एक्स्प्लोर

Narendra Singh Tomar : कृषी क्षेत्रात बियाणांचा दर्जा महत्त्वाचा, लवकरच बियाणांचा माग काढणारी सीड ट्रेसेबिलिटी व्यवस्था सुरु करणार : कृषीमंत्री

Narendra Singh Tomar : भारत सरकारसाठी शेतकऱ्यांचं हित सर्वोपरी असल्याचं वक्तव्य केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं.

Narendra Singh Tomar : भारत सरकारसाठी शेतकऱ्यांचं हित सर्वोपरी असल्याचं वक्तव्य केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी केलं. शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या बियाणांची (seeds) उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, मोदी सरकार (Modi Govt) लवकरच बियाणांचा माग काढणारी सीड ट्रेसेबिलिटी व्यवस्था सुरु करण्यात येणार आहे. यामुळं बियाणे व्यापार क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा बसणार असल्याचे तोमर म्हणाले. कृषी क्षेत्रात बियाणांचा दर्जा महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले.

शेतासाठी बियाणांची गुणवत्ता निश्चित करणं महत्त्वाचं

बियाणाचा विकास हा जगाचा विकास आहे. शेत कोणतेही असो, बियाणे महत्त्वाचे असते. कोणत्याही शेतासाठी बियाणांची गुणवत्ता निश्चित करणं अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तोमर म्हणाले. कृषी क्षेत्रात बियाणांचा दर्जा, त्याचा विकास, संख्यात्मक वाढ, शेतकरी वापर करणे आणि इतर लोकांनी वापर करणे, हा मोठा प्रवास आहे, या प्रवासात सहभागी होणारे लोक आपला व्यवसाय तर करत आहेतच. पण त्याच बरोबर त्यांची या क्षेत्राविषयक जबाबदारीही खूप महत्त्वाची आहे, जी सर्वांनी गांभीर्याने घेतली पाहिजे असेही ते म्हणाले. 

सीड ट्रेसेबिलिटी संबंधितांकडून सूचना घेण्यात आल्या आहेत. ते सुरु केल्यानं त्याचा फायदा शेतकऱ्यांना तसेच बियाणे क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या सर्व लोकांना होईल. बियाणे क्षेत्र योग्यरित्या चालेल याची खात्री होईल आणि त्या  दिशेने योग्य वाटचाल केली जाईल असे तोमर म्हणाले. बियाणे क्षेत्र सुरळीत चालण्याच्या मार्गात कितीही अडथळे येत असले तरी सरकार याबाबतीत अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितलं.

सर्व घटकांच्या हितासाठी कायदेशीर सुधारणा 

देशातील व्यापार-उद्योग क्षेत्र नीट आणि न घाबरता चालणे आवश्यक आहे. मोदी सरकारनं ते करुन दाखवले आहे. मोदी सरकारने पहिल्यांदाच देशातील करदात्यांचे आभार मानले आहेत. तसेच सर्व घटकांच्या हितासाठी कायदेशीर सुधारणा करुन देशातील सर्व वर्गांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. यावरुन सरकारची दूरदृष्टी दिसून येत असल्याचे तोमर म्हणाले. येत्या काळात आपल्या देशाला विकसित राष्ट्र बनवायचे असेल, तर परस्पर विश्वासाचे हे वातावरण केवळ सुधारावे लागेल असे नाही तर ते अधिक दृढ करावे लागेल असे ते म्हणाले.

कृषी क्षेत्र अर्थव्यवस्थेचा कणा

कृषी क्षेत्र समृद्ध असून हे क्षेत्र अर्थव्यवस्थेचा कणा आहे. भारत कृषी क्षेत्रात आघाडीवर आहे. तरीही तेलबिया, कापूस यासारख्या काही क्षेत्रांमध्ये ज्यामध्ये आपण अद्याप स्वयंपूर्ण होऊ शकलो नाही. यासाठी बियाणे क्षेत्राच्या संबंधितांनीही आयात कमी करुन देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी योगदान दिले पाहिजे असे तोमर म्हणाले. या दिशेने बियाणे उद्योगांनी आराखडा तयार करून त्यावर काम करणे आवश्यक आहे. येणारा काळ  भारतासाठी खूप भाग्यमय असणार आहे. जगातील राजकीय परिस्थिती, भारताची विश्वासार्हता आणि आपले महत्त्व आज जगाच्या राजकीय व्यासपीठांवर वाढल्याचे तोमर म्हणाले. जगाच्या मोठ्या भागाला भारताकडून अपेक्षा असल्याचे तोमर म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Rabi Season : यंदा रब्बी पिकांच्या क्षेत्रात 24.13 लाख हेक्टरची वाढ, कृषीमंत्री तोमर यांची माहिती, पाणी साठ्यातही मोठी वाढ

 

महत्त्वाच्या बातम्या

TV Oldest Show: दूरदर्शनवरील सर्वात प्रदीर्घ काळ चालणारा टीव्ही शो; तब्बल 59 वर्षांपासून लोकप्रिय, देशाचे चित्रच बदलले!
दूरदर्शनवरील सर्वात प्रदीर्घ काळ चालणारा टीव्ही शो; तब्बल 59 वर्षांपासून लोकप्रिय, देशाचे चित्रच बदलले!
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसान योजनेचे 2000 रुपये मिळवायचे असतील तर आधी 'ही' तीन कामे करा, अन्यथा...
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, खतांच्या वाटपासह केली भाताची लावणी 
नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, खतांच्या वाटपासह केली भाताची लावणी 
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Indigo Flight Emergency Landing: दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
दुबई-मुंबई इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये आपत्कालीन लँडिंग, कार्गो कंपार्टमेंटमधून धूर येताच पायलटचा निर्णय, विमानात 194 प्रवासी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
Embed widget