म्हटलंय. मात्र, असा कोणताच करार 500 च्या बॉण्डवर करता येतं नसून त्यासाठी विहित मुंद्राक शुल्क भरणे गरजेचे असल्याची माहिती मुंद्राक जिल्हाधिकारी अनिकेत बनसोडे यांनी दिली. या प्रकरणी मुंद्राक जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्ताना पत्र लिहीत करारपत्र आणि कागदपत्रांची मागणी देखील केल्याचे मुंद्राक जिल्हाधिकारी अनिकेत बनसोडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. 

हेही वाचा

कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील सहा वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील चार वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी कार्यरत. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पलटवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
Embed widget