एक्स्प्लोर

Punjab Farmers Protest : थकलेल्या ऊस बिलावरुन पंजाबमधील शेतकरी पुन्हा आक्रमक, देशव्यापी आंदोलनाचा इशारा

पंजाबमधील शेतकरी संघटना (punjab farmers organization) पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी (Farmers) पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Punjab Farmers Protest : पंजाबमधील शेतकरी संघटना (punjab farmers organization) पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी (Farmers) पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या उसाची देणी न दिल्यामुळं शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन सुरु आहे.  गोल्डन संधार शुगर मिल्स लिमिटेडकडून शेतकऱ्यांना सुमारे 72 कोटी रुपये येणं बाकी आहे. या पैशांच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी दिल्ली-अमृतसर महामार्गाच्या (Delhi-Amritsar Highway) एका लेनवर आंदोलन सुरु केलं आहे.

उसाचे बील न दिल्याच्या मागणीवरुन पंजाबमधील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. 72 कोटी रुपयांची थकबाकी कारखान्यांकडे थकली आहे. तसेच 2019-20 मध्ये 30 कोटी रुपयांची थकबाकी कारखान्यांकडे आहे. अद्याप ते पैसे शेकऱ्यांना मिळाले नाहीत. तसेच 2020-2021 मध्ये सात कोटी रुपयांची थकबाकी, 2021-2022 मध्ये त्यांच्याकडे 35 कोटी रुपयांची थकबाकी आहे.
या पैशांची मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांची देणी न दिल्यास देशव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिली आहे. 

पंजाबमधील चार जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे हजारो रुपये थकवले आहेत. उसाचा हंगाम संपल्याने साखर कारखाने बंद आहेत. याबाबत गिरणी मालक व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. सुखबीर सिंग संदार हे सध्या मिलचे विद्यमान मालक आहेत. यापूर्वी मिलमध्ये तीन भागधारक होते. सुखबीर सिंग संदार, जर्नेलसिंग वाहिद, जसविंदर सिंग बैंस हे भागधारक होते. सुखबीर सिंग संदार सध्या इंग्लंडमध्ये आहेत. जर्नेल सिंग वाहिद हे अकाली दलाच्या संबंधीत आहेत. त्यांनी 2017 मध्ये त्यांनी नवनशहरमधून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

संयुक्त किसान मोर्चाही आक्रमक

दरम्यान,  संयुक्त किसान मोर्चा देखील पुन्हा आक्रमक झाला आहे. विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाकडून 31 जुलैला आंदोलन करण्यात आलं होतं. देशातील विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होते. या आंदोलनाला पंजाबमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला होता. किमान आधारभूत किंमतीच्या बाबतीत केंद्र सरकारनं आश्वासनं दिलं होतं. मात्र, ते आश्वासन सरकारनं पू्ण केलं नाही. तसेच कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे देखील अद्याप मागे घेतली नाहीत या मुद्यावर संयुक्त किसान मोर्चानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर खेरी घटनेतील दोषींना शिक्षा, बेकायदेशीर कारवाई करण्यात आलेल्या  शेतकर्‍यांना जामीन मिळावा,  शेतकर्‍यांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत, या मागण्या संयुक्त किसान मोर्चाने केल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget