एक्स्प्लोर

सखुबाईंच्या चपला

जर कधी आजच्यासारखी सखुबाईंना पुन्हा शोधण्याची वेळ आली तर मी सखुबाईंचे पाय नेमके ओळखावेत. कारण आज मी झिजलेले पाय आणि झिजलेली आयुष्य पाहिली आहेत...

या पायांचा फोटो मी पहिल्यांदा एका डॉक्टरच्या मोबाईलमध्ये बघितला. ठाण्याजवळच्या जकातनाक्याच्या मैदानात जेव्हा मोर्चा थांबला होता, त्यावेळी अँम्ब्युलन्सवर ड्युटी करत असलेल्या डॉक्टरनं एका कॅमेऱ्यावरुनच हा फोटो घेतला. कॅमेरा स्क्रीनवरुनच फोटो घेतल्यानं फार स्पष्ट दिसत नव्हता. पण त्या ब्लर फोटोतही आजींच्या पायाची वेदना ठळकपणे जाणवली. या आजीबाईंना शोधण्याचा नंतर खूप प्रयत्न केला. एवढ्या गर्दीत या आजीबाई पहिल्यांदा सापडल्या, त्या माझा सहकारी वेदांत नेबला. नंतर पुन्हा हरवल्या आणि पुन्हा त्यांना आम्ही शोधलं. जेव्हा मी त्यांना भेटले, तेव्हा त्यांचे पाय बघून अक्षरश: हादरायला झालं. केवळ चपला नाहीत आणि होत्या त्या तुटल्या म्हणून या सखुबाईंनी शेकडो किमीची वाट अनवाणी तुडवली. मला माझ्या चपलांची लाज वाटली. मनात आलं की जवळच सीएसटी स्टेशनच्या सबवेमधून मी त्यांना नव्या चपला घेऊन देते आणि मगच शूट करते...आणि मी तसं केलं... काही वेळाने बघते तो ट्विटर आणि फेसबुकवर माझ्या कौतुकाचा पूर आलेला. मला दडपायला झालं... खरं तर सखुबाईंच्या पायात माझ्या हातानं चपला घालणं आणि त्याचं चित्रीकरण होऊन ते टीव्हीवर दाखवलं जाणं हे खूप सहज स्वाभाविक वाटलं होतं मला... पण साध्या साध्या गोष्टीही खूप अवघड होतात नंतर... सखुबाईंना चपला दिल्या, पण ते शूट करुन मिरवायचं होतं का मला? अर्थातच नाही. केलेल्या मदतीचा साधा उल्लेखही करु नये. पण अशी छोटीशी मदत एखाद्या थकल्या-भागल्या जीवाला विसावा देऊ शकते. सरकार या शेतकऱ्यांना काय देईल न देईल. त्यावरच्या निव्वळ राजकीय चर्चांपेक्षा आपण आपापला खारीचा वाटा उचललाच पाहिजे, हे सांगणं मला जास्त गरजेचं वाटलं. मग कॅमेऱ्याच्या माध्यमांतून आम्ही ते सांगितलंही... इतकेच... पण या एवढ्याशा गोष्टीनं मला किंवा इतर कुणालाही होणारं कौतुक पेलवणारं नाही. कारण कर्तव्यपूर्तीचं कधी कौतुक होऊ शकत नाही. फार फार तर आपण सर्वचजण त्या कर्तव्यपूर्तीच्या दिशेनं पुढे जाऊ शकतो. त्यामुळे मला फेसबुकीय महानतेचा किताब देणं आजिबात गरजेचं नाहीय. केवळ जखमा, भेगा आणि फोड आलेल्या पायांचे, सुरकुतलेल्या चेहऱ्यांचे, सुकलेल्या भाकरीचे, लाल टोप्यांचे फोटो काढून आणि ते पोस्टून ही जबाबदारी संपत नाही. फक्त सरकारच्या नावानं शंख करुनही ती संपत नाही. उलट प्रामाणिकपणे आपण शेतकरी मोर्चा सुरु होता, तेव्हा आपापल्या परीनं या कष्टकऱ्यांसाठी काय करु शकलो हे स्वत:ला विचारणं गरजेचं आहे. मी ते स्वत:ला विचारलं आणि माझ्या परीनं उत्तर देण्याचा प्रयत्नही केला. हे उत्तर अत्यंत तोकडं आहे. कारण मी घेऊन दिलेल्या चपलांचा सखुबाईंच्या पायाला फक्त आधार आहे. अशा अनेक सखुबाई आहेत ज्यांचे पाय मूळातच बळकट, सक्षम व्हायला हवेत. पुलंच्या चितळे मास्तर मधलं शेवटचं वाक्य होतं, "चपलांच्या ढिगाऱ्यातून मास्तरांच्या चपला ओळखणं अवघड गेलं नाही. कारण सर्वात जास्त झिजलेल्या चपला चितळे मास्तरांच्या होत्या..." जर कधी आजच्यासारखी सखुबाईंना पुन्हा शोधण्याची वेळ आली तर मी सखुबाईंचे पाय नेमके ओळखावेत. कारण आज मी झिजलेले पाय आणि झिजलेली आयुष्य पाहिली आहेत... पाहा व्हिडीओ :
View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde and Jayant Patil: जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
Mahesh Tutorials Shut down: मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde and Jayant Patil: जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
Mahesh Tutorials Shut down: मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
Embed widget