एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

पूरग्रस्तांना आता नेमकं काय हवंय?

खरं तर केलेली मदत कमीच पडेल अशी अवस्था कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात झाली आहे. प्रत्येक जण आपल्या परीने मदत करत आहे. पण आपण करत असलेली मदत खरंच त्यांना मदत ठरली पाहिजे इतकीच अपेक्षा!

सांगली कोल्हापूर साताऱ्यात पूर आला. अनेकांचे संसार बुडाले आणि त्याचवेळी अवघ्या महाराष्ट्रात मदतीचा पूर देखील आला. लोकांनी जमेल त्या पद्धतीने धान्य, कपडे, औषधांची मदत केली. पहिल्या काही दिवसातील मदतीचा ओघ आता हळूहळू थांबेल पण पूरग्रस्तांना आता खरी मदतीची गरज आहे. पाणी ओसरत आहे. लोक आता आपल्या घराकडे परतत आहेत. पुरानंतर आता गावागावात पाणी ओसरत आहे, काही ठिकाणी अजून ही पाणी आहे. पण जिथे पाणी ओसरलं तिथे घरा घरात ,वस्त्यांवर गाळ आणि चिखल जमला आहे. घर आणि तो परिसर आता राहण्यालायक नाही. आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित नाही. त्यामुळे आता तिथे मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवकांची गरज आहे, ज्यांना अशा कामाची माहिती आहे. जे स्वच्छता करण्याच्या कामात भाग घेऊ शकतात. मनसे नेते अनिल शिदोरे यांच्या मते "महाविद्यालय, शाळा मधील NSS, स्काऊट आणि गाईड मधील विद्यार्थी, तरुण ज्यांना ट्रेनिंग असतं अशा विद्यार्थ्यांनी या भागात कामासाठी आलं पाहिजे, त्यामुळे मदत होईल".  सध्या अनेक ठिकाणी विविध संस्था, राजकीय पक्षांच्या माध्यमातून सफसफाईचे काम सुरू आहे पण ती मदत अपुरी आहे. लोकांना आता मदत करायची असेल तर काही दिवस या भागात येऊन स्वच्छता मोहिमेसाठी हातभार लावणं गरजेचे आहे. केरळच्या पुरात ज्यांनी मदत केली होती आणि महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी काम करणाऱ्या विनिता तटके यांनी सांगितलं की "केरळमध्ये सरकारने नियोजन केले होते, कोणत्या कॅम्पमध्ये किती लोक. त्यांना नेमकी कशाची आवश्यकता आहे आणि दर आठवड्याने कॅम्पमधील स्थिती आणि आता कशाची मदत हवी ही यादी देखील अपडेट व्हायची. आता राज्य सरकार किंवा प्रशासनाकडे अशी माहिती नाही. लोक कोणत्या कॅम्पमध्ये आहेत, कशाची मदत हवी आहे. अनेक लोक आपल्या ओळखीने येऊन मदत देत आहेत किंवा नुसतं सामान येत आहे. ही मदत नेमकी कुठे कुणाला द्यायची. कुणाला कशाची गरज आहे हे नेमकं नियोजन करायला हवे" सध्या कोल्हापूर, सातारा सांगली भागात अन्नधान्य पोहचले आहे. तिथे मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मते आता तिथे सर्वाधिक गरज आहे भांड्यांची. संपूर्ण घर पाण्यात गेल्यामुळे अन्नधान्य दिले तरी घरात ते ठेवायला, शिजवायला भांडी हवी. नुसतं अन्नधान्य देऊन उपयोग नाही, शिजवायला गॅस, तेल, मसाले हे ही लागतं. त्यामुळे मदत करताना ह्याची काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे पुरात अनेक दिवस घर पाण्याखाली होती. अनेकांची घर तुटली तर जी घर वाचली ती आता सुरक्षित नाहीत. आता पाणी ओसरलं तरी घराला ओल असणार. ही घर काही दिवसात पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी घर पुन्हा बांधण्याची आवश्यकता आहे. काही आमदार गावं दत्तक घेत आहेत. पण समाजातील लोकांनी आता मोठ्या प्राणावर येऊन आर्थिक मदत किंवा घर बांधण्यासाठी जे काही करता येईल ती मदत करणे आवश्यक आहे. एक अशीही मदत करता येऊ शकते की जमेल तसं लोकांनी एक कुटुंब दत्तक घेतले तरी मदत होईल. कुटुंब दत्तक घेणं म्हणजे काय तर त्या घरात किमान पुढचे तीन महिने अन्नधान्य, ते शिजवण्यासाठी गॅसची- भांड्यांची सोय, घरातील लोकांना चटई, बेड, चादर, कपडे , शालेय पुस्तक किमान इतकी मदत झाली तरी खूप आहे. कोणी फ्रीज, फर्निचर, टीव्हीची अपेक्षा ठेवत नाही. पण किमान बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी जर एक कुटुंब दत्तक घेतले तर खारीचा वाटा असेल. सध्या पूरग्रस्त भागात साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे, त्यामुळे यासंबंधी औषध तिथे पोहचणे आवश्यक आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर मृत जनावरांची विल्हेवाट लावणे आता आवश्यक आहे. लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य मदत पोहोचली