एक्स्प्लोर

जर तुम्ही ITR शी संबंधित 'हे' काम केलं नसेल तर टॅक्स रिफंड विसरा; एक रुपयाही परत मिळणार नाही

Income Tax Refund: इनकम टॅक्स रिफंड फाईल केलाय, परंतु आतापर्यंत आयटीआरशी संबंधित महत्त्वाचं काम केलेलं नाही, तर आयकर विभाग तुम्हाला टॅक्स रिफंड देणार नाही.

ITR Filing: इनकम टॅक्स रिफंड (Income Tax Refund) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै होती, ज्यांनी या मुदतीपर्यंत टॅक्स रिटर्न भरलेलं नाही. ते बिलेटेड आयटीआर (ITR) फाईल करू शकतात. दरम्यान, जर तुम्ही आयकर रिटर्न भरलं असेल आणि रिटर्नची वाट पाहत असाल तर तुम्हाला एक महत्त्वाची माहिती माहिती असणं आवश्यक आहे.

आयकर विभागाकडून अशी माहिती देण्यात आली आहे की, जर तुम्ही रिटर्न भरलं असेल, पण तुम्हाला अद्याप रिफंड मिळाला नसेल, तर आयकर विभागानं तुमचा रिफंड आतापर्यंत रोखून ठेवलेला असू शकतो. 2022-23 आर्थिक वर्षाच्या  इनकम टॅक्स रिटर्नवर रिफंड मिळविण्यासाठी, तुम्हाला आयटीआर व्हेरिफिकेशन करणं अत्यंत गरजेचं आहे. 

ITR व्हेरिफिकेशन करणं गरजेचं 

तुमचा आयटीआर भरल्यानंतर 30 दिवसांच्या आत ई-व्हेरिफिकेशन करणं अनिवार्य आहे. यापूर्वी ही मुदत 120 दिवसांची होती. दरम्यान, आयकर विभागानं 1 ऑगस्ट 2022 पासून आयटीआर पडताळणीची अंतिम मुदत 30 दिवसांपर्यंत कमी केली आहे. या वेळेच्या आत तुमचं इनकम टॅक्स रिटर्न व्हेरिफिकेशन पूर्ण झालं नाहीतर, आयकर विभागाच्या वतीनं ही प्रक्रिया अपूर्णच मानली जाईल. याचाच अर्थ असा की, तुम्ही आयटीआर भरला असला तरी त्याचं व्हेरिफिकेशन पूर्ण न झाल्यामुळे तुमचं आयटीआर प्रोसेस केलं जाणार नाही.  

कोणताही टॅक्स रिफंड मिळणार नाही 

जर तुम्ही तुमचा आयटीआर दिलेल्या मुदतीत भरला नाही आणि त्याचं व्हेरिफिकेशनही केलं नाही, तर तुम्हाला कोणताही कर परतावा दिला जाणार नाही. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, आयटीआर भरून तो व्हेरिफाय करणाऱ्यांनाच टॅक्स रिफंड दिला जातो.

ITR भरल्यानंतर ऑनलाईन ई-व्हेरिफाय कसं करावं? 

इनकम टॅक्स रिटर्नची पडताळणी सहा प्रकारे करता येते. आधारशी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठवून, तुमच्या पूर्व-प्रमाणित बँक खात्याद्वारे ईव्हीसी, डीमॅट खात्याद्वारे तयार केलेलं ईव्हीसी, एटीएम किंवा नेट बँकिंगद्वारे ईव्हीसी आणि डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र पाठवून ई-व्हेरिफिकेशन करता येतं. 

तुमचा आयटीआर ई-व्हेरिफिकेशन झाला आहे की नाही? हे कसं कळेल?

व्हेरिफिकेशन दरम्यान, आयकर विभागाकडून तुम्हाला एक मेसेज पाठवला जाईल. मेसेजमध्ये ई-व्हेरिफिकेशनची माहिती दिली जाईल. त्याचबरोबर तुमचं ई-व्हेरिफिकेशन पूर्ण झालं आहे की नाही, याचीही माहिती ईमेलद्वारे दिली जाईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Income Tax Return : यंदाच्या वर्षी विक्रमी ITR दाखल, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 16 टक्के अधिक ITR चा भरणा

महत्त्वाच्या बातम्या

RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
सात वेळा अपयशी ठरला, पण हार न मानता लढला! 46 लाखाची नोकरी सोडून भारतीय लष्करात अधिकारी झाला 
सात वेळा अपयशी ठरला, पण हार न मानता लढला! 46 लाखाची नोकरी सोडून भारतीय लष्करात अधिकारी झाला 
1 कोटी रुपयांचं मालक व्हायचंय? कुठे, कधी आणि कशी गुंतवणूक करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
1 कोटी रुपयांचं मालक व्हायचंय? कुठे, कधी आणि कशी गुंतवणूक करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
50 कोटी रुपयांची कंपनी विकणार, संन्यास घेऊन जंगलात राहणार, बड्या व्यवसायिकानं घेतला मोठा निर्णय
50 कोटी रुपयांची कंपनी विकणार, संन्यास घेऊन जंगलात राहणार, बड्या व्यवसायिकानं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget