एक्स्प्लोर

Sindhudurg News : तळकोकणात गव्यांचा उच्छाद, शेती पिकांची नासधूस, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात गव्यांनी उच्छाद मांडला आहे. गव्यांच्या कळप शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत.

Sindhudurg News : गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात गव्यांनी उच्छाद मांडला आहे. गव्यांच्या कळप शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करत आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. भात, नाचणी, भुईमूग यासारख्या पिकांचे गव्यांनी मोठं नुकसान केलं आहे. दरम्यान, या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच गव्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गव्यांच्या कळपाने शेती पिकांचे मोठं नुकासन केलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. नुकसानीसाठी तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, सध्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे वन विभागाच्या वतीनं केले जात आहेत. मात्र, नुकसान भरपाई मिळत नाही. पावसाळा सुरु झाल्यापासून गवे भात, नाचणी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. गव्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळून काही शेतकन्यांनी जमीन पडीक ठेवली आहे. तर काहींनी पडीक जमिनीत काजू, आंबा कलमांची लागवड केली केली आहे. मात्र, गव्यांनी या कलमांचीही नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी दिवसाढवळ्या लोक वस्तीतील भात शेतीतही गव्यांचे दर्शन होत आहे. गव्यांचा बंदोबस्त करण्याची वारंवार मागणी करूनही वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
 
शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय हा भातशेती आहे. यापलीकडे जाऊन शेतकरी काजू, आंबा बागाची शेती देखील शेतकरी करत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून जंगल परिसराबरोबरच शेती, तसेच भर वस्तीतही गव्या रेड्यांकडून शेतीची नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शासन दरबारी ओरड मारुनही काहीच हाती लागत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गव्यांची संख्या खूप वाढली असून सह्याद्री पट्ट्यातील आंबोली, दोडामार्ग तालुका, माणगाव खोरे, सावंतवाडी तालुक्यातील बऱ्याच गावांत गव्यांचे वास्तव्य दिसत आहे.

मोकळ्या कुरणातील गवत, झाडपाला, कोवळ्या फांद्या, कोवळे बांबू हे गव्याचे आवडीचे खाद्य आहे. खारट जमीन, खडक चाटायला त्याला आवडतात. त्यामुळं जंगलात ज्या ठिकाणी खारट जमीन, खडक असतात, तेथे त्याचा वावर जास्त असतो. मात्र, जिल्ह्यातील खासगी जंगलाचा विचार करता या ठिकाणी गव्याचे आवडते खाद्य नष्ट होत आले आहे. त्यामुळे त्याच्या अन्नाचा प्रश्न पुढे आला आहे. खासगी जंगलात पाणवठ्यांची सोय नसल्याने हा प्राणी अन्न-पाण्याच्या शोधात आता जंगलाबाहेर शेतीकडे हळूहळू भरवस्तीपर्यंत येऊन पोहोचला आहे. जंगलातून गवा भरवस्तीपर्यंत येऊ लागला आहे. मात्र, त्यांची वाढती संख्या शेती बागायती नव्हे, तर भविष्यात मानवासाठीही धोकादायक ठरु शकते.

महत्त्वाच्या बातम्या:

Sindhudurg Agriculture : हत्ती गावाच्या वेशीवर येताच मिळणार अलर्ट, पाहा शेतकऱ्यांनी काय केली उपाययोजना?

महत्त्वाच्या बातम्या

देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
सरकारकडून कांद्याच्या खरेदी दरात 250 रुपयांची वाढ, तर क्विंटलला तीन हजार रुपयांचा दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी 
सरकारकडून कांद्याच्या खरेदी दरात 250 रुपयांची वाढ, तर क्विंटलला तीन हजार रुपयांचा दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी 
पावसाच्या ढगांमध्ये आढळला 'ब्लॅक कार्बन', ढगांसंदर्भात महत्वाचं संशोधन, पावसावर परिणाम होणार का? 
पावसाच्या ढगांमध्ये आढळला 'ब्लॅक कार्बन', ढगांसंदर्भात महत्वाचं संशोधन, पावसावर परिणाम होणार का? 

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget