एक्स्प्लोर

वाढत्या तापमानाचा फटका शेतकऱ्यांना, नंदुरबारमध्ये पपई बागा उद्ध्वस्त!

हापूस आंब्यापाठोपाठ आता पपईलाही वाढत्या तापमान वाढीचा फटका बसत आहे. नंदुरबारमधील तापमान वाढल्याने पपईच्या बागा उद्ध्वस्त होत आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे.

नंदुरबार : वाढते तापमान आणि विषाणूजन्य आजारांमुळे होणारी पानगळ अशा दुहेरी संकटात नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी सापडला आहे. विषाणूजन्य आजारांमुळे पानगळ तर वाढत्या तापमानात पपईची फळे पिवळे पडत असल्याने शेतकऱ्यांचा बागा उद्ध्वस्त होत आहेत. पिकासाठी केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात पाच हजार हेक्टर क्षेत्रावर पपई पिकाची लागवड केली जाते. या वर्षी पपईचा हंगाम सुरु झाला आणि दराचा मुद्दा समोर आला. त्यातून मार्ग निघाला नाही तोच दुष्काळात तेरावा महिना म्हणावं अशी गत झाली आहे. जिल्ह्यात अचानक तापमानात वाढ झाली. तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसवर गेला. त्यात आणखी भर म्हणजे पपईवर आलेल्या विषाणूजन्य रोगांमुळे पानगळ झाली. पानगळ झाल्याने सूर्यप्रकाश थेट फळावर पडत असल्याने त्याचा परिणाम पपईच्या फळावर झाला. फळं  झाडावरच खराब होऊन पिवळी पडत असल्याने ती काढून फेकल्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांकडे उरलेला नाही. तर काही ठिकाणी उष्णतेपासून बचाव करण्यासाठी गोणपाटाचे आवरण टाकावं लागत आहे.

हापूस आंब्यामागील शुक्लकाष्ठ कायम
तिकडे कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्यालाही तापमान वाढीचा फटका बसत आहे. अगदी मार्चपासून बाजारात मिळणाऱ्या हापूसची प्रत्येक जण मोठ्या आतुरतेने वाट पाहतो. हापूसमुळे होणारी आर्थिक उलाढाल देखील मोठी. पण, हाच हापूस सध्या संकटांच्या मालिकेतून बाहेर पडताना काही दिसत नाही. मागील दोन वर्षे आलेली निसर्ग आणि तोक्ते वादळ, वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, लांबलेली थंडी यांमुळे हापूसच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. परिणामी, शेतकऱ्यांना औषधं आणि फवारणीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात देखील वाढ झाली. पण, हे सारं केल्यानंतर देखील हापूसवरचं संकट काही टळताना दिसत नाही. कारण, चाळीशी पार गेलेला उन्हाचा पारा याच हापूसकरता मारक ठरत असल्याचं शेतकरी सांगतात. गेले काही दिवस कोकणातील वातावरण उष्ण आहे. परिणामी सुपारी आणि बोराच्या आकाराची झालेली फळं आता देठ सुकत असल्याने गळून पडत आहेत. उन्हामुळे फळांवर डाग पडू नयेत म्हणून फवारणी करावी लागत असल्याने खर्चात देखील वाढ झाली आहे. अचानक उष्णतेमध्ये वाढ झाली आणि हापूसला मोठा फटका बसत आहे. दरम्यान, अशाच प्रकारे उन्हाच्या कडाक्यात वाढ झाल्यास फळगळ वाढण्याची देखील शक्यता आहे. उष्णतेमुळे पुनर्मोहरामुळे तयार झालेल्या फळाला देखील फटका बसण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. 

