एक्स्प्लोर

Bamboo : बांबू वाचवतोय पर्यावरणाचे प्राण... सांगलीनंतर सहा जिल्ह्यात बांबू लागवड जोरात

Bamboo Plantation: सांगलीनंतर  कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांत बांबू लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

सांगली: वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा गुदमरत चाललेला प्राण वाचवण्याचे काम बांबू लागवड चळवळीतून केला जात आहे. कोरोना टाळेबंदीच्या काळात सांगलीत (Sangli Bamboo Plantation) सुरु झालेली ही चळवळ आतापर्यंत राज्यातील सहा जिल्ह्यात पसरली आहे. यामधून पंचवीस हजारावर बांबूची लागवड झाली असून त्यातून रोज 50 टन ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो. तर त्याच्या दुप्पट म्हणजे 116 टन कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतला जातो. सांगली कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड या जिल्ह्यात बांबू लागवड वाढली आहे. 

सांगलीतील बांबू तज्ज्ञ डॉ. दीपक येरटे यांनी या बांबू लागवड चळवळीचा प्रारंभ कोरोना टाळेबंदीच्या काळात सुरु केला. बांबू झाडांची लागवड आता दहा हजारांवर पोहचली आहे. यातून रोज वीस टन प्राणवायूची म्हणजेच ऑक्सिजनची वातावरणात भर टाकली जात आहे. तर 50 टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो. खडकाळ, क्षारपड, पूरग्रस्त भागातील जमीन, कमी पाण्याची जमिनीत बांबूची लागवड करता येते. शिवाय बांबूला चांगला दर मिळत असल्याने याच्या लागवडीने दुहेरी फायदा मिळतो.

शेतकऱ्यांची अनुत्पादक जमीन लागवडीखाली येते. त्यातून 40 वर्षांपर्यंत उत्पन्न मिळते आणि पर्यावरणातील प्राणवायूचे प्रमाण वाढून प्रदूषण कमी होते. जिल्ह्यात क्षारपड जमिनीचे प्रमाण मोठे आहे. तेथे बांबूची लागवड व्हावी यासाठी डॉ. येरटे यांचे प्रयत्न सुरु आहेत. याबरोबरच त्यांनी सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांमध्येही ही चळवळ वाढवण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याला शेतकऱ्यांचा हळूहळू प्रतिसाद मिळू लागला आहे.

राज्य शासनाच्या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत बांबू लागवडीसाठी अनुदान मिळते. स्वतः संशोधन करुन विकसित केलेल्या बांबू लागवड प्रकल्पातून पश्‍चिम महाराष्ट्रात प्रदुषणमुक्त पर्यावरण करण्याचे उद्दिष्ट डॉ. येरटे यांनी ठेवले आहे. जिल्ह्यात पाचशे शेतकऱ्यांचा गट झाला तर त्यांना केंद्र सरकारच्या कार्बन क्रेडीट योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येणे गरजेचे आहे.

आज या बांबू लागवडीमुळे एकीकडे 50 टन ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो. तर त्याच्या दुप्पट म्हणजे 116 टन कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतला जातो. दुसरीकडे या बांबू मुळे पक्ष्यांनाही त्यांचा अधिवास मिळाला आहे. विविध प्रकारच्या पक्ष्यांनी बांबूच्या बनामध्ये घरटी तयार केली आहेत. मधमाशांनी पोळे तयार केले आहेत.

    बांबू लागवड ऑक्सिजन उत्सर्जन  कार्बनडाय ऑक्साईड शोषण
सांगली 10017  20 टन   50 टन
कोल्हापूर  1750  3.5 टन  10 टन
सातारा 550 1.2 टन 3 टन
सोलापूर  8100 16 टन 38 टन
अहमदनगर 2500  5 टन 7.5 टन
बीड  2550 5.1 टन 7.7 टन
       
एकूण 25467 50.8 टन 116.2 टन

 

महत्त्वाच्या बातम्या

चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget