एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२६

(Source: ECI/ABP News)

Budget 2020 | स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्प सादर केलाय. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. हा अर्थसंकल्प केवळ वास्तवाचे भान नसणारा अर्थसंकल्प असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

मुंबई : आजचा अर्थसंकल्प हा वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. आय.डी.बी.आय आणि एलआयसीमधील आपली भागीदारी विकण्याचा घेतलेला निर्णय, रेल्वेचे खासगीकरण यासारखे निर्णय देशाच्या खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचे दर्शन घडवत असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे? केंद्र सरकाने 10 टक्के विकास दर गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले असताना प्रत्यक्षात हा विकासदर चालू वर्षी पाच टक्के आणि 2020-21 मध्ये सहा ते 6.5 टक्के राहणार असल्याचा अंदाज केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालाने व्यक्त केलाय. गेल्या काही वर्षातील हा सर्वात निचांकी विकास दर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाची पुर्तता करण्याची क्षमता या विकासदरात नाही. यासाठी पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षातील तरतूद तोकडी आहे. वस्तू आणि सेवा कराने देशातील लघु-मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांना दिलासा दिला, घरगुती खर्च 4 टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलाय. मात्र, ही वस्तुस्थिती नाही. वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे लघु-सुक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्र प्रचंड अडचणीत आले. वाढत्या महागाईमुळे लोकांची क्रय शक्ती कमी झाली, वस्तुंना मागणी नसल्याने लघु उद्योग अडचणीत आले, कामगार अडचणीत आला, हे दूर करण्यासाठी रोजगार केंद्रीत उद्योगांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज होती तशी पाऊले या अर्थसंकल्पातून पडलेली दिसत नाहीत. रोजगार देण्याचा कोणताही ठोस मार्ग नाही -  मागील काही वर्षात केंद्र सरकारने स्टार्टअप, स्टॅण्डअप आणि मेक इन इंडिया सारख्या योजना राबविल्या. उद्योगस्नेही वातावरण निर्माण झाल्याचे, लालफितीचा कारभार बंद झाल्याचे वारंवार सांगितले. या अर्थसंकल्पात केंद्र शासनाने हाच संकल्प पुन्हा नव्याने केलेला दिसतो. पण त्यासाठी हात राखून निधी दिला आहे. स्कील इंडियासाठी केलेली तरतूद अपूरी आहे. 2030 मध्ये भारत हा सर्वात युवा देश होणार असून या युवा शक्तीच्या हाताला रोजगार देण्याचा कोणताही ठोस मार्ग या अर्थसंकल्पातून विकसित होताना दिसत नाही. पर्यटन क्षेत्र ज्यातून मोठ्या रोजगार संधी निर्माण होतात, त्यासाठी अत्यंत कमी तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्याला केवळ स्वप्न - शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा जुना मानस अर्थसंकल्पात नव्याने मांडण्यात आला. अन्नदात्याला उर्जा दाता करण्याचे स्वप्न दाखवले, 15 लाख शेतकऱ्यांचे कृषी पंप सोलर वर आणण्याचा मनोदय व्यक्त केला, कार्बन उत्सर्जन कमी करणारे थर्मल पॉवर बंद करणार असल्याचे सांगितले. पण नेमक्या या गोष्टी कधी पुर्णत्वाला जाणार, थर्मल पॉवर बंद केल्याने निर्माण होणारी वीजेची तूट कशी भरून काढणार याची स्पष्टता होताना दिसत नाही. महाराष्ट्रावर अन्याय - या अर्थसंकल्पाने देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर पुर्ण अन्याय केला आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाला, मेट्रोला अपेक्षित असलेले अर्थबळ या अर्थसंकल्पातून दिले गेल्याचे दिसून येत नाही. उपनगरीय सेवा ही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे, तिचा आणि प्रस्तावित रेल्वे लाईनच्या विकासाचा कुठलाही उल्लेख अर्थसंकल्पात नाही. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या जुन्याच उल्लेखांशिवाय या अर्थसंकल्पाने राज्यातील रेल्वे विकासाला कोणतीही गती दिलेली दिसत नाही. मुंबईकडे पूर्ण दुर्लक्ष - देशात पाच हिस्टॉरिकल साईटचा 'आयकॉनिक साईट' म्हणून पुनर्विकास करण्याचा संकल्प अर्थमंत्र्यांनी केला आहे, त्यात सांस्कृतिकदृष्टीने संपन्न असलेल्या महाराष्ट्राच्या कोणत्याही साईटचा उल्लेख नाही. महाराष्ट्राबाबतचा हा दुजाभाव ठळकपणे या अर्थसंकल्पातून दिसून आला आहे. गुजरात मधील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राला अधिक बळकटी देताना मुंबईसारख्या देशाच्या विकासात सर्वाधिक योगदान देणाऱ्या शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचेही दिसून येते. याची खंत मुंबईकर आणि महाराष्ट्राला नेहमी राहील असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अर्थसंकल्पावरील प्रतिक्रियेत म्हटले आहे. #UnionBudget2020 | अर्थसंकल्प 2020च्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालातील ठळक मुद्दे
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Banerjee React On West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल गमावलं, भाजपने इतिहास रचला; ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, सूर्यास्तानंतर...
पश्चिम बंगाल गमावलं, भाजपने इतिहास रचला; ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
इकडं थलपती विजय तमिळ राजकारणात रिअल हिरो होताच तिकडं चर्चित गर्लफ्रेंड त्रिशा सकाळीच कुठं जाऊन पोहोचली? योगायोगाने आजच विजयने 'बर्थडे गिफ्ट' दिल्याची सुद्धा चर्चा!
इकडं थलपती विजय तमिळ राजकारणात रिअल हिरो होताच तिकडं चर्चित गर्लफ्रेंड त्रिशा सकाळीच कुठं जाऊन पोहोचली? योगायोगाने आजच विजयने 'बर्थडे गिफ्ट' दिल्याची सुद्धा चर्चा!
प.बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय; लाडक्या बहि‍णींना अश्रू अनावर; कोलकाता प्रदेश कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल
प.बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय; लाडक्या बहि‍णींना अश्रू अनावर; कोलकाता प्रदेश कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल
Ashok Kharat and Rupali Chakankar: प्रॉक्सी अकाऊंट्स आणि कोटींची उलाढाल..., रुपाली चाकणकरांची बहीण ईडी कार्यालयात हजर; अशोक खरातबाबत काय बोलणार?
प्रॉक्सी अकाऊंट्स आणि कोटींची उलाढाल..., रुपाली चाकणकरांची बहीण ईडी कार्यालयात हजर; अशोक खरातबाबत काय बोलणार?

व्हिडीओ

Jay Pawar at Baramati : जय पवार बारामतीत मतमोजणी केंद्रावर दाखल, सुनेत्रा पवारांच्या निकालाकडे लक्ष
Amit thackeray on Pune Nasarapur Girl Case : नसरापूर घटनेवरुन अमित ठाकरेंचा संताप
Devendra Fadnavis on Nasrapur Case : काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते
Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा
Pune Nasarapur Case Special Report : नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय, शिक्षा कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Banerjee React On West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल गमावलं, भाजपने इतिहास रचला; ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, सूर्यास्तानंतर...
पश्चिम बंगाल गमावलं, भाजपने इतिहास रचला; ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
इकडं थलपती विजय तमिळ राजकारणात रिअल हिरो होताच तिकडं चर्चित गर्लफ्रेंड त्रिशा सकाळीच कुठं जाऊन पोहोचली? योगायोगाने आजच विजयने 'बर्थडे गिफ्ट' दिल्याची सुद्धा चर्चा!
इकडं थलपती विजय तमिळ राजकारणात रिअल हिरो होताच तिकडं चर्चित गर्लफ्रेंड त्रिशा सकाळीच कुठं जाऊन पोहोचली? योगायोगाने आजच विजयने 'बर्थडे गिफ्ट' दिल्याची सुद्धा चर्चा!
प.बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय; लाडक्या बहि‍णींना अश्रू अनावर; कोलकाता प्रदेश कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल
प.बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय; लाडक्या बहि‍णींना अश्रू अनावर; कोलकाता प्रदेश कार्यालयातील व्हिडिओ व्हायरल
Ashok Kharat and Rupali Chakankar: प्रॉक्सी अकाऊंट्स आणि कोटींची उलाढाल..., रुपाली चाकणकरांची बहीण ईडी कार्यालयात हजर; अशोक खरातबाबत काय बोलणार?
प्रॉक्सी अकाऊंट्स आणि कोटींची उलाढाल..., रुपाली चाकणकरांची बहीण ईडी कार्यालयात हजर; अशोक खरातबाबत काय बोलणार?
मोठी बातमी! अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी, मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय; जमीन भूसंपादनाचंही ठरलं
मोठी बातमी! अखेर पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी, मंत्रिमंडळ शिखर बैठकीत निर्णय; जमीन भूसंपादनाचंही ठरलं
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवार आघाडीवर, मालद्यातही भाजपची लाट
पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवार आघाडीवर, मालद्यातही भाजपची लाट
BJP Assembly Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव, केरळात डाव्यांचा शेवटचा किल्लाही पडला, देशातील किती राज्यात आता भाजपची सत्ता
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव, केरळात डाव्यांचा शेवटचा किल्लाही पडला, देशातील किती राज्यात आता भाजपची सत्ता
Paducherry election results: पद्दुचेरीमध्येही कमळच खुललं; नरेंद्र मोदींनी घेतली होती सभा, सर्वात लहान राज्य, विधानसभेत मोठी आघाडी
पद्दुचेरीमध्येही कमळच खुललं; नरेंद्र मोदींनी घेतली होती सभा, सर्वात लहान राज्य, विधानसभेत मोठी आघाडी
Embed widget