एक्स्प्लोर

Bamboo : बांबू वाचवतोय पर्यावरणाचे प्राण... सांगलीनंतर सहा जिल्ह्यात बांबू लागवड जोरात

Bamboo Plantation: सांगलीनंतर  कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांत बांबू लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

सांगली: वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा गुदमरत चाललेला प्राण वाचवण्याचे काम बांबू लागवड चळवळीतून केला जात आहे. कोरोना टाळेबंदीच्या काळात सांगलीत (Sangli Bamboo Plantation) सुरु झालेली ही चळवळ आतापर्यंत राज्यातील सहा जिल्ह्यात पसरली आहे. यामधून पंचवीस हजारावर बांबूची लागवड झाली असून त्यातून रोज 50 टन ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो. तर त्याच्या दुप्पट म्हणजे 116 टन कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतला जातो. सांगली कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड या जिल्ह्यात बांबू लागवड वाढली आहे. 

सांगलीतील बांबू तज्ज्ञ डॉ. दीपक येरटे यांनी या बांबू लागवड चळवळीचा प्रारंभ कोरोना टाळेबंदीच्या काळात सुरु केला. बांबू झाडांची लागवड आता दहा हजारांवर पोहचली आहे. यातून रोज वीस टन प्राणवायूची म्हणजेच ऑक्सिजनची वातावरणात भर टाकली जात आहे. तर 50 टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो. खडकाळ, क्षारपड, पूरग्रस्त भागातील जमीन, कमी पाण्याची जमिनीत बांबूची लागवड करता येते. शिवाय बांबूला चांगला दर मिळत असल्याने याच्या लागवडीने दुहेरी फायदा मिळतो.

शेतकऱ्यांची अनुत्पादक जमीन लागवडीखाली येते. त्यातून 40 वर्षांपर्यंत उत्पन्न मिळते आणि पर्यावरणातील प्राणवायूचे प्रमाण वाढून प्रदूषण कमी होते. जिल्ह्यात क्षारपड जमिनीचे प्रमाण मोठे आहे. तेथे बांबूची लागवड व्हावी यासाठी डॉ. येरटे यांचे प्रयत्न सुरु आहेत. याबरोबरच त्यांनी सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, बीड या जिल्ह्यांमध्येही ही चळवळ वाढवण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्याला शेतकऱ्यांचा हळूहळू प्रतिसाद मिळू लागला आहे.

राज्य शासनाच्या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत बांबू लागवडीसाठी अनुदान मिळते. स्वतः संशोधन करुन विकसित केलेल्या बांबू लागवड प्रकल्पातून पश्‍चिम महाराष्ट्रात प्रदुषणमुक्त पर्यावरण करण्याचे उद्दिष्ट डॉ. येरटे यांनी ठेवले आहे. जिल्ह्यात पाचशे शेतकऱ्यांचा गट झाला तर त्यांना केंद्र सरकारच्या कार्बन क्रेडीट योजनेचा लाभ मिळू शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे येणे गरजेचे आहे.

आज या बांबू लागवडीमुळे एकीकडे 50 टन ऑक्सिजन वातावरणात सोडला जातो. तर त्याच्या दुप्पट म्हणजे 116 टन कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतला जातो. दुसरीकडे या बांबू मुळे पक्ष्यांनाही त्यांचा अधिवास मिळाला आहे. विविध प्रकारच्या पक्ष्यांनी बांबूच्या बनामध्ये घरटी तयार केली आहेत. मधमाशांनी पोळे तयार केले आहेत.

    बांबू लागवड ऑक्सिजन उत्सर्जन  कार्बनडाय ऑक्साईड शोषण
सांगली 10017  20 टन   50 टन
कोल्हापूर  1750  3.5 टन  10 टन
सातारा 550 1.2 टन 3 टन
सोलापूर  8100 16 टन 38 टन
अहमदनगर 2500  5 टन 7.5 टन
बीड  2550 5.1 टन 7.7 टन
       
एकूण 25467 50.8 टन 116.2 टन

 

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवली, किती तारखेपर्यंत भरता येणार पिक विमा?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! प्रधानमंत्री पिक विमा योजनेची मुदत वाढवण्याची मागणी, खासदा ओमराजेंचं कृषीमंत्र्यांना पत्र
Tanaji Sawant: लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
लोकांचे संसार जळायला लागलेत अन् तुम्ही म्हणता बघून घेतो, म्हणजे काय? शेतकरी पिक विमा प्रश्नावर आमदार तानाजी सावंत संतप्त, तहसीलदारांनाच सुनावलं
Dattatray Bharane: शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
शेतकऱ्यांनो अजिबात काळजी करू नका, राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांची प्रोत्साहन यादी, 2 लाख थकबाकी असलेल्या सर्वांची कर्जमाफी होणार : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Maharashtra Live blog updates: आंबा घाटात अवजड वाहनांना बंदी; मुसळधार पावसामुळे रस्त्याला भेगा पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Embed widget