एक्स्प्लोर

Bamboo : बांबू वाचवतोय पर्यावरणाचे प्राण... सांगलीनंतर सहा जिल्ह्यात बांबू लागवड जोरात

Bamboo Plantation: सांगलीनंतर  कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांत बांबू लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

सांगली: वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा गुदमरत चाललेला प्राण वाचवण्याचे काम बांबू लागवड चळवळीतून केला जात आहे. कोरोना टाळेबंदीच्या काळात सांगलीत (Sangli Bamboo Plantation) सुरु झालेली ही चळवळ आतापर्यंत राज्यातील सहा जिल्ह्यात पसरली आहे. यामधून पंचवीस हजारावर बांबूची लागवड झाली असून त्यातून रोज 50 टन ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो. तर त्याच्या दुप्पट म्हणजे 116 टन कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतला जातो. सांगली कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड या जिल्ह्यात बांबू लागवड वाढली आहे. 

सांगलीतील बांबू तज्ज्ञ डॉ. दीपक येरटे यांनी या बांबू लागवड चळवळीचा प्रारंभ कोरोना टाळेबंदीच्या काळात सुरु केला. बांबू झाडांची लागवड आता दहा हजारांवर पोहचली आहे. यातून रोज वीस टन प्राणवायूची म्हणजेच ऑक्सिजनची वातावरणात भर टाकली जात आहे. तर 50 टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो. खडकाळ, क्षारपड, पूरग्रस्त भागातील जमीन, कमी पाण्याची जमिनीत बांबूची लागवड करता येते. शिवाय बांबूला चांगला दर मिळत असल्याने याच्या लागवडीने दुहेरी फायदा मिळतो.

शेतकऱ्यांची अनुत्पादक जमीन लागवडीखाली येते. त्यातून 40 वर्षांपर्यंत उत्पन्न मिळते आणि पर्यावरणातील प्राणवायूचे प्रमाण वाढून प्रदूषण कमी होते. जिल्ह्यात क्षारपड जमिनीचे प्रमाण मोठे आहे. तेथे बांबूची लागवड व्हावी यासाठी डॉ. येरटे यांचे प्रयत्न सुरु आहेत. याबरोबरच त्यांनी सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांमध्येही ही चळवळ वाढवण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याला शेतकऱ्यांचा हळूहळू प्रतिसाद मिळू लागला आहे.

राज्य शासनाच्या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत बांबू लागवडीसाठी अनुदान मिळते. स्वतः संशोधन करुन विकसित केलेल्या बांबू लागवड प्रकल्पातून पश्‍चिम महाराष्ट्रात प्रदुषणमुक्त पर्यावरण करण्याचे उद्दिष्ट डॉ. येरटे यांनी ठेवले आहे. जिल्ह्यात पाचशे शेतकऱ्यांचा गट झाला तर त्यांना केंद्र सरकारच्या कार्बन क्रेडीट योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येणे गरजेचे आहे.

आज या बांबू लागवडीमुळे एकीकडे 50 टन ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो. तर त्याच्या दुप्पट म्हणजे 116 टन कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतला जातो. दुसरीकडे या बांबू मुळे पक्ष्यांनाही त्यांचा अधिवास मिळाला आहे. विविध प्रकारच्या पक्ष्यांनी बांबूच्या बनामध्ये घरटी तयार केली आहेत. मधमाशांनी पोळे तयार केले आहेत.

    बांबू लागवड ऑक्सिजन उत्सर्जन  कार्बनडाय ऑक्साईड शोषण
सांगली 10017  20 टन   50 टन
कोल्हापूर  1750  3.5 टन  10 टन
सातारा 550 1.2 टन 3 टन
सोलापूर  8100 16 टन 38 टन
अहमदनगर 2500  5 टन 7.5 टन
बीड  2550 5.1 टन 7.7 टन
       
एकूण 25467 50.8 टन 116.2 टन

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget