एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'शेतकरी भोळा आहे, पण मूर्ख नाही', Uddhav Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मराठवाडा दौऱ्यात सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, पीक कर्ज आणि सरकारच्या आश्वासनांवरून भाजप (BJP) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना लक्ष्य केले. 'माझा शेतकरी भोळा आहे, पण मूर्ख नाहीये तो प्रामाणिक आहे, तो चोर नाहीये', असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, पण ते पाळले नाही, अशी टीका त्यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना 'हातपाय हलवा' असा सल्ला दिल्याने, 'तुम्ही सरकार हलवताय का?' असा खोचक सवाल ठाकरेंनी विचारला. आगामी नगरपरिषद, पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जनता या सरकारला जागा दाखवून देईल आणि आम्हीच जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















