एक्स्प्लोर

मोठी बातमी! खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 14 पिकांच्या हमीभावात वाढ

केंद्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत खरीप हंगामासाठी एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे.

मुंबई : केंद्र सरकारने नुकतेच पीएम शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Yojana) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 17 वा हफ्ता वर्ग केला आहे. यो योजनेअंतर्गत साधारण 9.6 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये पाठवण्यात आले आहेत. असे असतानाच आता खरीप हंगामातील एकूण 14 पिकांच्या किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभावात वाढ केली आहे. या निर्णयामुळे या वर्षी शेतकऱ्यांना पिकाच्या विक्रीनंतर चांगला आर्थिक मोबदला मिळण्याची शक्यता आहे.

एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ 

केंद्र सरकारने धान, कपाशी अशा महत्त्वाच्या पिकांसह एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ केली आहे. बुधवारी (19 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत हमीभाव वाढवण्यावर चर्चा झाली. त्यानंतर याच बैठकीत हमीभावासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एकूण 14 पिकांच्या हमीभावात वाढ केल्याची माहिती दिली.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला निर्णय

अश्विनी वैष्णव म्हणाले की, पिकाच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या दीड पट हमीभाव देण्याचा निर्णय केंद्र सरकारने 2018 साली घेतला होता. हाच नियम लक्षात घेऊन केंद्र सरकारने बुधवारी नवे हमीभाव ठरवले आहेत, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. केंद्र सरकारने कपाशीपासून ते धान या पिकापर्यंत एकूण 14 महत्त्वाच्या पिकांचा हमीभाव वाढवला आहे. धान या पीकाचे हमीभाव 2300 रुपये प्रति क्विंटल ठरवण्यात आला आहे. हा भाव गेल्या वर्षांच्या तुलनेत 117 रुपयांनी जास्त आहे. 2013-14 मध्ये धान या पिकाचा हमीभाव 1310 रुपये प्रति क्विंटल होता.

खालील पिकांचा हमीभाव वाढवा, नवा दर काय? 

ज्वारी- 3,371 रुपये प्रति क्विंटल

नाचणी- 2,490 रुपये प्रति क्विंटल

बाजरी- 2,625 रुपये प्रति क्विंटल

मक्का- 2,225 रुपये प्रति क्विंटल

मूग- 8,682 रुपये प्रति क्विंटल

तूर- 7,550 रुपये प्रति क्विंटल

उडीद- 7,400 रुपये प्रति क्विंटल

तीळ- 9,267 रुपये प्रति क्विंटल

भुईमूग- 6,783 रुपये प्रति क्विंटल

रेपीसीड- 8,717 रुपये प्रति क्विंटल

सूर्यफूल- 7,280 रुपये प्रति क्विंटल

सोयाबीन- 4,892 रुपये प्रति क्विंटल

दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा :

आयटीआर नेमका कोणी भरला पाहिजे? नियम काय सांगतो? वाचा सविस्तर..

प्रत्येकाकडे 'हा' एक विमा असायलाच हवा, मृत्यूनंतर मुलं, जोडीदाराचा आर्थिक प्रश्न मिटून जाईल!

आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याच्या मागणीला जोर, लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार?

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rates:युद्धाच्या अनिश्चितेनं सोने चांदीला उतरती कळा! सोनं 3 हजारांनी स्वस्त, चांदीच्या भावातही मोठी घसरण; आजचे दर किती ?
युद्धाच्या अनिश्चितेनं सोने चांदीला उतरती कळा! सोनं 3 हजारांनी स्वस्त, चांदीच्या भावातही मोठी घसरण; आजचे दर किती ?
Ashok Kharat : अशोक खरातच्या गुहेत 'भोंदूगिरी'चं अजब साहित्य! 22 रुद्राक्षांचा डबा, हिरव्या द्रव्याची बाटली अन् बरंच काही...; खरातच्या कार्यालयातील जप्तीने पोलीसही चक्रावले
अशोक खरातच्या गुहेत 'भोंदूगिरी'चं अजब साहित्य! 22 रुद्राक्षांचा डबा, हिरव्या द्रव्याची बाटली अन् बरंच काही...; खरातच्या कार्यालयातील जप्तीने पोलीसही चक्रावले
7 मिनिटांची विक्रमी बोली अन् SOLD! 167 कोटींचा इतिहास रचला; राजा रवी वर्मांच्या यशोदा-कृष्ण’ पेंटिंगने मोडले सर्व रेकॉर्ड
7 मिनिटांची विक्रमी बोली अन् SOLD! 167 कोटींचा इतिहास रचला; राजा रवी वर्मांच्या यशोदा-कृष्ण’ पेंटिंगने मोडले सर्व रेकॉर्ड
Gold Silver Price Today: युद्धाच्या छायेत सोन्याची झळाळी फिकी, सोने तब्बल 3200 रुपयांनी स्वस्त; चांदीच्या भावातही 11,900 रुपयांची घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर
युद्धाच्या छायेत सोन्याची झळाळी फिकी, सोने तब्बल 3200 रुपयांनी स्वस्त; चांदीच्या भावातही 11,900 रुपयांची घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

