एक्स्प्लोर

ADB on India GDP : दक्षिण आशियाई देशांचा विकास मंदावला, भारतालाही फटका: आशियाई विकास बँक

ADB on India GDP : आशियाई देशांचा आर्थिक विकास मंदावणार असून भारतालाही त्याचा फटका बसणार असल्याचे आशियाई विकास बँकेने म्हटले आहे.

ADB on India GDP : आशियाई देशांच्या विकासाची गती मंदावणार असल्याचा अंदाज आशियाई विकास बँकेने (The Asian Development Bank ) व्यक्त केला आहे.  भारताचा जीडीपी 2022 मध्ये 7.2 टक्के राहणार (India GDP Forecast) असून वर्ष 2023 मध्ये 7.8 टक्के राहण्याचा अंदाज  आशियाई विकास बॅंकेने वर्तवला आहे. भारतासह अनेक देशांचा जीडीपी घसरणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. त्याशिवाय, महागाईदेखील वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

आशियाई विकास बँकेने भारताच्या विकास दरात घट केली आहे.  एप्रिल 2022 या वर्षात सालात भारताचा जीडीपी 7.5 टक्के,  तर वर्ष 2023 साठी आठ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दक्षिण आशियाई देशांच्या विकास दरात मोठी घसरण होण्याचा अंदाज आशियाई विकास बँकेने वर्तवला आहे.

दक्षिण आशियातील महत्त्वांच्या देशांपैकी असलेले श्रीलंका आणि पाकिस्तानमधील आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. श्रीलंकेत मोठं आर्थिक अरिष्ट निर्माण झालं आहे. तर, दुसरीकडे पाकिस्तानमध्ये अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. त्याच्या परिणामी विकासगती मंदावणार असल्याचे आशियाई विकास बँकेने म्हटले आहे. 

आशियाई देशातील महागाई दरही वाढणार 

वर्ष 2022 मध्ये  महागाई दर 4.2 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी या वर्षात महागाई दर 3.7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर, पुढील वर्षात हा महागाईचा दर 3.5 टक्के राहणार आहे. याआधी हा दर 3.1 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. 

इंधन दरवाढ, अन्नधान्यांच्या वाढत्या किंमतींमुळे महागाई दरात वाढ होणार असल्याचे आशियाई विकास बँकेने म्हटले आहे. मात्र, महागाई वाढीचा वेग जगातील इतर भागाच्या तुलनेत आशियाई देशात तुलनेनं कमी असल्याचे आशियाई विकास बँकेच्या अहवालात म्हटले आहे. 

विकास दर घसरण्याची काय आहेत प्रमुख कारणं? 

चीनमध्ये कोरोना महासाथीच्या भीतीमुळे लॉकडाउन लावले जात आहे. या सततच्या लॉकडाउनमुळे चीनमधील अर्थचक्र बिघडले आहे. तर, प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये अधिक आक्रमकपणे आर्थिक विकासाकडे पावलं टाकली जात आहे.  रशिया-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगातील अर्थचक्रावर परिणाम झाला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचा परिणाम आर्थिक विकासावरही दिसून येत आहे.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
सात वेळा अपयशी ठरला, पण हार न मानता लढला! 46 लाखाची नोकरी सोडून भारतीय लष्करात अधिकारी झाला 
सात वेळा अपयशी ठरला, पण हार न मानता लढला! 46 लाखाची नोकरी सोडून भारतीय लष्करात अधिकारी झाला 
1 कोटी रुपयांचं मालक व्हायचंय? कुठे, कधी आणि कशी गुंतवणूक करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
1 कोटी रुपयांचं मालक व्हायचंय? कुठे, कधी आणि कशी गुंतवणूक करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
50 कोटी रुपयांची कंपनी विकणार, संन्यास घेऊन जंगलात राहणार, बड्या व्यवसायिकानं घेतला मोठा निर्णय
50 कोटी रुपयांची कंपनी विकणार, संन्यास घेऊन जंगलात राहणार, बड्या व्यवसायिकानं घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dahihandi 2026 : नवी मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट, घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू, देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना
देविदास चौगुले प्रतिष्ठानच्या दहीहंडी कार्यक्रमात दुर्घटना,घणसोलीतील तरुण गोविंदाचा मृत्यू
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
ब्रायन लाराकडून इम्रान खानसाठी भावनिक आवाहन; म्हणाला, 'त्यांना योग्य उपचार मिळाले पाहिजेत, हे राजकारण नाही, तर..'
Sanjay Raut : ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले... ठाणे फक्त बाळासाहेब ठाकरेंचे, धर्मवीर आनंद दिघेंचे...
ठाण्यातील गोविंदांकडून 'सौ दाऊद, एक राऊत' च्या घोषणा, संजय राऊत मंचावरुन थेट म्हणाले...
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
काँग्रेसने महाराष्ट्रासह एकाचवेळी सहा राज्यात प्रभारी बदलले, पंजाबमध्ये राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी तगडा निर्णय, सचिन पायलटांना सुद्धा मोठी जबाबदारी
IND W vs PAK W : भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
भारताच्या लेकींचा दणदणीत विजय, पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली, टीम इंडियाची दमदार गोलंदाजी 
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
शक्तिपीठ झाल्यानंतर कोल्हापूरचा विकास अमर्यादित होणार, त्याचा संपूर्ण लाभ जिल्ह्याला मिळणार: खा. धनंजय महाडिक
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
RBI चा 5  कंपन्यांना दणका, 45 लाख रुपयांचा दंड ठोठावला, नियमाचंं उल्लंघन करणं भोवलं
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
ऊस दरासाठी महाराष्ट्र-कर्नाटकच्या शेतकऱ्यांची वज्रमूठ; 29 सप्टेंबरपासून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींच्या घराबाहेर बेमुदत धरणे आंदोलन, राजू शेट्टींची घोषणा
Embed widget