एक्स्प्लोर

Anjali Nimbalkar : कर्नाटकात 5 योजना जाहीर करून पहिल्याच कॅबिनेटमध्ये लागू केल्या, तेच गॅरेंटी कार्ड महाराष्ट्रात; कोल्हापूरच्या सुनेचं महायुतीला जोरदार प्रत्युत्तर

कर्नाटकमध्ये कोणतीही योजना बंद केलेली नाही. त्यामुळे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गॅरंटी कार्ड जाहीर केलं असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी टोला लगावला.

Anjali Nimbalkar on Mahayuti : कर्नाटकमध्ये सरकार स्थापन होताच आम्ही पाच योजना जाहीर केल्या होत्या. त्या योजना पहिल्याच कॅबिनेटमध्ये मंजुरी देत महिलांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करण्यात येत आहेत, कर्नाटकात शक्ती योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे आम्ही कर्नाटकमध्ये कोणतीही योजना बंद केलेली नाही, अशा शब्दात कर्नाटकातील काँग्रेस नेत्या आणि कोल्हापूरच्या सून असलेल्या डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी महायुती सरकारला टोला लगावला. 

महाराष्ट्रात महायुती सरकारला लोक कंटाळली आहेत

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमधील शक्ती योजनेवरून भाजप नेत्यांसह पंतप्रधान मोदींकडूनही टीका करण्यात येत आहे. मात्र, अंजली निंबाळकर यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना भाजप आणि महायुतीकडून होणाऱ्या टीकेचा समाचार घेतला. कर्नाटकमध्ये सर्व योजना सुरु असल्याचे सांगितले. निंबाळकर यांनी सांगितले की कर्नाटकमध्ये मराठा समाजाला आधार देण्याचं काम निश्चितपणे सुरू आहे. महाराष्ट्रात महायुती सरकारला लोक कंटाळली आहेत. त्यामुळे कधी जात, कधी धर्म अशा पद्धतीने राजकारण सुरू आहे असल्याची टीका त्यांनी केली. शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे एकत्र आले हे लोकशाहीसाठी चांगला असल्याचे अंजनी निंबाळकर म्हणाल्या.

त्यांनी सांगितले की, कर्नाटकमध्ये आम्ही पाच योजना जाहीर केल्या होत्या. त्यामुळे त्या योजना पहिल्याच कॅबिनेटमध्ये मंजूर करून महिलांच्या खात्यावर पैसे वर्ग केले आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये कोणतीही योजना बंद केलेली नाही. त्यामुळे त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गॅरंटी कार्ड जाहीर केलं असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी टोला लगावला. त्या म्हणाल्या की लाडकी बहीण बरोबर लाडकी बायको, लाडकी आई सुद्धा असली पाहिजे.

यांच्याकडून केवळ अदानी, अंबानी यांचे घर भरण्याचं काम

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा महिलांना तीन हजार रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना जी गरज आहे त्या योजना गॅरंटी कार्डच्या माध्यमातून देत असल्याचे अंजन निंबाळकर म्हणाल्या. यांच्याकडून केवळ अदानी, अंबानी यांचे घर भरण्याचं काम होत असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली. गरिबांना गरीब ठेवण्याचे  महायुतीच्या सरकारमध्ये झालं असून 23 तारखेला निश्चित महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल, यामध्ये शंका नसल्याचा विश्वास सुद्धा अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
Maharashtra Live blog updates: कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी! परशुराम घाटातील दुसरी लेन वाहतुकीसाठी खुली होणार
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Embed widget