एक्स्प्लोर

चित्रपटाला शोभेल अशी कथा! परिस्थितीमुळे गुन्हेगारीत आलेल्या बिहारच्या तरुणाला नागपुरात अटक

चित्रपटाला शोभेल अशी कथा असलेल्या बिहारच्या एका तरुणाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी तो गुन्हेगारीत आल्याची कबुली त्याने दिलीय.

नागपूर : वडिलांची डोळ्यादेखत झालेली हत्या, कुटुंबावर अनेक वर्षांपूर्वी झालेल्या झालेला अन्याय आणि तरीही आरोपी मोकाट. या अवस्थेत सूड घेण्यासाठी एक तरुण गुन्हेगारी जगतात उतरतो. आणि स्वतःची वेळ आल्यानंतर कुटुंबावर झालेल्या अन्यायाची परतफेड करण्यासाठी तो वडिलांच्या मारेकऱ्यांना उघड धमकावतो. असे कथानक आपण चित्रपटांमध्ये नेहमीच पाहतो. मात्र, रिल लाइफची हीच पटकथा नागपुरात रियल लाईफमध्ये घडून आल्याचे पाहायला मिळाले. फरक एवढाच की रिल लाईफमध्ये अशा अँग्री यंग मॅन अभिनेत्याचा नेहमीच विजय होतो. मात्र, नागपुरात रियल लाईफचा त्या अँग्री यंग मॅनला तुरुंगाची हवा खावी लागली आहे.

"तनवीर राका"... या फेसबुक अकाउंटवरून बिहारमधील भागलपूरच्या पोलीस अधीक्षकांना धमकी दिलेली धमकी वाचा.. "भागलपूर के एसपी को चॅलेंज.. राका को पकड के दिखा, राका वापस आ रहा है, हिसाब किताब लेने के लिए".. बॉलीवूड चित्रपटातल्या एखाद्या अँग्री यंग मॅन अभिनेत्याने अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्याला दिलेल्या फिल्मी धमकी सारखीच ही तनवीर राकाची धमकी.


चित्रपटाला शोभेल अशी कथा! परिस्थितीमुळे गुन्हेगारीत आलेल्या बिहारच्या तरुणाला नागपुरात अटक

भागलपूरमध्ये अनेक गंभीर गुन्हे नावावर असताना तनवीर राकाने 2017 मध्ये भागलपूरच्या पोलीस अधीक्षकांना फेसबुकच्या माध्यमातून ही धमकी दिली होती. त्यानंतर भागलपूरची संपूर्ण पोलीस यंत्रणा हात धुवून त्याच्या मागे लागली होती. त्यामुळे घाबरलेल्या तनवीरने नागपूरच्या मोमिनपुरा भागात शरण घेतली होती. त्यानंतर गेले साडेतीन वर्ष तनवीर नागपूरच्या मोमिनपुरा परिसरात कापड दुकानांमध्ये काम करून गुपचूप आपला उदरनिर्वाह करत राहत होता. मात्र, काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांना बिहार मधील एक कुख्यात गुन्हेगार नागपूरच्या मोमिनपुरा परिसरात लपून राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली आणि पोलीस तनवीरपर्यंत पोहोचले.

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की एका गुन्हेगाराने सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट पोलीस अधीक्षकांना उघड चॅलेंज का केले होते तर त्याचे उत्तर 18 वर्षांपूर्वीच्या एका घटनेत दडले आहे. जेव्हा तनवीर अवघ्या सहा वर्षांचा होता. तेव्हा त्याचे वडील मोहम्मद मंजूर आलम यांची एका रस्ते प्रकरणाच्या वादात गावातील काही दबंग लोकांनी हत्या केली होती. तनवीर त्या घटनेचा साक्षीदार होता. मात्र, तरीही वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली नाही. त्यामुळे तरुण झाल्यानंतर वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी तनवीर गुन्हेगारी जगतात आला. पाहता-पाहता भागलपूरमध्ये त्याने अनेक गुन्हे करत आपली दहशत निर्माण केली. काही प्रकरणांमध्ये तो तुरुंगातही गेला. 


चित्रपटाला शोभेल अशी कथा! परिस्थितीमुळे गुन्हेगारीत आलेल्या बिहारच्या तरुणाला नागपुरात अटक

तुरुंगातून सुटल्यानंतर 2017 मध्ये त्याने फेसबुकच्या माध्यमातून भागलपूरच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांना खुलं चॅलेंज केलं. आणि वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी मी भागलपूरला येत आहे, अशा आशयाची धमकीच दिली. वडिलांच्या मारेकऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मुंगेर मधून पिस्तूल आणि काडतुस खरेदी केल्याचेही तेव्हा तनवीरने त्याच्या फेसबुक अकाउंटवर जाहीर केले होते. मात्र, तेव्हा भागलपूर पोलिसांनी तनवीरची ती धमकी थेट पोलिस अधीक्षकांसाठी आहे, असं समजून संपूर्ण पोलीस यंत्रणा तनवीरच्या मागे लावून दिली होती. आणि त्यामुळेच तनवीरला भागलपूर सोडावं लागले होते. 2017 मध्ये तो नागपुरात आश्रयासाठी आला होता.

नागपूर पोलिसांच्या ताब्यात असताना तनवीरने आपली संपूर्ण कहाणी नागपूर पोलिसांसमोर सांगितली. आणि त्यानंतर डोळ्या देखत झालेली वडिलांची हत्या, कुटुंबावर झालेल्या अन्यायापायी सहा वर्षाचा एक बालक तरुण झाल्यावर गुन्हेगारी जगतात का आला आणि थेट पोलीस अधीक्षकांना चॅलेंज केल्यामुळे आता तो तुरुंगात पोहोचल्याची सर्व कहाणी समोर आली. चित्रपटातील रिल लाईफमध्ये नेहमीच न्यायाचा विजय होतो. मात्र, रियल लाईफ मधील "तनवीर" ला अठरा वर्षांपूर्वी त्याच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाबद्दल न्याय तर मिळाला नाहीच उलट पोलीस अधीक्षकांना उघड चॅलेंज केल्याप्रकरणी त्याची रवानगी आता तुरुंगात झाली आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad and Govind Pansare: गोविंद पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करा, संजय गायकवाडांच्या नावाने पोस्ट व्हायरल होताच खळबळ, नेमकं काय घडलं?
गोविंद पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करा, संजय गायकवाडांच्या नावाने पोस्ट व्हायरल होताच खळबळ, नेमकं काय घडलं?
Mumbai Watermelon Family death News: मुंबईत अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू, नळबाजारात भीतीमुळे कोणी कलिंगड विकत घेईना, पण पोलिसांना वेगळ्याच गोष्टीचा संशय
मुंबईत अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू, नळबाजारात भीतीमुळे कोणी कलिंगड विकत घेईना, पण पोलिसांना वेगळ्याच गोष्टीचा संशय
Jalgaon Crime News: क्रिकेटचा सामना संपताच दोन गट भिडले, 'तुम्ही कुठले?' वरून वादाची ठिणगी अन् तीन जण गंभीर जखमी; जळगावातील धक्कादायक घटना
क्रिकेटचा सामना संपताच दोन गट भिडले, 'तुम्ही कुठले?' वरून वादाची ठिणगी अन् तीन जण गंभीर जखमी; जळगावातील धक्कादायक घटना
Kolhapur Crime News: तरूणीचे व्हिडीओ बनवले अन्....; परतवाडा प्रकरणाची पुनरावृत्ती, सगळं मित्राला पाठवलं, फोनमध्ये 8 ते 9 तरुणींचे व्हिडीओ असल्याचा संशय, आरोपीचा मित्र फरार
तरूणीचे व्हिडीओ बनवले अन्....; परतवाडा प्रकरणाची पुनरावृत्ती, सगळं मित्राला पाठवलं, फोनमध्ये 8 ते 9 तरुणींचे व्हिडीओ असल्याचा संशय, आरोपीचा मित्र फरार

व्हिडीओ

Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report
Pune Case : पुण्यातील अंमली पदार्थावर सर्जिकल स्ट्राईक, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त Special Report
Solapur fraud : सोलापुरात अविवाहित शेतकरी तरुणाला फसवलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा! 32 कोटींच्या अघोषित उत्पन्नाची कारवाई रद्द; पुराव्याअभावी आयकर विभागाचा दावा फेटाळला, नेमकं प्रकरण काय?
Iran US Israel War Conflict: पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
पश्चिम आशियातील संघर्ष मिटणार? इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा 48 तासांत तिसरा पाकिस्तान दौरा; रशियाची भूमिकाही महत्त्वाची
Mumbai Watermelon Family death News: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
ई-केवायसी दुरुस्तीसाठी राहिले शेवटचे तीन दिवस, लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार?
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
दिग्गज अभिनेते भरत कपूर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, चित्रपटसृष्टीत शोककळा
Vidhan Parishad Election 2026 Bacchu Kadu: बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार? उदय सामंतांशी महत्त्वाची चर्चा, विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या निर्णयाची शक्यता
Mumbai Watermelon Family death News: मुंबईत अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू, नळबाजारात भीतीमुळे कोणी कलिंगड विकत घेईना, पण पोलिसांना वेगळ्याच गोष्टीचा संशय
मुंबईत अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू, नळबाजारात भीतीमुळे कोणी कलिंगड विकत घेईना, पण पोलिसांना वेगळ्याच गोष्टीचा संशय
Solapur : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोलापूरमध्ये रस्सीखेच, ‘या’ चार नावांची जोरदार चर्चा
Embed widget