एक्स्प्लोर

APMC Market : 50 किलोच्या वर शेतमालाची गोणी येत असल्यानं माथाडी कामगार आक्रमक, प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांना फटका

बाजारात येणारा शेतमाल हा गोण्यांमध्ये येतो. या गोण्यांचे वजन हे 50 किलोपेक्षा जास्त असते. ते कमी करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून माथाडी कामगार करत आहेत.

Navi Mumbai APMC Market : नवी मुंबईच्या बाजार समितीत महाराष्ट्राबरोबर परराज्यातून मोठ्या प्रमाणात शेतमाल येत असतो. पाठवण्यात येणारा शेतमाल गोण्यांमध्ये असल्याने त्याचे वजन 50 किलोपर्यंत असावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून माथाडी कामगार करत आहेत. मात्र, याकडे एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी वर्गाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे माथाडी कामगारांकडून अनेक वेळा आंदोलनाचा पवित्रा घेतात. तसेच अनेकवेळा कामबंद आंदोलन देखील करण्यात येते. याचा फटका मात्र शेतकरी वर्गाला सहन करावा लागत आहे.

एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये 60 ते 70 किलोपर्यंत वजनाच्या गोण्या भरून येतात. या गोण्या रोज उचलून माथाडी कामगारांना शारीरीक इजा झाल्या आहेत. तर कामगार कामसस्वरूपी मनक्याच्या आजाराने बाद झाले आहेत. यावर राज्य सरकार आणि एपीएमसी प्रशासनाने लक्ष देवून शेतमालाच्या गोण्यांचे वजन 50 किलोपर्यंत असावे अशी मागणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना केली होती. गेल्या अनेक वर्षापासून माथाडी कामगारांच्या असलेल्या या मागणीकडे एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अखेर काल (सोमवार) सकाळपासून अचानक माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने कांदा बटाटा मार्केट मधील व्यापार बंद पडला होता.


APMC Market : 50 किलोच्या वर शेतमालाची गोणी येत असल्यानं माथाडी कामगार आक्रमक, प्रशासनाचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांना फटका

एपीएमसीमधील दाना मार्केट, मसाला मार्केट येथे 50 किलो वजनाचा शेतमाल येवू लागला आहे. मात्र, कांदा बटाटा मार्केटमध्ये हेच वजन अद्याप 60 किलो पर्यंत आहे. याबाबत व्यापारी वर्ग आणि माथाडी कामगार यांच्यात अनेकवेळा बैठकाही झाल्या आहेत. यासाठी माथाडी कामगारांनी तीन, चार आंदोलने देखील केली आहेत. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे अखेर काल (सोमवार) सकाळपासून अचानक माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केल्याने कांदा बटाटा मार्केट मधील व्यापार बंद पडला होता. याचा फटका मात्र, शेतकऱ्यांना बसत आहे.

300 गाड्यांची आवक पडून

सोमवारी दिवसभर आंदोलन सुरू असल्याने कांदा, बटाटा मार्केटमध्ये आलेली 300 गाड्यांची आवक पडून होती. कांदा गाड्यांमध्येच पडून राहिल्याने तो खराब होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, संध्याकाळी चारनंतर माथाडी कामगारांनी आंदोलन मागे घेत व्यापार सुरू झाल्याने रात्री उशीरापर्यंत 300 गाड्या आलेल्या कांद्याचा 60 टक्के खप झाला आहे. काल राहिलेल्या शंभर गाड्या शिल्लक असल्याने आज फक्त 80 कांदा गाड्यांची आवक झाली आहे. वारंवार काम बंद आंदोलन होत असल्याने याचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाय काढण्याची मागणी मार्केटमधील सर्व घटकांकडून होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
Kerala Elections : आमदार झाल्यासारखं वाटतंय,निकाल जाहीर होण्याआधीच भाजप नेत्याकडून 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
भाजप नेत्याकडून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?

व्हिडीओ

New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
Kerala Elections : आमदार झाल्यासारखं वाटतंय,निकाल जाहीर होण्याआधीच भाजप नेत्याकडून 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
भाजप नेत्याकडून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Embed widget