एक्स्प्लोर
Man-Animal Conflict: 'तुम्हाला माणसे जगवायची आहेत की बिबटे?', आढळराव पाटलांचा सरकारला संतप्त सवाल
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात जांभूत येथे बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय भागूबाई जाधव यांचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असता, त्यांना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. 'तुम्हाला माणसे जगवायची आहेत की बिबटे जगवायचेत?' असा संतप्त सवाल माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी सरकारला विचारला आहे. आठवडाभरातील हा दुसरा बळी असल्यानं नागरिक आक्रमक झाले असून, जोपर्यंत वनमंत्री घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. यावर तोडगा म्हणून बिबट्यांची नसबंदी (Leopard Sterilization) करणे आणि त्यांना केवळ सोडून न देता त्यांच्यासाठी बिबट निवारण केंद्र (Leopard Rehabilitation Center) उभारणे आवश्यक असल्याचे मत दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. गेल्या दहा-बारा वर्षांत या परिसरात बिबट्यांची संख्या शंभर-दीडशेवरून थेट बाराशे ते चौदाशेच्या घरात पोहोचल्याने हा मानव-वन्यजीव संघर्ष (Human-Wildlife Conflict) अधिक तीव्र झाला आहे.
महाराष्ट्र
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