व्हिडीओ

Solapur Anjangaon : अंजनगावातील छ. शिवरायांच्या पुतळ्याचा वादावर तोडगा कसा निघाला?
Ashok Kharat Nashik : सुशिक्षित महिला भोंदू बाबांच्या जाळ्यात का अडकतात? पिडीत महिलेचा थरारक खुलासा!
Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant: शिवसेना 2029 च्या निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी करत आहात का? उदय सामंत काय म्हणाले?
शिवसेना 2029 च्या निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी करत आहात का? उदय सामंत काय म्हणाले?
Artemis 2: तब्बल 1.8 लाख किमी अंतरावरून पृथ्वी कशी दिसते? आर्टेमिस-2 मोहिमेतील अंतराळवीरांनी 4 फोटो अद्भूत काढले; तब्बल 54 वर्षांनी मानव चांदोमामाजवळ!
तब्बल 1.8 लाख किमी अंतरावरून पृथ्वी कशी दिसते? आर्टेमिस-2 मोहिमेतील अंतराळवीरांनी 4 फोटो अद्भूत काढले; तब्बल 54 वर्षांनी मानव चांदोमामाजवळ!
अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली नाही, थेट बडतर्फ करणार; महसूलमंत्र्यांचा इशारा
अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली नाही, थेट बडतर्फ करणार; महसूलमंत्र्यांचा इशारा
पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, वंचितकडून 'राहुरी' विधानसभेसाठी घोषणा, अनिल जाधवांना उमेदवारी
पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच, वंचितकडून 'राहुरी' विधानसभेसाठी घोषणा, अनिल जाधवांना उमेदवारी
अंजली दमानिया रॉ एजंट आहेत का? संजय राऊतांचा सवाल; अशोक खरात सीडीआरप्रकरणावरुन शिंदेंना चिमटा
अंजली दमानिया रॉ एजंट आहेत का? संजय राऊतांचा सवाल; अशोक खरात सीडीआरप्रकरणावरुन शिंदेंना चिमटा
Satara Jilha Parishad: 'गेटपास घेऊन आलो तरी मतदानाला जाऊ देईनात' सातारच्या झेडपी सभापती निवडीतही वाद; शिंदेसेनेच्या टोकाच्या विरोधानंतरही भाजपनं आणखी सदस्य फोडला
'गेटपास घेऊन आलो तरी मतदानाला जाऊ देईनात' सातारच्या झेडपी सभापती निवडीतही वाद; शिंदेसेनेच्या टोकाच्या विरोधानंतरही भाजपनं आणखी सदस्य फोडला
Sushma Andhare: अंजली दमानियांनी बाहेर काढलेल्या खरातच्या सीडीआरमध्ये भाजपचा एकही माणूस कसा नाही? काहीतरी गडबड वाटते: सुषमा अंधारे
दमानियांनी बाहेर काढलेल्या खरातच्या सीडीआरमध्ये भाजपचा एकही माणूस कसा नाही? काहीतरी गडबड वाटते: सुषमा अंधारे
Manoj Jarange on Anjangaon Statue Controversy: वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभारू नका, आपल्या राजाने जगासाठी खूप केलंय; अंजनगावातील प्रकरणावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले
वाद होतील अशा ठिकाणी पुतळे उभारू नका, आपल्या राजाने जगासाठी खूप केलंय; अंजनगावातील प्रकरणावर मनोज जरांगे स्पष्टच बोलले
Embed widget