एक्स्प्लोर

SKM Protest : संयुक्त किसान मोर्चा पुन्हा आक्रमक, देशाच्या विविध भागत केंद्र सरकार विरोधात चक्का जाम

विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाकडून आज आंदोलन करण्यात येत आहे. देशातील विविध ठिकाणी आज चक्का जाम आंदोलन सुरु आहे.

Sanyukt Kisan Morcha Protest : संयुक्त किसान मोर्चानं (Sanyukt Kisan Morcha) पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. विविध मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाकडून आज आंदोलन करण्यात येत आहे. देशातील विविध ठिकाणी आज चक्का जाम आंदोलन सुरु आहे. शहीद उधम सिंग यांच्या हुतात्मा दिनानिमित्त हे आंदोलन सुरु आहे. या चक्का जाम आंदोलनाला पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या प्रमाणावर शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे.

या मागण्यांसाठी आंदोलन 

किमान आधारभूत किंमतीच्या बाबतीत केंद्र सरकारनं आश्वासनं दिलं होतं. मात्र, ते आश्वासन सरकारनं पू्ण केलं नाही. तसेच कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते गुन्हे देखील अद्याप मागे घेतली नाहीत या मुद्यावर संयुक्त किसान मोर्चानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. लखीमपूर खेरी घटनेतील दोषींना शिक्षा, बेकायदेशीर कारवाई करण्यात आलेल्या  शेतकर्‍यांना जामीन मिळावा,  शेतकर्‍यांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत, या मागण्या संयुक्त किसान मोर्चाने केल्या आहेत. 


SKM Protest : संयुक्त किसान मोर्चा पुन्हा आक्रमक, देशाच्या विविध भागत केंद्र सरकार विरोधात चक्का जाम

दुपारी  तीन वाजेपर्यंत आंदोलन सुरु राहणार 

एमएसपी कायदा हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. मात्र, केंद्र सरकार माघार घेत आहे. पण शेतकरी त्यांचा हक्क घेणार असल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी म्हटले आहे. या चक्का जाममुळं सर्वसामान्यांना कोणतीही अडचण होणार नाही किंवा अत्यावश्यक सेवाही विस्कळीत होणार नसल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी दिली आहे. आज सकाळी 11 वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत आजचे धरणे आंदोलन सुरु राहणार आहे. 

पोलिसांचा चोख बंदोबस्त

दरम्यान, संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनाचा प्रभाव असलेल्या पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्याची पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी तब्बल वर्षभर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सिमेवर आंदोलन केले होते. केंद्र सरकारने कायदे रद्द केल्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र, सरकारने त्यावेळी शेतकऱ्यांच्या अन्य मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देखील दिले होते. मात्र, अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला

व्हिडीओ

Shriraj Bharane विकासाच्या मुद्द्यावर लढवणार,दत्तात्रय भरणेंचे चिरंजीव श्रीराज भरणे निवडणूक रिंगणात
Raju Patil MNS on KDMC : सत्तेला चिकटलो तर काहीतरी मिळेल!मनसेचे राजू पाटलांचं धक्कादायक वक्तव्य
Adv Asim Sarode Pune : धनुष्यबाण निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरेंच्या गटाला मिळणार?असीम सरोदे काय म्हणाले?
Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
मुंबई जमगई... रात्रीच्या अंधारात लाल दिवे अन् वाहनांच्या रांगाच रांगा; अग्निशमन गाडीही अडकली
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
भाजपला सोडून ठाकरेंकडे आल्या, आता फुटल्या?; कोण आहेत मुंबईच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के
Sarita Mhaske : मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील ठाकरे गटाची पहिली नगरसेविका फुटली, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, कुणाच्या गळाला लागली?
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईतील कंपन्यांशी स्वित्झर्लंडमध्ये जाऊन करार का? दावोस दौऱ्यावरुन काँग्रेसचा सवाल, कंपन्यांचा मुंबईतला पत्ताच सांगितला
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
मुंबईत ठाकरेंची पहिली नगरसेविका फुटली, अनिल परबांचं स्पष्टीकरण, म्हणाले, त्या फुटल्या नाहीत
Julia Ain: 'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
'माझ्या स्तनांमुळे मला अमेरिकेचा O-1B व्हिसा मिळाला' सोशल मीडिया स्टारची बेधडक प्रतिक्रिया का चर्चेत आली?
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
केडीएमसीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली, ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; राऊत म्हणाले, राज ठाकरेंशी बोललो
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
Embed widget