एक्स्प्लोर

ICICI बँकेच्या ग्राहकांचा डेटा लीक? तब्बल 17 हजार क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्याचा निर्णय; सामान्यांवर काय परिणाम?

आयसीआयसीआय या बँकेने सध्या मोठा निर्णय घेतला आहे. या बँकने एकूण सतरा हजार क्रेडिट कार्ड ब्लॉक केले आहेत.

मुंबई : तुम्ही क्रेडिट कार्ड (Credi Card) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. कारण आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) तब्बल 17 हजार क्रेडिट कार्ड ब्लॉक केले आहेत. नव्या ग्राहकांना जारी केलेल्या क्रेडिट कार्डची माहिती जुन्या ग्राहकांशी जोडली गेली. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. या चुकीमुळे बँकेच्या ग्राहकांना आर्थिक नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई देऊ, असे आयसीआयसीआय बँकेने म्हटले आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार तांत्रिक चूक झाली असली तरी यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान झाल्याचे प्रकरण समोर आलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार बँकेच्या नव्या ग्राहकांच्या क्रेडिट कार्डचा नंबर जुन्या ग्राहकांच्या क्रेडिट कार्डशी जोडला गेला होता.  ज्यामुळे बँकेच्या अॅपवर जुन्या ग्राहकांना नव्या ग्राहकांची संपूर्ण माहिती दिसू लागली. 

बँकेने नेमकं काय सांगितलं?

आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना बुधवारी संध्याकाळापासून या अडचणीचा सामना करावा लागत होता. याची चर्चा समाजमाध्यमांवरही चालू होती. त्यानंतर बँकेने झालेल्या प्रकारावर स्पष्टीकरण दिलंय. चुकीच्या पद्धतीने मॅपिंग झाल्यामुळे जुन्या ग्राहकांना नव्या ग्राहकांची माहिती दिसत होती, असं बँकेने म्हटलंय. बँकेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आमच्या एकूण ग्राहकांपैकी फक्त 0.1 टक्के ग्राहकांनाच अशी अडचण आली आहे. बँकेने नव्या ग्राहकांचे क्रेडिट कार्ड ब्लॉक केले असून त्यांना आता नवे क्रेडिट कार्ड दिले जाणार आहेत. झालेल्या चुकीमुळे कोणीही माहितीचा दुरुपयोग केलेला नाही. तसे प्रकरण आमच्या समोर आलेले नाही. तरी कोणाला आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची भरपाई करू, असेही बँकेने म्हटले आहे.  

महिंद्रा बँकेवर  आरबीआयची कारवाई

दरम्यान, जुन्या ग्राहकांना नव्या ग्राहकांची सर्व माहिती दिसली असली तरी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे. कारण क्रेडिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार करायचा असल्यास, ग्राहकांना ओटीपी विचारला जातो. नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महिंद्रा बँकेवर कठोर कारवाई केली आहे. आयटी नियमांचे उल्लंघन न केल्यामुळे या बँकेला ऑनलाईन पद्धतीने नवे ग्राहक जोडण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच या बँकेला नव्याने क्रेडिट कार्ड जारी करण्यासही मनाई करण्यात आली आहे. या कारवाईच्या एक दिवस अगोदर आयसीआयसीआय बँकेतील ही तांत्रिक बिघाड समोर आली होती. 

हेही वाचा :

SBI चा शेअर भलताच खातोय भाव, तुम्हीही होऊ शकता मालामाल! जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?

30 हजार रुपये गुंतवा अन् व्हा 5 कोटींचे मालक, जाणून घ्या करोडपती बनवणारा SIP चा 'हा' फॉर्म्यूला!

मतदान करा, सवलत मिळवा! मतदारासांठी फ्लाइट ते जेवणापर्यंत खास सूट, सविस्तर माहिती एका क्लिकवर 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुलांचं शिक्षण आणि लग्नाची चिंता संपवा! LIC च्या 'या' योजनांचा लाभ घ्या, मजबूत निधी उभारा, जाणून घ्या सविस्तर माहिती
मुलांचं शिक्षण आणि लग्नाची चिंता संपवा! LIC च्या 'या' योजनांचा लाभ घ्या, मजबूत निधी उभारा, जाणून घ्या सविस्तर माहिती
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Gold Rate : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, सोन्याचे दर उच्चांकावरुन 26778 रुपयांनी घसरले, चांदी किती स्वस्त?
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी, सोन्याचे दर उच्चांकावरुन 26778 रुपयांनी घसरले, चांदी किती स्वस्त?
जगातील सर्वात मोठी कंपनी घेणार मोठा निर्णय, अनेक कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ, नेमकं कारण काय?
जगातील सर्वात मोठी कंपनी घेणार मोठा निर्णय, अनेक कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
Embed widget