Raj Thackeray Full Speech : बारसूत कातळशिल्पे असल्याने रिफायनरी होऊच शकत नाही, राज ठाकरेंचा दावा
Raj Thackeray Full Speech : बारसूत कातळशिल्पे असल्याने रिफायनरी होऊच शकत नाही, राज ठाकरेंचा दावा
Raj Thackeray Speech Highlights: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खेड येथील सभेत राज्याचे राजकारणापासून ते रिफायनरीच्या प्रकल्पावर भाष्य केले. शिवसेना ठाकरे गटाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. कोकणात पर्यटनस्थळ विकसित करून राज्याचे अर्थकारण चालवता येईल. मात्र, व्यापारी प्रवृत्तीच्या राजकारण्यांना याची किंमत नसल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता पण राजीनामा दिल्यावर अजित पवार ज्या पद्धतीने अरेरावी करत होते ते पाहून पवार साहेबांच्या मनात विचार आला असणार की राजीनामा दिल्या दिल्याची घोषणा केली तर हा इतका उर्मट वागतोय तर खरंच राजीनामा दिला तर कसा वागेल, म्हणून राजीनामा मागे घेतला असणार.
कोकणाची दुर्दशा झाली आहे त्याला तुम्हीच जबाबदार आहात. कोकणातले राजकारणी म्हणजे व्यापारी आहेत, अशांना तुम्ही परत परत निवडून देणार असाल तर काय वेगळं होणार. मुंबई-गोवा महामार्गाच काम २००७ ला सुरु झालं पण तरीही अजून काम पूर्ण नाही झालेलं कारण निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना माहीत आहे की काम नाही केलं तरी निवडून देणार आहेतच मग कशाला कामं करायची.



















