एक्स्प्लोर

APMC Market : 50 किलोच्या वर शेतमालाची गोणी येत असल्यानं माथाडी कामगार आक्रमक, प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांना फटका

बाजारात येणारा शेतमाल हा गोण्यांमध्ये येतो. या गोण्यांचे वजन हे 50 किलोपेक्षा जास्त असते. ते कमी करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून माथाडी कामगार करत आहेत.

Navi Mumbai APMC Market : नवी मुंबईच्या बाजार समितीत महाराष्ट्राबरोबर परराज्यातून मोठ्या प्रमाणात शेतमाल येत असतो. पाठवण्यात येणारा शेतमाल गोण्यांमध्ये असल्याने त्याचे वजन 50 किलोपर्यंत असावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून माथाडी कामगार करत आहेत. मात्र, याकडे एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी वर्गाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे माथाडी कामगारांकडून अनेक वेळा आंदोलनाचा पवित्रा घेतात. तसेच अनेकवेळा कामबंद आंदोलन देखील करण्यात येते. याचा फटका मात्र शेतकरी वर्गाला सहन करावा लागत आहे.

एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये 60 ते 70 किलोपर्यंत वजनाच्या गोण्या भरून येतात. या गोण्या रोज उचलून माथाडी कामगारांना शारीरीक इजा झाल्या आहेत. तर कामगार कामसस्वरूपी मनक्याच्या आजाराने बाद झाले आहेत. यावर राज्य सरकार आणि एपीएमसी प्रशासनाने लक्ष देवून शेतमालाच्या गोण्यांचे वजन 50 किलोपर्यंत असावे अशी मागणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना केली होती. गेल्या अनेक वर्षापासून माथाडी कामगारांच्या असलेल्या या मागणीकडे एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अखेर काल (सोमवार) सकाळपासून अचानक माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने कांदा बटाटा मार्केट मधील व्यापार बंद पडला होता.


APMC Market : 50 किलोच्या वर शेतमालाची गोणी येत असल्यानं माथाडी कामगार आक्रमक, प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांना फटका

एपीएमसीमधील दाना मार्केट, मसाला मार्केट येथे 50 किलो वजनाचा शेतमाल येवू लागला आहे. मात्र, कांदा बटाटा मार्केटमध्ये हेच वजन अद्याप 60 किलो पर्यंत आहे. याबाबत व्यापारी वर्ग आणि माथाडी कामगार यांच्यात अनेकवेळा बैठकाही झाल्या आहेत. यासाठी माथाडी कामगारांनी तीन, चार आंदोलने देखील केली आहेत. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे अखेर काल (सोमवार) सकाळपासून अचानक माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने कांदा बटाटा मार्केट मधील व्यापार बंद पडला होता. याचा फटका मात्र, शेतकऱ्यांना बसत आहे.

300 गाड्यांची आवक पडून

सोमवारी दिवसभर आंदोलन सुरू असल्याने कांदा, बटाटा मार्केटमध्ये आलेली 300 गाड्यांची आवक पडून होती. कांदा गाड्यांमध्येच पडून राहिल्याने तो खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, संध्याकाळी चारनंतर माथाडी कामगारांनी आंदोलन मागे घेत व्यापार सुरू झाल्याने रात्री उशीरापर्यंत 300 गाड्या आलेल्या कांद्याचा 60 टक्के खप झाला आहे. काल राहिलेल्या शंभर गाड्या शिल्लक असल्याने आज फक्त 80 कांदा गाड्यांची आवक झाली आहे. वारंवार काम बंद आंदोलन होत असल्याने याचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाय काढण्याची मागणी मार्केटमधील सर्व घटकांकडून होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
जिरायती भागात पाणीटंचाई होऊ देणार नाही, युगेंद्र पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन, जानाई शिरसाई योजनेची पाहणी
जिरायती भागात पाणीटंचाई होऊ देणार नाही, युगेंद्र पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन, जानाई शिरसाई योजनेची पाहणी
Iran Vs Israel War: इराण- अमेरिका युद्धामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट, सांगलीची हजारो टन हळद मुंबईतील बंदरात पडून, भावही कोसळला
इराण- अमेरिका युद्धामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट, सांगलीची हजारो टन हळद मुंबईतील बंदरात पडून, भावही कोसळला
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget