एक्स्प्लोर

Washim News : वाशिम जिल्ह्यातील रब्बी पीक धोक्यात, निकृष्ट विद्युत रोहित्रामुळं शेतकरी चिंतेत

वाशिम (Washim) जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रब्बी पीक (Rabi Crop) धोक्यात आली आहेत. वारंवार विद्युत रोहित्र जळत असल्यामुळं वाशिम जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत.

Washim News : साततत्यानं शेतकऱ्यांना (Farmers) कोणत्या ना कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येते. सध्या वाशिम (Washim) जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रब्बी पीक (Rabi Crop) धोक्यात आली आहेत. वारंवार विद्युत रोहित्र जळत असल्यामुळं वाशिम जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. रब्बी पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची महावितरणवर भिस्त आहे. 

शेतकऱ्यांवर पडतोय आर्थिक बोजा

सध्या वाशीमच्या  महावितरण कार्यालयात  शेतकऱ्यांची  लगबग दिसत आहे. विद्युत रोहित्र मिळवण्यासाठी    रब्बी हंगाम सुरु होताच सिंचनासाठी शेतकऱ्यांना वीज गरजेची आहे.  मात्र, ऐन रब्बी हंगामाच्या  सुरुवातीला  महावितरण कंपनीच्या ढिसाळपणामुळं निकृष्ट दर्जाचे रोहित्र पुरवले जात असल्यानं  शेतकऱ्यांचे  पेरणी केलेलं  रब्बी पिक धोक्यात आलं आहे.  नवीन रोहित्र  बसवताच काही वेळात रोहित्र जळून जात आहे. तर परत ने आन करण्यासाठी शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा  पडत आहे.

अधिकारी कार्यालयात भेटत नसल्याचा आरोप

शेतकऱ्यांना शेतात सिंचन करण्याऐवजी विद्युत कार्यालयात  रोहित्र मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र मिळावं यासाठी लोकप्रतिनिधी महावितरणाच्या अधिकाऱ्यांना फोन करतात, त्यांना कार्यालयात जाऊन भेटण्याचा प्रयत्न करतात, मात्र अधिकारी फोन उचलत नाहीत. अधिकारी कार्यालयात भेटत नसल्याचा आरोप जिल्हा परिषदचे कृषी सभापती वैभव सरनाईक यांनी केला. तर नेते आणि लोकप्रतिनिधींच्या फोन कॉलनंतरही शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र मिळण्यासाठी कसरत करावी लागत आहे.


Washim News : वाशिम जिल्ह्यातील रब्बी पीक धोक्यात, निकृष्ट विद्युत रोहित्रामुळं शेतकरी चिंतेत

आधीच परतीच्या पावसाचा फटका, पुन्हा...

दरम्यान, आधीच परतीच्या पावसानं राज्यातील खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची उभी पीक वाया गेली आहेत. हाती आलेली पीक वाया गेल्यामुळं शेतकरी संकटात आहेत. अतिवृष्टीचा सर्वात जास्त तडाखा मराठवाडा आणि विदर्भाला बसला आहे. सोयाबीनसह कापूस, मका, फळबागांचे मोठे नुकसान या पावसामुळं झालं होतं. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. तसेच जनजीवन देखील विस्कळीत झालं होते. पिकांबरोबर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी देखील खरवडून गेल्या होत्या. शेतकऱ्यांच्या हातची सगळी पीक वाया गेल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. अशा स्थितीत शेतकऱ्यांची सगळी भिस्त आता रब्बी हंगामातील पिकावंर आहे. मात्र, रब्बी हंगामात विद्यूत रोहित्र जळत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या रोहित्र मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरण कार्यालयात दररोज चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळं आता शेती करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Cotton News : नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीला पोलिस, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडूनच कापसाची खरेदी करावी अन्यथा....

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : दुपारी 07 च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaYek Number Movie Interview : राज ठाकरेंवरचा बायोपिक; येक नंबर सिनेमाच्या टीमशी गप्पाGhatkopar Fire : प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळीMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
आचारसंहितेपूर्वीच टेंडर, सोशल मीडियावर जाहिरातीसाठी 90 कोटी खर्च; विरोधकांचा जोरदार हल्लाबोल
Supriya Sule: तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आत्तापर्यंत 1680 अर्ज; बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या 'आमची खास रणनीती...'
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
केवळ शहर नाही, अवघा जिल्हा अहिल्यानगर; महाराष्ट्र शासन राजपत्रात उल्लेख, अधिसूचना जारी
दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 जमा; मुख्यमंत्र्यांनीच सांगितला आकडा
दिवाळी आधीच लाडक्या बहिणींची दिवाळी; ऑक्टोबर-नोव्हेंबरचे 3000 जमा; मुख्यमंत्र्यांनीच सांगितला आकडा
Embed widget