Vidhan Sabha Election : राज्यात दिवाळीनंतर दोन टप्प्यांत निवडणुका होण्याची शक्यता
Vidhan Sabha Election : राज्यात दिवाळीनंतर दोन टप्प्यांत निवडणुका होण्याची शक्यता,
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 12 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होण्याची दाट शक्यता आहे... राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच राज्यात दोन टप्प्यात निवडणुका होणार अशी दाट शक्यता आहे... प्रशासकीय यंत्रणा तसेच इंटेलिजन्स एजन्सी कडून एका टप्प्यात निवडणूक घेण्याऐवजी दोन टप्प्यात निवडणुका घेणं सोयीचा ठरेल अशी सूचना देण्यात आल्याची माहिती आहे... असे असले तरी या संदर्भातला अंतिम निर्णय निवडणूक आयोगच करेल.... राज्यात 2019 मध्ये 21 ऑक्टोबर रोजी एका टप्प्यात निवडणूक झाली होती तर त्यापूर्वी 2009 आणि 2014 मध्ये ही एका टप्प्यातच निवडणूक झाली होती...























