एक्स्प्लोर

RBI Repo Rate : आरबीआयनं रेपो रेट घटवला, गृहकर्जाचा हप्ता कमी होणार, 25, 50 लाखांचं कर्ज असल्यास किती फायदा?

RBI Repo Rate : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आज रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटची कपात करण्याची घोषणा केली. रेपो रेट सध्या 6.25 टक्क्यांवर आला आहे.

RBI MPC Meeting Update नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण विषयक समितीच्या बैठकीनंतर पत धोरण जाहीर केलं. संजय मल्होत्रा यांनी रेपो रेट 6.50 वरुन 25 बेसिस पॉईंट कमी करुन 6.25 टक्के केलं आहे. याचा बँकिंग क्षेत्राकडून होणाऱ्या कर्ज पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. आरबीआयच्या या निर्णयानंतर बँक आणि गृहकर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था व्याज दरात कपातीबाबत घोषणा करु शकते. आरबीआयच्या रेपो रेटच्या कपातीनंतर गृह कर्ज, वाहन कर्ज, शिक्षण कर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या व्याज दरात कपात होण्याची अपेक्षा आहे. 

कर कपातीनंतर ईएमआय कमी होणार?

व्हॉईस ऑफ बँकिंगचे संस्थापक अशवनी राणा यांनी आरबीआयच्या रेपो रेटमध्ये कपाती संदर्भात भाष्य केलं. अर्थसंकल्पातील करसवलतीनंतर मध्यमवर्गाला आरबीआयकडून स्वस्त कर्जाची भेट मिळाली आहे. आरबीआयनं पाच वर्षानंतर रेपो रेट 0.25 अकांनी कमी करुन ईएमआय भरणाऱ्यांना दिलासा आहे. 

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय महामंत्री आणि दिल्ली चांदणी चौक लोकसभेचे खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी 25 बेसिस पॉईंटची कपात करण्याच्या आरबीआयच्या निर्णयाचं स्वागत केलं. यामुळं व्यापार आणि ग्राहकांना कर्ज घेण्याच्या खर्चात कमी येईल. गृह आणि  व्यवसाय कर्ज घेतल्यास त्यातून लोकांना त्यातून दिलासा मिळेल. परिणामी नागरिकांच्या क्रयशस्कतीत वाढ होईल. यामुळं बाजारात भांडवल वाढेल. व्यावसायिक गुंतवणूक वाढेल, आर्थिक घडामोडींना गती मिळेल, असं खंडेलवाल म्हणाले. 

आरबीआयच्या रेपो रेटच्या दर कपातीच्या निर्णयानं गृह कर्जाच्या काय परिणाम होऊ शकतो ते जाणून घ्या. 

 
25 लाखांचं कर्ज असल्यास किती ईएमआय द्यावा लागेल?

समजा एखाद्या व्यक्तीचं गृह कर्ज 25 लाख रुपयांचं आहे. सध्या 8.75 टक्के व्याज दरानं त्याला दरमहा 22093  रुपये ईएमआय भरावा लागतोय.  तर, रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंट कमी केल्यानं व्याज दर 8.50 टक्क्यांवर आल्यास ईएमआय म्हणून 21696 रुपये द्यावा लागेल. म्हणजेच एका ईएमआयमध्ये त्याचे 403 रुपये वाचतील. म्हणजेच एका वर्षात  4836 रुपये वाचणार आहेत.

50 लाख रुपयांचं गृह कर्ज असल्यास किती रुपये वाचणार?

जर एखाद्या व्यक्तीचं गृह कर्ज  50 लाख रुपयांचं असल्यास 9 टक्के व्याज दरानं वर्षांसाठी कर्ज घेतलं असल्यास त्याच्या कर्जाचा हप्ता 44986 रुपये होईल. रेपो रेट कपातीनंतर व्याज दर 8.75 टक्क्यांवर आल्यास त्याला ईएमआय 44186 रुपये भरावा लागेल. म्हणजेच दरमहा त्याचे 800 रुपये वाचतील.एका वर्षात ईएमआयमधून त्याचे 9600 रुपये वाचतील. 

1 कोटींचं गृहकर्ज असल्यास किती एका वर्षात किती रक्कम वाचणार?

एखाद्या व्यक्तीनं  1 कोटी रुपयांचं गृहकर्ज  8.75 टक्के दरानं 20 वर्षांसाठी काढलं असल्यास त्याला दरमहा कर्जाचा हप्ता 88371 रुपये द्यावा लागतो. मात्र, व्याज दरात कपात होऊन व्याज दर 8.50 टक्के झाल्यास ईएमआयची रक्कम 1589 रुपयांनी कमी होईल. संबंधित व्यक्तीला 86782 रुपये ईएमआय दरमहा भरावा लागेल. वार्षिक 19068 रुपये वाचतील. 

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Diesel Blending : पेट्रोलनंतर आता डिझेलचा नंबर, डिझेलमध्ये Isobutanol चं ब्लेंडिंग, इथेनॉलवरुन देशभर चर्चा सुरु असताना नितीन गडकरींनी सरकारचा प्लॅन सांगितला  
डिझेलमध्ये 15 टक्के Isobutanol चं ब्लेंडिंग होणार, नितीन गडकरींनी सरकारचा प्लॅन सांगितला
PM Modi on LPG: अमेरिका-इराण युद्धावेळी घरगुती गॅस सिलेंडरचे दर 2000 रुपयांवर पोहोचले असते, संकटातून कसा मार्ग काढला, नरेंद्र मोदींनी सविस्तर सांगितलं... 
घरगुती गॅस सिलेंडरचे दर 2000 रुपयांवर पोहोचले असते, सरकारनं कसा मार्ग काढला? मोदी म्हणाले...
Gold Rate Weekly Update : सोनं पाच दिवसात 6471 रुपयांनी महागलं, चांदी 17 हजार रुपयांनी महागली, अडीच लाखांच्या दिशेने वाटचाल
सोनं पाच दिवसात 6471 रुपयांनी महागलं, चांदी 17 हजार रुपयांनी महागली, अडीच लाखांच्या दिशेने वाटचाल

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Embed widget