एक्स्प्लोर

वाढत्या तापमानाचा फटका शेतकऱ्यांना, नंदुरबारमध्ये पपई बागा उद्ध्वस्त!

हापूस आंब्यापाठोपाठ आता पपईलाही वाढत्या तापमान वाढीचा फटका बसत आहे. नंदुरबारमधील तापमान वाढल्याने पपईच्या बागा उद्ध्वस्त होत आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.

नंदुरबार : वाढते तापमान आणि विषाणूजन्य आजारांमुळे होणारी पानगळ अशा दुहेरी संकटात नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी सापडला आहे. विषाणूजन्य आजारांमुळे पानगळ तर वाढत्या तापमानात पपईची फळे पिवळे पडत असल्याने शेतकऱ्यांचा बागा उद्ध्वस्त होत आहेत. पिकासाठी केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात पाच हजार हेक्टर क्षेत्रावर पपई पिकाची लागवड केली जाते. या वर्षी पपईचा हंगाम सुरु झाला आणि दराचा मुद्दा समोर आला. त्यातून मार्ग निघाला नाही तोच दुष्काळात तेरावा महिना म्हणावं अशी गत झाली आहे. जिल्ह्यात अचानक तापमानात वाढ झाली. तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर गेला. त्यात आणखी भर म्हणजे पपईवर आलेल्या विषाणूजन्य रोगांमुळे पानगळ झाली. पानगळ झाल्याने सूर्यप्रकाश थेट फळावर पडत असल्याने त्याचा परिणाम पपईच्या फळावर झाला. फळं  झाडावरच खराब होऊन पिवळी पडत असल्याने ती काढून फेकल्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांकडे उरलेला नाही. तर काही ठिकाणी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी गोणपाटाचे आवरण टाकावं लागत आहे.

हापूस आंब्यामागील शुक्लकाष्ठ कायम
तिकडे कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्यालाही तापमान वाढीचा फटका बसत आहे. अगदी मार्चपासून बाजारात मिळणाऱ्या हापूसची प्रत्येक जण मोठ्या आतुरतेने वाट पाहतो. हापूसमुळे होणारी आर्थिक उलाढाल देखील मोठी. पण, हाच हापूस सध्या संकटांच्या मालिकेतून बाहेर पडताना काही दिसत नाही. मागील दोन वर्षे आलेली निसर्ग आणि तोक्ते वादळ, वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, लांबलेली थंडी यांमुळे हापूसच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. परिणामी, शेतकऱ्यांना औषधं आणि फवारणीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात देखील वाढ झाली. पण, हे सारं केल्यानंतर देखील हापूसवरचं संकट काही टळताना दिसत नाही. कारण, चाळीशी पार गेलेला उन्हाचा पारा याच हापूसकरता मारक ठरत असल्याचं शेतकरी सांगतात. गेले काही दिवस कोकणातील वातावरण उष्ण आहे. परिणामी सुपारी आणि बोराच्या आकाराची झालेली फळं आता देठ सुकत असल्याने गळून पडत आहेत. उन्हामुळे फळांवर डाग पडू नयेत म्हणून फवारणी करावी लागत असल्याने खर्चात देखील वाढ झाली आहे. अचानक उष्णतेमध्ये वाढ झाली आणि हापूसला मोठा फटका बसत आहे. दरम्यान, अशाच प्रकारे उन्हाच्या कडाक्यात वाढ झाल्यास फळगळ वाढण्याची देखील शक्यता आहे. उष्णतेमुळे पुनर्मोहरामुळे तयार झालेल्या फळाला देखील फटका बसण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. 

१७ वर्षापासून पत्रकारितेचा अनुभव,   कृषी विषयक पत्रकारीते पासून सुरुवात
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

टॉवर लाईनचा योग्य मोबदला न मिळाल्यानं धाराशिवमध्ये शेतकरी आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन सुरु
टॉवर लाईनचा योग्य मोबदला न मिळाल्यानं धाराशिवमध्ये शेतकरी आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन सुरु
Unseasonal Rains : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा, पंकजा मुंडेंचे बीड जिल्हा प्रशासनाला निर्देश 
Unseasonal Rains : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करा, पंकजा मुंडेंचे बीड जिल्हा प्रशासनाला निर्देश 
एका बाजुला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळीसह गारपीट, रब्बी पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
एका बाजुला उन्हाचा तडाखा तर दुसऱ्या बाजूला अवकाळीसह गारपीट, रब्बी पिकांना मोठा फटका, शेतकरी चिंतेत
अवकाळी पावसाचा धुमाकूळ! फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, राज्यात कुठं कुठं पडतोय पाऊस?
अवकाळी पावसाचा धुमाकूळ! फळ उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका, राज्यात कुठं कुठं पडतोय पाऊस?

व्हिडीओ

Jaykumar Gore Satara : सातारा एसपींचे निलंबन मागे घ्या, जयकुमार गोरे आक्रमक
Eknath Shinde On Satara : सातारा ZP निवडणूक, एसपींचं निलंबन; फडणवीसांसमोर शिंदे म्हणाले....
Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मोदीजींची अंधभक्त असल्याचा अभिमान...'; उपमुख्यमंत्र्यांच्या Ex पत्नीची पोस्ट, 'धुरंधर 2'ची क्लिप शेअर करत म्हणाली...
'मोदीजींची अंधभक्त असल्याचा अभिमान...'; उपमुख्यमंत्र्यांच्या Ex पत्नीची पोस्ट, 'धुरंधर 2'ची क्लिप शेअर करत म्हणाली...
सभापती राम शिंदे नीलम गोऱ्हेंचा निर्णय फिरवणार? साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या निर्णयावरुन वातावरण तापलं
सभापती राम शिंदे नीलम गोऱ्हेंचा निर्णय फिरवणार? साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या निर्णयावरुन वातावरण तापलं
Raj Thackeray:
"कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?" 'अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेव्हा खरंच...' राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
Satara ZP Election : मोठी बातमी : कथित अपहरण झालेला सदस्य सातारा पोलिसात दाखल, बापू शिंदेंच्या एन्ट्रीने ZP निवडणुकीचं गणित बदलणार?
मोठी बातमी : कथित अपहरण झालेला सदस्य सातारा पोलिसात दाखल, बापू शिंदेंच्या एन्ट्रीने ZP निवडणुकीचं गणित बदलणार?
मोठी बातमी : भाजपकडून गळचेपी, आम्ही राजीनामा देऊ, शिवसेना मंत्र्यांची एकनाथ शिंदेंसमोर टोकाची भूमिका
मोठी बातमी : भाजपकडून गळचेपी, आम्ही राजीनामा देऊ, शिवसेना मंत्र्यांची एकनाथ शिंदेंसमोर टोकाची भूमिका
सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
सातारा पोलिस अधीक्षकांचे निलंबन करा; उपसभापती निलम गोऱ्हेंकडून निर्देश; सातारा झेडपी राड्याची गंभीर दखल, शिवसेना नेत्यांचा आक्रमक पवित्रा
Ahilyanagar Crime Adinath Maharaj: तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांबाबत धक्कादायक माहिती, स्वत:च्या हातांनी गुप्तांग छाटलं, सात दिवसांनी कारण सांगितलं
तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांबाबत धक्कादायक माहिती, स्वत:च्या हातांनी गुप्तांग छाटलं, सात दिवसांनी कारण सांगितलं
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
Embed widget