एक्स्प्लोर

Retirement Planning : रिटायरमेंटनंतरच्या सुखी आयुष्यासाठी 24 टक्के भारतीय करतात गुंतवणूक; अभ्यासातून माहिती समोर

Retirement Planning : भारतीय लोक नोकरीच्या काळात विविध योजना आणि पॉलिसींमध्ये गुंतवणूक करत असताना, केवळ 24 टक्के लोकांनी त्यांच्या सेवानिवृत्त जीवनासाठी बचतीचा विचार केला आहे.

Retirement Planning : सेवानिवृत्तीच्या दरम्यान अनेक जणांचे रिटायरमेंटचे अनेक प्लॅन्स ठरलेले असतात. यामध्ये वाढती महागाई, तुमचं आर्थिक गणित यांसारख्या इतर बऱ्याच गोष्टी असतात. मात्र, अजूनही काही जणांच्या टॉप प्रायोरिटीमध्ये रिटायरमेंट प्लॅनिंग अद्यापही नाही. असे मॅक्स लाइफ इन्शुरन्स, इंडिया रिटायरमेंट इंडेक्स नुकत्याच केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे. 

भारतीय लोक नोकरीच्या काळात विविध योजना आणि पॉलिसींमध्ये गुंतवणूक करत असताना, केवळ 24 टक्के लोकांनी त्यांच्या सेवानिवृत्त जीवनासाठी बचतीचा विचार केला आहे, असे मॅक्स लाइफ इन्शुरन्स, इंडिया रिटायरमेंट इंडेक्स स्टडीच्या अलीकडील अभ्यासातून समोर आले आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये भारतातील 28 वेगवेगळ्या शहरांमध्ये 35-65 वर्षे वयोगटात आयोजित करण्यात आला होता.

या संदर्भात मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत त्रिपाठी म्हणतात, “जसं वाढतं त्यानुसार आरोग्याच्या समस्या वाढू लागतात. साथीच्या रोगामुळे तीव्र झालेल्या, तसेच अलीकडच्या काळातील आर्थिकदृष्ट्या कमी वेतन वाढ, आर्थिक अनिश्चितता आणि नोकऱ्यांचे नुकसान यांसारखे प्रमाण वाढत चालले आहे. परिणामी वैयक्तिक, घरगुती उत्पन्नावर याचा परिणाम होतो. म्हणूनच, रिटायरमेंटचे प्लॅनिंग गरजेचे आहे."

या अभ्यासात असे दिसून आले आहे की भारताचा सेवानिवृत्ती निर्देशांक अभ्यास (IRIS) 44 वर आहे, ज्यामध्ये आरोग्य आणि आर्थिक स्थिती आणि भविष्य याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 

'हा' असतो सेवानिवृत्तीसाठी बचत करण्याचा उद्देश   

  • जे लोक सेवानिवृत्तीसाठी गुंतवणूक करतात, त्यापैकी 60 टक्क्यांहून अधिक लोक आरोग्य आणि वैद्यकीय खर्चासाठी गुंतवणूक करतात.
  • 63 टक्के लोकांना सेवानिवृत्त दरम्यान वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी बचत करणे महत्त्वाचे वाटते, तर क्वचितच 8 टक्के लोकांनी भावनिक आधारासाठी गुंतवणूक केल्याचे अभ्यासात आढळून आले आहे.
  • जवळपास 47 टक्के भारतीय ‘आर्थिक गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहता कामा नये’ यासाठी गुंतवणूक करतात, तर 38 टक्के ‘सेवानिवृत्तीदरम्यान जीवनशैली राखण्याच्या’ उद्देशाने गुंतवणूक करतात.

शहरी भागांत आर्थिक तयारीचा अभाव

बहुतांश शहरांमध्ये निवृत्तीसाठी आर्थिक तयारी कमी आहे. जरी, सेवानिवृत्त जीवनातील सर्वात गंभीर पैलू म्हणून आरोग्य ओळखले गेले असले तरी, बहुतेक सर्वेक्षणकर्त्यांनी गेल्या तीन वर्षांत आरोग्य तपासणी केली नाही. 41-45 वयोगटातील लोकांमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती सर्वाधिक आहे (या वयोगटातील 50 टक्क्यांहून अधिक लोक गेल्या तीन वर्षांत तपासणीसाठी गेलेले नाहीत). असे आढळून आले. 

महत्त्वाच्या बातम्या : 

Universal Flu Vaccine : एकच लस सर्व प्रकारच्या फ्लूवर प्रभावी, शास्त्रज्ञांनी शोधली 'यूनिव्हर्सल वॅक्सीन'

महत्त्वाच्या बातम्या

Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
LPG price cut today: व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?
व्यावसायिकांना मोठा दिलासा! LPG सिलेंडर 200 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त; महाराष्ट्रातील या जिल्ह्यासह कुठे किती घटले दर?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget