एक्स्प्लोर
UBT Shivsena Hambarda Morcha : छत्रपती संभाजीनगरातून ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा
छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात 'हंबरडा मोर्चा' काढण्यात आला, तर खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी सरकारच्या मदतीच्या आकड्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. 'सरकारने पीक विम्याचा (Crop Insurance) आकडा देखील यामध्ये दाखवला आणि त्यामुळे अशा पद्धतीचे आकडे फुगवले गेले,' असा गंभीर आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. ठाकरे गटाने शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी आणि NDRF निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची मागणी केली आहे. NDRF च्या निकषांनुसारच मदत दिली गेली असून एकही रुपया अतिरिक्त दिला नसल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. मोर्चाच्या समारोपानंतर मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना सादर केले जाणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
Advertisement

















