Mumbai Mills Bhonga: मुंबईच्या इतिहासातील भोंगा, ज्या काळात माणूस समृद्ध होता...ABP Majhja
सध्या भोंग्यांवरुन जे काही राजकारण चाललंय आपण पाहतोय. मशिदीवरील भोंगे खाली उतरवा” या एका वाक्यावर सामान्य जनताच काय तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हलचाली सुरु झाल्यात. त्या सभेनंतर जनमाणसांतपण मतं मतांतरं निर्माण झाली. आता या भोंग्यामुळे हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी फळी पुन्हा एकदा निर्माण होऊन दंगेसंदृष्य परिस्थिती निर्माण होतेय की काय अशी भितीदेखील अनेक जाणकरांच्या मनात येऊन गेली. पण या भोंग्यावरुन मला एक दुसरा भोंगा आठवला… सगळ्यांना हवा हवासा वाटणारा भोंगा! ज्या भोंग्यावर कित्येकांची, कित्येकांची म्हणणापेक्षा हजारो मुंबईकरांची दिनचर्या अवलंबून होती. सबंध मुंबईकरांचे सोनेरी दिवस असलेला तो काळ. ….ज्या काळाबद्दल बरंच काही ऐकलंय. तो अनुभवण्यापेक्षाही नुसता ऐकूणपण फार सुखद वाटला. तो काळ आहे १९ व्या शतकाचा...























