एक्स्प्लोर

BLOG: शांतीचा दीपस्तंभ - गुरुदेव श्री श्री रविशंकर

गुरुदेव श्री श्री रविशंकर (Ravishankar) यांचं नाव घेतलं म्हणजे डोळ्यासमोर शांतता, करुणा आणि प्रेमाने ओतप्रोत भरलेल्या एका व्यक्तिमत्वाचा चेहरा येतो. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य म्हणजे मानसिक अस्वस्थतेवरचं रामबाण औषध आहे असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. ते काही जादुगार नाहीत, पण का कोण जाणे, त्यांच्या नुसत्या दर्शन आणि सहवासाने आपल्यात संपूर्ण कायापालट झाल्यासारखे वाटते. त्यांच्याबाबतीतला एक प्रसंग मला आवर्जून इथे सांगावा वाटतो. २०१३ मध्ये दिल्लीच्या तिहार तुरुंगात सकाळी सहा वाजताची वेळ.  एक अविस्मरणीय दृश्य होतं, ते म्हणजे पाच हजार कैदी शांतपणे बसून प्राणायाम करीत होते. वातावरण पूर्ण भारून गेलेलं होतं. फक्त श्वासांचे लयबद्ध आवाज येत होते. लोखंडी गज जणू असून नसल्यासारखे भासत होते. पोलीस, कैदी यांच्या आरडाओरड्याने एरव्ही दणाणून जाणारा हा तुरुंग जणू काही शांततेचा महासागर झाला होता. या साधनेने कैद्यांना स्वतःशी संवाद साधण्याची आणि आतून जोडण्याची संधी मिळाली. नवीन दिशा मिळाली.

राजेश नावाच्या एका कैद्याने अनुभव सांगितला, तो म्हणाला, “तुरुंगात असतानाच माझे आईवडील गेले. मी इतका खचून गेलो होतो की आत्महत्येचा विचारही केला. पण या कार्यक्रमानंतर मला जगण्यासाठी नवी उमेद मिळाली.” हा चमत्कार गुरुदेवांनी तिहारसारख्या तुरुंगात घडवून आणला होता. गुरुदेव नेहमी सांगतात,एखादी व्यक्ती गुन्हेगार का होते? कुठेतरी त्याला एक जखम झाली असते. त्या जखमी मनाला जर बरे केले, तर गुन्हेगारी नाहीशी होते.” आजपर्यंत जगभरातील थोडे थोडके नव्हे तर, आठ लाखांहून अधिक कैद्यांना त्यांच्या कार्यातून नवसंजीवनी मिळाली आहे.

पैगाम-ए-मोहब्बत – संवादाची ताकद 
२०१७ मध्ये बेंगळुरूमध्ये गुरुदेवांनी ‘पैगाम-ए-मोहब्बत’ हा कार्यक्रम घेतला. या मंचावर सैनिकांच्या कुटुंबीयांपासून ते अतिरेक्यांच्या नातेवाईकांपर्यंत सर्वजण एकत्र आले. इतका आगळावेगळा कार्यक्रम यापूर्वी कधी झाला नसेल. सगळ्यांच्याच मानत दु:ख होतं. संवाद सुरु झाला आणि सगळं वातावरणाच बदललं. मानवी मुल्ये, माणुसकी  काय आहेत ती कळली. सर्वात महत्वाचे म्हणजे कोणताही राजकीय हेतू, अभिनिवेश न ठेवता केवळ माणुसकीच्या धर्माला जागवत हा कार्यक्रम करण्याचे गुरुदेवांनी ठरवले होते, साहजिकच त्याचा मोठा परिणाम झाला. 

संवेदनशील 
सगळ्यांना माहिती आहे, अयोध्येच्या राम मंदिर विवादासारख्या संवेदनशील प्रसंगी गुरुदेवांनी संयमाने सगळ्यांशी  संवाद साधला. हिंदू समाजाची आस्था, मुस्लीम समाजाची भावना – दोन्ही समजून घेत त्यांनी विश्वासाचं वातावरण निर्माण केलं. ईशान्य भारतातही त्यांनी शांतीचा पूल बांधला. २०१५ मध्ये तब्बल ६७ बंडखोर गटांनी शांततेचा करार केला. गुरुदेवांच्या शिबिरानंतर शेकडो गुरिल्ला लढवय्यांनी शस्त्रं खाली ठेवली. आणि ते  नव्या जीवनाकडे वळले. बंडखोरीचा त्याग केलेल्या एकाने सांगितलं की “गुरुदेवांच्या या विचाराने  मला आयुष्याचा खरा अर्थ समजला.”

कोलंबियातील ऐतिहासिक करार 

गुरुदेवांचे कार्य केवळ भारतापुरते मर्यादित नाही. कोलंबियामध्ये तब्बल ५३ वर्षे सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षात लाखो लोक मृत्यूमुखी पडले होते. सरकार आणि बंडखोरांमध्ये विश्वास उरला नव्हता. पण गुरुदेवांनी संवाद साधून बंडखोरांना एकतर्फी युद्धबंदी जाहीर करायला लावली. अखेर २०१६ मध्ये ऐतिहासिक शांतता करार घडून आला.

युद्धग्रस्तांना आधार – युक्रेनचा अनुभव 
आज युक्रेनमध्ये युद्धामुळे हतबल झालेले लोक गुरुदेवांच्या स्वयंसेवकांच्या आधाराने हळूहळू आपल्या पायावर उभे राहत आहेत. साधा श्वासोश्वास कसा करावा  हे तंत्र आता सैनिक आणि नागरिक दोघेही शिकताहेत. त्यामुळे कठीण परिस्थितीतही टिकून आहेत. एका सैनिकाला भीतीने अर्धांगवायू झाला होता, पण या साधनेमुळे तो पुन्हा चालू लागला.

छोटे बदल महत्वाचे
मोठे बदलच परिणामकारक असे नव्हे , तर छोटे छोटे बदल खूप काही घडवून आणतात. त्यामुळेच कैदी शांत झाले, बंडखोरांनी शस्त्रं टाकली, निर्वासितांना शांती मिळाली. अशा छोट्या छोट्या बदलांमधून जग बदलते हे आपण गुरुदेवांकडून शिकतो. आज इतकी वर्षे झाली. गुरुदेवांचे एक स्वप्न आहे – हिंसाचारविरहित जग. हे स्वप्न कदाचित स्वप्नवत आणि फारच आदर्शवादी वाटू शकतं, पण जेव्हा लाखो करोडो माने एकत्र येऊन या एकाच उद्देशाने विचार करू लागतील, तेव्हा हे स्वप्न सत्यात उतरू शकतं, असा विश्वास वाटू लागतो.

लेखक - विनायक पात्रुडकर

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar News: हृदयद्रावक! पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला;  बंद दगड खाणीत बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू, पालघर हळहळलं
हृदयद्रावक! पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला; बंद दगड खाणीत बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू, पालघर हळहळलं
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray: ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई का जिंकू शकले नाही? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मराठी माणूस...'
ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई का जिंकू शकले नाही? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मराठी माणूस...'
Devendra Fadnavis On Ajit Pawar: सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तारीख कुणी ठरवली?; देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच केला खुलासा
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तारीख कुणी ठरवली?; देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच केला खुलासा
Gadchiroli News: दुचाकीला डुक्कराची धडक, गडचिरोली नगरपालिकेतील भाजपच्या आरोग्य सभापतींचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
दुचाकीला डुक्कराची धडक, नगरपालिकेतील भाजपच्या आरोग्य सभापतींचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
ABP Premium

व्हिडीओ

Shikhar Bank Scam : 25 हजार कोटींचा घपला, कोणीच दोषी नाही, कोर्टानेही स्वीकारला क्लोजर रिपोर्ट
Devendra Fadnavis : मुंबईला बापाची मालमत्ता मानणाऱ्यांना कधी ना कधी उत्तर द्यावंच लागेल- फडणवीस
Nagpur 12 Exam : नागपूरच्या वैशाली नगरच्या सक्सेस क्लासच्या पेपरफुटी प्रकरणात सहभाग
Sunetra Pawar PC Video : बोलून झाल्यावर उठा, पीसीपूर्वी काय काय घडलं?
Rohit Pawar on Raj Thackeray : राज म्हणाले दादा असो व इतर कुणी मराठी माणसाला न्याय देऊ

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar News: हृदयद्रावक! पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला;  बंद दगड खाणीत बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू, पालघर हळहळलं
हृदयद्रावक! पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला; बंद दगड खाणीत बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू, पालघर हळहळलं
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray: ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई का जिंकू शकले नाही? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मराठी माणूस...'
ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई का जिंकू शकले नाही? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'मराठी माणूस...'
Devendra Fadnavis On Ajit Pawar: सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तारीख कुणी ठरवली?; देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच केला खुलासा
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तारीख कुणी ठरवली?; देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच केला खुलासा
Gadchiroli News: दुचाकीला डुक्कराची धडक, गडचिरोली नगरपालिकेतील भाजपच्या आरोग्य सभापतींचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
दुचाकीला डुक्कराची धडक, नगरपालिकेतील भाजपच्या आरोग्य सभापतींचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Radhmika Vijay Wedding: विजय-रश्मिकाच्या लग्नाचा सुवर्णथाट! राजेशाही दिमाखात पौराणिक दागिन्यांचा लूक, तब्बल 300 दिवस चाललेलं काम
विजय-रश्मिकाच्या लग्नाचा सुवर्णथाट! राजेशाही दिमाखात पौराणिक दागिन्यांचा लूक, तब्बल 300 दिवस चाललेलं काम
Bhiwandi Election 2026 : भिवंडीत बंडखोरी करणे भाजपच्या नगरसेवकांना भोवणार? प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची 6 बंडखोरांना कारणे दाखवा नोटीस
भिवंडीत बंडखोरी करणे भाजपच्या नगरसेवकांना भोवणार? प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी धाडली 6 बंडखोरांना कारणे दाखवा नोटीस
Rinku Singh News : बापाचं सरण शांत होण्याआधी रिंकू टीम इंडियात होणार दाखल; टीम इंडिया कोलकात्यात पोहोचली
बापाचं सरण शांत होण्याआधी रिंकू टीम इंडियात होणार दाखल; टीम इंडिया कोलकात्यात पोहोचली
Devendra Fadnavis On Nitesh Rane : नितेश राणेंना वादग्रस्त वक्तव्यावरून समज का देत नाही? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'पक्षाने मला आपला सर्वोच्च नेता..'
नितेश राणेंना वादग्रस्त वक्तव्यावरून समज का देत नाही? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'पक्षाने मला आपला सर्वोच्च नेता..'
Embed widget