एक्स्प्लोर

APMC Market : 50 किलोच्या वर शेतमालाची गोणी येत असल्यानं माथाडी कामगार आक्रमक, प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांना फटका

बाजारात येणारा शेतमाल हा गोण्यांमध्ये येतो. या गोण्यांचे वजन हे 50 किलोपेक्षा जास्त असते. ते कमी करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून माथाडी कामगार करत आहेत.

Navi Mumbai APMC Market : नवी मुंबईच्या बाजार समितीत महाराष्ट्राबरोबर परराज्यातून मोठ्या प्रमाणात शेतमाल येत असतो. पाठवण्यात येणारा शेतमाल गोण्यांमध्ये असल्याने त्याचे वजन 50 किलोपर्यंत असावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून माथाडी कामगार करत आहेत. मात्र, याकडे एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी वर्गाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे माथाडी कामगारांकडून अनेक वेळा आंदोलनाचा पवित्रा घेतात. तसेच अनेकवेळा कामबंद आंदोलन देखील करण्यात येते. याचा फटका मात्र शेतकरी वर्गाला सहन करावा लागत आहे.

एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये 60 ते 70 किलोपर्यंत वजनाच्या गोण्या भरून येतात. या गोण्या रोज उचलून माथाडी कामगारांना शारीरीक इजा झाल्या आहेत. तर कामगार कामसस्वरूपी मनक्याच्या आजाराने बाद झाले आहेत. यावर राज्य सरकार आणि एपीएमसी प्रशासनाने लक्ष देवून शेतमालाच्या गोण्यांचे वजन 50 किलोपर्यंत असावे अशी मागणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना केली होती. गेल्या अनेक वर्षापासून माथाडी कामगारांच्या असलेल्या या मागणीकडे एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अखेर काल (सोमवार) सकाळपासून अचानक माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने कांदा बटाटा मार्केट मधील व्यापार बंद पडला होता.


APMC Market : 50 किलोच्या वर शेतमालाची गोणी येत असल्यानं माथाडी कामगार आक्रमक, प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांना फटका

एपीएमसीमधील दाना मार्केट, मसाला मार्केट येथे 50 किलो वजनाचा शेतमाल येवू लागला आहे. मात्र, कांदा बटाटा मार्केटमध्ये हेच वजन अद्याप 60 किलो पर्यंत आहे. याबाबत व्यापारी वर्ग आणि माथाडी कामगार यांच्यात अनेकवेळा बैठकाही झाल्या आहेत. यासाठी माथाडी कामगारांनी तीन, चार आंदोलने देखील केली आहेत. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे अखेर काल (सोमवार) सकाळपासून अचानक माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने कांदा बटाटा मार्केट मधील व्यापार बंद पडला होता. याचा फटका मात्र, शेतकऱ्यांना बसत आहे.

300 गाड्यांची आवक पडून

सोमवारी दिवसभर आंदोलन सुरू असल्याने कांदा, बटाटा मार्केटमध्ये आलेली 300 गाड्यांची आवक पडून होती. कांदा गाड्यांमध्येच पडून राहिल्याने तो खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, संध्याकाळी चारनंतर माथाडी कामगारांनी आंदोलन मागे घेत व्यापार सुरू झाल्याने रात्री उशीरापर्यंत 300 गाड्या आलेल्या कांद्याचा 60 टक्के खप झाला आहे. काल राहिलेल्या शंभर गाड्या शिल्लक असल्याने आज फक्त 80 कांदा गाड्यांची आवक झाली आहे. वारंवार काम बंद आंदोलन होत असल्याने याचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाय काढण्याची मागणी मार्केटमधील सर्व घटकांकडून होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
Dombivli Pollution :  गुलाबी रस्ता आणि डोंबिवलीकर रागाने लाले लाल Special Report
Rural Area Students Studies : अभ्यासाचा भोंगा, मोबाईलला ठेंगा, सकाळ-संध्याकाळ फक्त अभ्यास Special Report
Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : ते दोघे सोडून सर्वजण कोणत्याही क्रमावर फलंदाजी करण्यास तयार, टीमसाठी नेमकं काय महत्त्वाचं? तिलक वर्मा म्हणाला...
Tilak Varma : मी 3,4,5,6 कोणत्याही स्थानावर फलंदाजीला तयार, टीमसाठी काय महत्त्वाचं? तिलक वर्मानं थेट सांगितलं....
Lionel Messi : कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
कोलकात्यात फ्लॉप, हैदराबादमध्ये सुपरहिट! लियोनेल मेस्सीने जिंकली मने; राहुल गांधींना जर्सी भेट
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Embed widget