एक्स्प्लोर

जाऊबाईंच्या भांडणात याकूब फासावर !

कुठल्याही संयुक्त कुटुंबात दोन जावा एकत्र राहत असतील, तर त्यांच्यात भाडणं होणं, ही तशी सर्वसामान्य गोष्ट आहे. त्या नेहमीच आपापल्या पतींकडे एकमेकींच्या तक्रारी करुन कान भरत असतात. मात्र, जावा-जावांमध्ये होणारी बारीक-सारीक भांडणांमुळे कुणी फाशीपर्यंत पोहचवलंय, असं तुम्ही कधी ऐकलं नसेल. 12 मार्च 1993 च्या बॉम्बस्फोटाआधी मुंबईतील माहिम परिसरातील अल हुसैनी इमारतीत टायगर मेमन हा आई-वडील आणि याकूब या आपल्या लहान भावासोबत राहत होता. टायगर मेमनची पत्नी शबाना आणि याकूबची पत्नी राहीन यांचं एकमेकींशी अजिबात पटत नव्हतं आणि त्यामुळे दोघींमध्ये कायम खटके उडत. मुंबई बॉम्बस्फोटच्या कटानुसार टायगर मेमनने याकूब मेमनसोबत कुटुंबातील सर्व सदस्यांना भारताबाहेर पाठवलं. कुटुंबातील सगळेच जण पहिल्यांदा दुबईला, त्यानंतर सौदी आणि शेवटी पाकिस्तानात गेले. या पूर्ण प्रवासादरम्यान जावा-जावांमध्ये म्हणजे टायगर आणि याकूबच्या पत्नींमध्ये भांडणं सुरुच होती. याकूबची पत्नी दररोज टायगर आणि त्याच्या पत्नीची याकूबकडे तक्रार करत असे. "तुमच्या भावामुळे आपल्याला हे दिवस पाहावे लागत आहेत. आपण आपल्या नातेवाईकांपासूनही दुरावलो. ना कुणाच्या लग्नसमारंभात जाऊ शकत, ना कुणाच्या अंत्यसंस्काराला. याला आयुष्य म्हणायचं का? आता फक्त तुमच्या भावाच्या तुकड्यांवर आयुष्य काढावं लागेल.", असे याकूबची पत्नी त्याला वारंवार सांगत राहायची. आपल्या पत्नीकडून रोज रोज ही तक्रार ऐकून याकूबच्याही जिव्हारी लागत असे. जावा-जावांमधील होणाऱ्या भांडणांमुळे तो अक्षरश: कंटाळला होता. अखेर याकूबने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. याकूबच्या या निर्णयामागे जावा-जावांमधील भांडण हेही एक कारण होतं. रोजच्या भांडणांपासून त्याला सुटका हवी होती आणि त्याने टायगर मेमनसोबत बंडखोरी करुन भारतात परतण्याचा निर्णय घेतला. टायगर मेमन आणि अयूब मेमन यांना कराचीत सोडून याकूब नेपाळमार्गे भारतात परतला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी राहीन, इतर भाऊ आणि त्यांच्या पत्नी, आई-वडील हे होते. त्यानंतर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर याकूबला अटक करण्यात आली. याकूबला आशा होती की, बॉम्बस्फोटात मोठी भूमिका नसल्याने काही वर्षात सुटका होईल. दिल्लीत अटक केल्यानंतर पत्नी राहीन, भाऊ आणि नातेवाईकांविरोधात टाडाअंतर्गत खटला चालवला गेला. याकूबची पत्नी राहीन हिला कोर्टाने सोडून दिलं. मात्र, याकूबला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. 30 जुलै 2015 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नागपूर जेलमधअये याकूबला फासावर लटकवण्यात आले. 30 जुलैला याकूबचा वाढदिवसही होता. मेमन कुटुंबाच्या एका निकटवर्तीयाच्या म्हणण्यानुसार, जर जावा-जावांमध्ये भांडणं झाली नसती, तर कदाचित याकूब भारतात येण्यासाठी तयार झाला नसता.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

चिरडलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच नेपाळ-तिबेट सीमेजवळील आणखी एक तलाव फुटला; भोटेकोशी, त्रिशुली, नारायणी नद्यांजवळील अनेक गावे रिकामी केली, आतापर्यंत 478 जणांचा मृत्यू, 1500 जण बेपत्ता
चिरडलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच नेपाळ-तिबेट सीमेजवळील आणखी एक तलाव फुटला; भोटेकोशी, त्रिशुली, नारायणी नद्यांजवळील अनेक गावे रिकामी केली, आतापर्यंत 478 जणांचा मृत्यू, 1500 जण बेपत्ता
तमिळनाडू विधानसभेत सीएम विजय यांची पुन्हा एकदा गुगली! विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न करताच विलक्षण कृतीची चर्चा; विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
तमिळनाडू विधानसभेत सीएम विजय यांची पुन्हा एकदा गुगली! विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न करताच विलक्षण कृतीची चर्चा; विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
आदित्य ठाकरेंच्या वकिलांकडून राणेंचं नाव; दिशा सालियाप्रकरणी हायकोर्टात सुनावणी पूर्ण, निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
आदित्य ठाकरेंच्या वकिलांकडून राणेंचं नाव; दिशा सालियाप्रकरणी हायकोर्टात सुनावणी पूर्ण, निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
Baba Ramdev : आधी वादविवाद आता नरमाईची भूमिका; बाबा रामदेव म्हणाले,
आधी वादविवाद आता नरमाईची भूमिका; बाबा रामदेव म्हणाले, " कंगना रणौत या बहिणीला फोन करू अन्..."

व्हिडीओ

Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चिरडलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच नेपाळ-तिबेट सीमेजवळील आणखी एक तलाव फुटला; भोटेकोशी, त्रिशुली, नारायणी नद्यांजवळील अनेक गावे रिकामी केली, आतापर्यंत 478 जणांचा मृत्यू, 1500 जण बेपत्ता
चिरडलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच नेपाळ-तिबेट सीमेजवळील आणखी एक तलाव फुटला; भोटेकोशी, त्रिशुली, नारायणी नद्यांजवळील अनेक गावे रिकामी केली, आतापर्यंत 478 जणांचा मृत्यू, 1500 जण बेपत्ता
तमिळनाडू विधानसभेत सीएम विजय यांची पुन्हा एकदा गुगली! विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न करताच विलक्षण कृतीची चर्चा; विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
तमिळनाडू विधानसभेत सीएम विजय यांची पुन्हा एकदा गुगली! विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न करताच विलक्षण कृतीची चर्चा; विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
आदित्य ठाकरेंच्या वकिलांकडून राणेंचं नाव; दिशा सालियाप्रकरणी हायकोर्टात सुनावणी पूर्ण, निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
आदित्य ठाकरेंच्या वकिलांकडून राणेंचं नाव; दिशा सालियाप्रकरणी हायकोर्टात सुनावणी पूर्ण, निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
Baba Ramdev : आधी वादविवाद आता नरमाईची भूमिका; बाबा रामदेव म्हणाले,
आधी वादविवाद आता नरमाईची भूमिका; बाबा रामदेव म्हणाले, " कंगना रणौत या बहिणीला फोन करू अन्..."
Nidhi Singh Death Case Gujarat: पतीचे अनैतिक संबंध; 24 वर्षीय महिलेने जीवन संपवलं, अंतर्वस्त्रांमध्ये आढळली शेवटची चिठ्ठी, पोलिसही चक्रावले, नेमकं काय लिहिलेलं?
पतीचे अनैतिक संबंध; 24 वर्षीय महिलेने जीवन संपवलं, अंतर्वस्त्रांमध्ये आढळली शेवटची चिठ्ठी, पोलिसही चक्रावले, नेमकं काय लिहिलेलं?
Nepal Flash Flood: नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश
नेपाळमध्ये चिखलात गुदमरलेल्या जीवांचा शोध सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा अलर्ट जारी, तिबेटमध्ये पुन्हा पाण्याचा बांध फुटल्याची माहिती, सरकारकडून पोलीस, बचाव टीमला सतर्क राहण्याचे आदेश
Video: लग्नाची वरात घेऊन जाणारी खासगी बस थेट डांबाला धडकून पलटी, 35 जखमी; पण दैव बलवत्तर म्हणून दुसरा वाचलेला स्कुटीवाला मात्र जागेवरच 'ठंडा ठंडा कूल कूल..'
Video: लग्नाची वरात घेऊन जाणारी खासगी बस थेट डांबाला धडकून पलटी, 35 जखमी; पण दैव बलवत्तर म्हणून दुसरा वाचलेला स्कुटीवाला मात्र जागेवरच 'ठंडा ठंडा कूल कूल..'
Sugar Price Hike : 3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही! बिगबास्केट, झेप्टो अन् ब्लिंकिटसह ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा, नेमकं कारण काय?
3 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही! बिगबास्केट, झेप्टो अन् ब्लिंकिटसह ऑनलाइन डिलिव्हरी कंपन्यांकडून साखर खरेदीवर मर्यादा, नेमकं कारण काय?
Embed widget