तरी गुरांसाठी आवश्यक चारा पोहोचला नाही. गुरांना खाण्यासाठी, त्यांना आरोग्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. ही मदत पोहोचणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी जुने कपडे पाठवले ते परत पाठवण्यात आले. आता हे जुने कपडे भांडीवाल्यांना देऊन त्यांच्याकडून नवीन भांडी घेऊन पुरग्रस्तांना देता येऊ शकतात. त्यामुळे जमेल त्या आसपासच्या जिल्ह्यांतून भांडीकुंडी मदत होऊ शकेल. अतिशय महत्वाचे म्हणजे पूरग्रस्तांची ओळखपत्रं,आवश्यक कागदपत्रं पाण्यात बुडाली आहेत. गावात आपला सात बारा, आधारकार्ड, रेशन कार्ड, मार्कशीट, महत्वाची कागदपत्रं सगळं बुडालं आहे. लोकांकडे ओळखपत्रं राहिलेली नाहीत. शासकीय मदत असो किंवा काहीही गरज लागली तर ओळखपत्रं लागतात. त्यामुळे शासनाने लोकांना त्यांची ओळखपत्र तात्काळ देणं आवश्यक आहे. नाहीतर पुन्हा तहसीलदारांकडे फेऱ्या माराव्या लागतील. ओळखपत्र नसल्याने मदत मिळत नाही अशी स्थिती होईल. त्यामुळे आधार कार्ड, रेशन कार्ड, सात बारा तात्काळ खूप ताटकळत न ठेवता कसा देता येईल, यासाठी कॅम्प लावता येईल अशी सोय झाली पाहिजे. गणपती उत्सव जवळ येत आहे. यावर्षी पूरग्रस्त भागात गणेशोत्सव कितपत साजरा होईल ही शंका आहे. यामुळे अशा गावांमध्ये एक गाव, एक गणपती संकल्पना राबवता येईल. खरं तर या स्थितीत सण साजरा करण्याचे भान कुणाला नाही पण तरीही भकास घर, शेत पाहून मन उदास होण्यापेक्षा गणपतीच्या निमित्तानं लोक हे दुःख काही काळ विसरू शकतील. सांगली, कोल्हापूर, सातारा हा भाग तसा सधन भाग समजला जातो. लोकांची शेती, गुरं ढोरं होती. पण आता आपल्या डोळ्यासमोर सगळं पीक वाया गेलं. शिरोळ तालुक्यातील विश्वास काळे यांनी सांगितलेला अनुभव तर भयाण आहे. तीस एकर उसाचे पीक घेणारा माणूस आज जेवणासाठी रांगेत उभा आहे. त्याच संपूर्ण पीक पाण्याखाली गेलं. 2005 च्या पुरात जे नुकसान झालं, ते कर्ज आता फेडून झालं. माझं आयुष्य त्यात गेलं. आता या पुराने जे नुकसान झालं त्याच कर्ज माझी मुलं आयुष्यभर फेडत बसणार अशी त्या शेतकऱ्याने भावना व्यक्त केली आहे. इथला माणूस खचून गेला आहे. भकास डोळ्याने आपल्या शेतीकडे लोक पाहत बसतात.  त्यांना मानसिक आधाराची गरज आहे. आपण ह्यातून बाहेर येऊ, सावरू हा मानसिक आधार हवाय. मास कौन्सिलिंगची गरज पूरग्रस्त भागात आहे" खरं तर केलेली मदत कमीच पडेल अशी अवस्था कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात झाली आहे. प्रत्येक जण आपल्या परीने मदत करत आहे. पण आपण करत असलेली मदत खरंच त्यांना मदत ठरली पाहिजे इतकीच अपेक्षा! सरकार, प्रशासन जे करेल ते करेल पण समाज म्हणून आपण ही जे काही करता येईल आणि ज्याचा फायदा पूरग्रस्तांना होईल अशीच मदत केली पाहिजे!
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : Maharashtra News Update : 11 PM : 06 June 2024 : एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana on Lok Sabha : पराभवानंतर नवनीत राणा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर, म्हणाल्या...जय श्री राम!Devendra Fadnavis Delhi : राजीनामा देण्याच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस ठाम, दिल्लीत काय होणार?Devendra Fadnavis Special Report : राजीनाम्याचं केंद्र, काय ठरवणार देवेंद्र? ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
मोठी बातमी! पराभवानंतर युपीतही मोठी उलथापालथ; भाजप प्रदेशाध्यांचा राजीनामा, दिल्लीत बैठक
Ajit Pawar : अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
अजितदादांना बंडखोरी नडली? चार पैकी तीन उमेदवार आपटले, राष्ट्रवादीला मोठा झटका
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
लोकसभेला वडिलांचा पराभव, लाडकी लेक भावूक; अभिनेत्री नेहा शर्माची खास पोस्ट चर्चेत
Bhiwandi : भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
भिवंडीत गुन्हे शाखेने सराईत चोरट्यास केले जेरबंद, दहा गुन्हे उघडकीस, सहा दुचाकी केल्या जप्त
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
कार्यकर्त्याला मारहाण, दौरा अर्धवट सोडून निलेश लंके थेट रुग्णालयात; पोलीस अधीक्षकांचंही आवाहन
Embed widget