एक्स्प्लोर

Dragon Fruit : सांगलीतल्या दुष्काळी भागात फुलतायेत 'ड्रॅगन फ्रुटचे' मळे, शेतकऱ्यांना मिळतोय फायदा 

सांगली (Sangli) जिल्ह्यातील काही भाग हा दुष्काळग्रस्त आहे. त्या ठिकाणी पाण्याची समस्या आहे. या भागात आता ड्रॅगन फ्रुटचे (Dragon Fruit) उत्पादन घेतलं जात आहे.

Dragon Fruit in Maharastra : देशातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस (Rain) पडतो. त्यामुळं तिथं पाण्याची समस्या निर्माण होते. पाण्याच्या समस्यामुळं तिथे बागायती शेती करता येत नाही. महाराष्ट्रातही काही भागात कमी पाऊस पडतो. पण कमी पावसाच्या ठिकाणी देखील शेतकरी नव नवीन प्रयोग करत आहेत. महाराष्ट्रातील सांगली (Sangli) जिल्ह्यातील काही भाग हा दुष्काळग्रस्त आहे. त्या ठिकाणी पाण्याची समस्या आहे. या भागात आता ड्रॅगन फ्रुटचे (Dragon Fruit) उत्पादन घेतलं जात आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळताना दिसत आहे.

ऊसाच्या शेतीला बगल, शेतकरी घेतायेत ड्रॅगन फ्रुटचं उत्पादन

योग्य प्रकारचं पीक येण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेवर पाण्याची गरज असते. एकही पिक असे आहे की ज्याला पाण्याची गरज नाही. परंतू दुष्काळी भागात कमी पाण्यात ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतले जात आहे. कमी खर्चात चांगला नफा या पिकातून मिळवला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारही देखील ड्रॅगन फ्रुटच्या लागवडीला चालना देत आहेत. या पिकाच्या लागवडीमुळं शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारत आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील काही भागा हा दुष्काळग्रस्त आहे. कमी पाऊस असूनही अनेक शेतकरी तिथे ऊसाची लागवड करत होते. ऊसाच्या पिकासाठी भरपूर पाणी लागते. पण पाऊस कमी झाल्यामुळं तिथे पाण्याची समस्या निर्माण होत होती. त्यामुळं गेल्या काही वर्षांत येथील अनेक शेतकऱ्यांनी ऊस, द्राक्षे, सोयाबीन आणि भाजीपाला ही पारंपरिक पिके सोडून शेतकरी ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीकडे वळले आहेत. सांगलीत सुमारे 10 ते 15 शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड सुरु केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकरी ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन घेत आहेत. 

सुरुवातीला जास्त गुंतवणूक करावी लागते

सुरुवातीला ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी गुंतवणूक थोडी जास्त असते. मला सुरुवातील सुमारे 15 लाख रुपये गुंतवावे लागल्याची माहिती सांगलीच्या तडसर गावातील शेतकरी आनंदराव पवार यांनी सांगितले. मी गेल्या सहा वर्षापूर्वी ड्रॅगन फ्रूटची लागवड केल्याचे त्यांनी सांगितले. मी ड्रॅगन फ्रूटचे चांगले उत्पादन घेऊन वर्षभरातच निम्मा खर्च वसूल केल्याचे आनंदराव पवार म्हणाले. 2013 मध्ये सोलापूरच्या एका शेतकऱ्याकडून प्रेरणा मला मिळाल्याचे आनंदराव पवार यांनी सांगितले. दीड एकर शेतात ड्रॅगन फ्रूट पिकवून सोलापूरचा शेतकरी 27 लाख रुपये कमावत होता. यानंतर 2016 मध्ये आनंद पवार यांनीही ही शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला 200 किलोचे उत्पादन मिळाले, आज सहा वर्षांनंतर ते उत्पादन 8 हजार 500 किलोपर्यंत गेल्याची माहिती  आनंदराव पवार यांनी दिली.

ऊसाची शेती करणारे शेतकरी करतायेत ड्रॅगन फ्रूटची लागवड

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वांगी गावचे शेतकरी राजाराम देशमुख हे देखील अनेक वर्षांपासून ड्रॅगन फ्रूटची लागवड करत आहेत. त्यांनी दोन एकर शेतात ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. पूर्वी ते ऊसाची पारंपारिक शेती करत होते. परंतू ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळत असल्यानं त्यांनी पूर्णपणे ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. कमी पाण्यात हे पीक चांगल्या प्रकारे येत असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

देशासह परदेशातही ड्रॅगन फ्रूटची निर्यात

ड्रॅगन फ्रूटला भारतात विदेशी फळ म्हणतात. पण गेल्या काही वर्षांत देशातील शेतकऱ्यांनी त्याचे चांगले उत्पादन घेतले आहे. पण आता हे विदेशी फळ परदेशातही निर्यात होत आहे. वांगी आणि तडसर गावातील आनंदराव पवार आणि राजाराम देशमुख हे आज ड्रॅगन फ्रूटच्या शेतीतून चांगले उत्पन्न घेत आहेत. या शेतकऱ्यांनी 2021 मध्ये ड्रॅगन फ्रूट दुबईला निर्यात केले होते. याचबरोबर राजाराम देशमुख यांनी यावर्षीही सुमारे 50 किलो ड्रॅगन फ्रूट न्यूझीलंडला निर्यात केले आहे. आज महाराष्ट्रातील सांगलीचे ड्रॅगन फ्रूट हैद्राबाद, बंगळुरू, गुवाहाटी येथे पसंत केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Dragon Fruit : पारधी समाजातील तरुणानं शोधली नवी वाट, आनंदवाडीच्या माळरानावर फुलवलं 'ड्रॅगन फ्रुट'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana News : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची ऐशीतैशी; आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची ऐशीतैशी; आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambadas Danve :संजय राऊतांचा ब्रेक, दानवेंकडे माईक; राऊतांऐवजी सरकारवर दानवे कडाडणार Special Report
Nawab Malik : मलिक 'कॅप्टन' महायुतीत टशन; राष्ट्रवादीचे लाडके, भाजपचे दोडके Special Report
Sangli Shaurya Death : मारकुट्या शिक्षिका, शौर्यची शोकांतिका Special Report
Chikhaldara Nagarparishad : बिनविरोध मामेभाऊ, निशाण्यावर देवाभाऊ Special Report
Shahaji Bapu:निराशेचे 'डोंगर', आरोपांची 'झाडी', शहाजी बापूंचा मुख्यमंत्र्यांवर संताप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana News : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची ऐशीतैशी; आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेची ऐशीतैशी; आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार
IND vs PAK : ठरलं... भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमने सामने येणार, 'या' दिवशी महामुकाबला,अंडर-19 आशिया कपचं वेळापत्रक जाहीर
Udayanraje Bhonsle :  उमेदवारी ज्यांना मिळाली नाही त्यांनी नाराज होऊ नये, भविष्यात चांगली संधी देऊ, उदयनराजे भोसलेंची नाराजांना साद
अमोल मोहितेंसाठी उदयनराजे- शिवेंद्रराजेंची संयुक्त पत्रकार परिषद, नाराजांच्या उमेदवारीबाबत म्हणाले...
Uddhav Thackeray : शिवसेनेचा जन्म संघर्षासाठी, आम्हाला मुंबई जिंकायची आहे आणि जिंकणारचं, ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंची घोषणा
2014 ला आत्मनिर्भर भारत होईल असं वाटलेलं, अजून भाजप आत्मनिर्भर झाला नाही,उद्धव ठाकरेंची टीका
पालघर प्रकरणात चौधरीचा समावेश नसेल तर फडणवीस अन् भाजपनं त्याची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागावी : उद्धव ठाकरे
... तर भाजप आणि फडणवीसांनी शिवसेनेची आणि हिंदूंची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पुणेकरांसाठी गुडन्यूज; म्हाडाच्या 4186 घरांसाठी सोडत, अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
Tamhini Accident: ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
ताम्हिणी घाट अपघातातील 'थार'चे फोटो समोर, गाडीचा चेंदामेंदा; रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरूच
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
धक्कादायक! भाजीपाला घेत असताना भर बाजारात तलवारीने हल्ला करत एकाची हत्या, जालना शहर हादरलं 
Embed widget