१७ वर्षापासून पत्रकारितेचा अनुभव,   कृषी विषयक पत्रकारीते पासून सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सत्तेत असून सरकारच्या चुका दाखवून देण्यासाठी हिंमत लागते, निलेश राणेंचं कौतुक करावे तेवढं थोडं : रोहित पवार 
सत्तेत असून सरकारच्या चुका दाखवून देण्यासाठी हिंमत लागते, निलेश राणेंचं कौतुक करावे तेवढं थोडं : रोहित पवार 
Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, 'जाचक अटींमुळे सरकारची प्रतिमा मलीन होतेय...'
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर; म्हणाले, 'जाचक अटींमुळे सरकारची प्रतिमा मलीन होतेय...'
Onion Farmers: नाफेड अन् एनसीसीएफ खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ कायम; 18 खरेदी केंद्रांवर शुकशुकाट; तर भंडाऱ्यात कृषी वीज महिनाभरापासून बंद, शेतकऱ्यांचा निर्वाणीचा इशारा
नाफेड अन् NCCF खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ कायम; 18 खरेदी केंद्रांवर शुकशुकाट; तर भंडाऱ्यात कृषी वीज महिनाभरापासून बंद, शेतकऱ्यांचा निर्वाणीचा इशारा
Farmers Loan Waiver : दिलासादायक! 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी मिळणार, दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा 56 लाख शेतकऱ्यांना येणार कर्जमाफीचा मेसेज
दिलासादायक! 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी मिळणार, दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा 56 लाख शेतकऱ्यांना येणार कर्जमाफीचा मेसेज

व्हिडीओ

Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!
Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
'एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?' शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच
'एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?' शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच
Share Market : शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांना तेजीनंतरही फटका बसला, किती रुपयांचं नुकसान?
शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांना तेजीनंतरही फटका बसला, किती रुपयांचं नुकसान?
Dharashiv : शिंदेंकडे शेवटी गेलेल्या खासदाराला 95 कोटी दिले, वर्षाला 250 कोटींचं आश्वासन; शरद पवारांच्या आमदाराचा ओमराजे निंबाळकरांकडे रोख? 
शिंदेंकडे शेवटी गेलेल्या खासदाराला 95 कोटी दिले, वर्षाला 250 कोटींचं आश्वासन; शरद पवारांच्या आमदाराचा ओमराजे निंबाळकरांकडे रोख? 
'जे बोलायचं, लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा, कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा, पोलीस आहेत सर्व त्यांच्यासमोर सांगतोय..' संजय पाटलांचा आई बहिण काढत मस्तवालपणााचा कळस
'जे बोलायचं, लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा, कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा, पोलीस आहेत सर्व त्यांच्यासमोर सांगतोय..' संजय पाटलांचा आई बहिण काढत मस्तवालपणााचा कळस
Eknath Shinde and Sanjay Dina Patil: ठाकरेंची साथ सोडून दुसऱ्या पक्षात जाताच तावातावात नको ते बोलले, संजय दिना पाटलांना एकनाथ शिंदेंचा ओरडा पडला, नव्या खासदारांना सूचना
ठाकरेंची साथ सोडून दुसऱ्या पक्षात जाताच तावातावात नको ते बोलले, संजय दिना पाटलांना एकनाथ शिंदेंचा ओरडा पडला, नव्या खासदारांना सूचना
सत्ताधारी आमदारांमध्येच कलगीतुरा! प्रवीण दरेकर काल म्हणाले, तुमच्यापेक्षा मी 10 पटीने ओरडू शकतो, दादागिरी चालणार नाही; आज बच्चू कडू म्हणाले, 'सरकार बदनाम होत आहे त्यामुळे..'
सत्ताधारी आमदारांमध्येच कलगीतुरा! प्रवीण दरेकर काल म्हणाले, तुमच्यापेक्षा मी 10 पटीने ओरडू शकतो, दादागिरी चालणार नाही; आज बच्चू कडू म्हणाले, 'सरकार बदनाम होत आहे त्यामुळे..'
Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षा 29 जूनला सुनावली जाणार, 39 मिनिटे चिमुरडीला ओरबाडत राहिला, अंगावर 18 जखमेच्या खुणा, तरी नराधमाच्या चेहऱ्यावर पश्चातापाची रेष सुद्धा नाही
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षा 29 जूनला सुनावली जाणार, 39 मिनिटे चिमुरडीला ओरबाडत राहिला, अंगावर 18 जखमेच्या खुणा, तरी नराधमाच्या चेहऱ्यावर पश्चातापाची रेष सुद्धा नाही
Embed widget