एक्स्प्लोर

Budget 2020 | शेतकऱ्यांसाठी 16 सूत्री योजना, शेतकऱ्यांच्या कर्जासाठी 15 लाख कोटींची तरतूद

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं, यावर एक नजर टाकूयात.

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2020-2021 चा अर्थसंकल्प आज सादर केला. देशातील शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं लक्ष्य केंद्र सरकारचं असल्याचं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. शेतकऱ्यांसाठी नव्या बाजारांची निर्मिती करण्याची गरज आहे, जेणेकरून त्यांचं उत्पन्न वाढेल. शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 16 सूत्री योजनेची घोषणा केली.

  • कृषी जलसंधारण क्षेत्रासाठी 1.2 लाख कोटींची तरतूद, तर देशातील शेतकऱ्यांना 15 लाख कोटी रुपयांची कर्ज दिलं जाणार.
  • अॅग्रीकल्चर लँड लिजनिंग अॅक्ट 2016, प्रोड्युस लाईफ स्टॉक अॅक्ट 2017, सर्व्हिस फॅसिलिटेशन 2018 अॅक्ट राज्य सरकारांमध्ये लागू करणार.
  • पाणीटंचाईची समस्या लक्षात घेत 100 जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी मोठी योजना राबवली जाणार. जेणेकरुन शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवणार नाही.
  • पंतप्रधान कुसुम योजनद्वारे शेतकऱ्यांना सोलर पंपाने जोडलं जाणार. 20 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. याशिवाय 15 लाख शेतकऱ्यांच्या ग्रीड पंपांना सोलरने जोडलं जाणार आहे.
  • जमिनीची सुपीकता यावर लक्ष केंद्रीत केलं जाईल आणि त्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी केला जाईल. रासायनिक खतांच्या संतुलित वापराविषयी माहिती दिली जाईल.
  • देशातील गोदाम, कोल्ड स्टोरेजला नाबार्ड आपल्या नियंत्रणाखाली घेईल आणि नवीन मार्गाने विकसित केले जाईल. देशात आणखी गोदामे आणि कोल्ड स्टोरेज बांधले जातील. त्यासाठी पीपीपी मॉडेलचा अवलंब केला जाईल.
  • महिला शेतकऱ्यांसाठी धन्य लक्ष्मी योजनेची घोषणा करण्यात आली. त्याअंतर्गत महिलांना प्रामुख्याने बियाणे संबंधित योजनांमध्ये जोडले जाईल.
  • दूध, मांस आणि मासे अशा नाशवंत खाद्यपदार्थांना खराब होण्यापासून रोखण्यासाठी वातानुकूलित 'किसान रेल' चालवण्यात येतील.
  • कृषी उडाण योजना सुरू केली जाईल. ही योजना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय मार्गावर सुरु केली जाईल.
  • बागायती क्षेत्र सुधारण्यासाठी भर दिला जाणार आहे. बागायती शेतकऱ्यांसाठी जिल्हास्तरावर नवीन योजना सुरू केली जाईल. बागायती क्षेत्राचं सध्या 311 दशलक्ष मेट्रिक टन उत्पादन आहे.
  • एकात्मिक शेती प्रणाली मधमाश्या पालणावर भर दिला जाईल.
  • किसान क्रेडिट कार्ड योजना 2021 पर्यंत वाढवण्यात येईल.
  • दुधाचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी सरकार एक योजना चालवणार आहे. 2025 पर्यंत दुधाचे उत्पादन (108 दशलक्ष मेट्रिक टन) दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे.
  • ब्लू इकॉनॉमीच्या माध्यमातून मत्स्यपालनास प्रोत्साहन दिले जाईल. फिश प्रोसेसिंगला प्रोत्साहन दिलं जाईल.
  • तरुण आणि मत्स्यपालनाच्या विस्तारावरही काम केलं जाईल. सागर मित्र अंतर्गत 500 मत्स्य उत्पादक उत्पादकांची संघटना तयार केली जाईल.
  • दीन दयाळ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत वाढवली जाईल. झीरो अर्थसंकल्पातही नैसर्गिक शेती बळकट करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जाईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget