एक्स्प्लोर

गेल्यावर्षी अतिवर्षी यंदा पाऊसच नाही, शेतीबरोबर दुग्दव्यावसायही अडचणीत

अहमदनगर : अर्धा पावसाळा संपत आला पण राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला नाही. पावसाने पाठ फिरवल्याचा परिणाम हा जसा शेतीवर झालाय तसाच दुग्धव्यवसायावर देखील झालाय.

अहमदनगर : अर्धा पावसाळा संपत आला पण राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस झाला नाही. पावसाने पाठ फिरवल्याचा परिणाम हा जसा शेतीवर झालाय तसाच दुग्धव्यवसायावर देखील झालाय. अनेक भागात चारा टंचाईला सुरुवात झालीये...अहमदनगर तालुक्यातील गुंडेगाव भागात श्रावण महिना सुरू झाला तरी पावसाने दांडी मारल्याने ऊस, मका पिकासह अन्य पिकेही काही प्रमाणात धोक्यात आली आहेत. त्यामुळे दुधाची पंढरी ओळख असणाऱ्या गुंडेगाव भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याचा परिणाम दूध व्यवसायावर होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील गुंडेगाव हे गाव दुग्धव्यवसायासाठी ओळखलं जातं. गुंडेगाव हे नगर तालुक्यातील अतिशय छोटेसे गाव आहे. मात्र या गावात दररोज 12 ते 13 हजार लिटर दुध संकलन होतंय. मात्र मागील दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने या गावात चारा टंचाई मोठ्या प्रमाणात सुरु आहे.  त्याचा परिणाम हा दुग्धव्यावसायावर देखील झालाय. गावातील दूध संकलन जवळपास 4 हजार लीटरने कमी झाल्याचे गावकरी सांगतात.

गेल्यावर्षी या गावात अतिवृष्टी झाली, त्यामुळे जनावरांचा चारा खराब झाला. यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. एकूणच काय तर कर्ज काढून जनावरे खरेदी केली, मात्र चारा प्रश्नामुळे गावातील शेतकऱ्यांचा आणि दुग्ध व्यवसायिकांचं आर्थिक गणित पुरतं कोलमडल आहे. ज्याचा परिणाम इतरही व्यवसायांवरती झाल्याचं ग्रामस्थ सांगतात.

यंदा चांगला पाऊस होईल, या अपेक्षेतून अनेक शेतकऱ्यांनी 70 हजारांची गायी हे एक लाख ते दीड लाखापर्यंत खरेदी केली. मात्र याच गाईला सतत चारा मिळत नसल्याने दुधाचे उत्पादन घटल्याचे शेतकरी सांगतात. जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्यासाठी अन्य घटकांवर अवलंबून रहावे लागत आहे. काही ठिकाणी चढ्या किंमतीने ओला चारा मिळवावा लागत आहे. उत्पादन खर्च आणि दूध दरातील तफावत पाहता अनेक प्रश्न दूध व्यवसायिकांसमोर निर्माण झाले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात चारा नेण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. तरी देखील येऊ घातलेल्या दुष्काळाची चाहूल लक्षात घेता शासन प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून चाऱ्याचं नियोजन सरकारने करणे गरजेचे असल्याचं आदर्श गाव हिवरे बाजारचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी म्हटलं आहे.

पावसाने पाठ फिरवल्या शेतीचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक गणित बिघडलंय. त्यातच शेतीला जोडधंदा म्हणून उत्तम पर्याय असलेला दुग्ध व्यवसाय देखील चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवरती धोक्यात येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासन प्रशासनांना यावरती गांभीर्याने विचार करून शेतकरी आणि दुग्ध व्यवसायिकांना आवश्यक ती मदत करणं गरजेचं बनलाय. 

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस, 8 जुलैपासून पावसात घट होणार, शेतकरी चिंतेत
Vidarbha Cow Scam: पशुसंवर्धन विभागाचा संतापजनक कारभार! जन्मात कोंबडी पाळली नाही, त्याच्या नावावर लाटले गाईंचे पैसे; विदर्भातील 'त्या' योजनेचा धक्कादायक खुलासा
पशुसंवर्धन विभागाचा संतापजनक कारभार! जन्मात कोंबडी पाळली नाही, त्याच्या नावावर लाटले गाईंचे पैसे; विदर्भातील 'त्या' योजनेचा धक्कादायक खुलासा
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
देवगडच्या उच्चशिक्षित इंजिनिअर वैष्णवीने 'बळीराजा'शी बांधली साता जन्माची गाठ; राजू शेट्टींनी लग्न चुकलं पण शब्द पाळला, घरी जाऊन केला साडीचोळीचा आहेर
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Embed widget