Majha Mudda EP 06 : औरंगजेबची कबर ते वाघ्या कुत्रा प्रकरण, महत्वाच्या मुद्द्यांपासून नेते भरकटतायत?
Majha Mudda EP 06 : औरंगजेबची कबर ते वाघ्या कुत्रा प्रकरण, महत्वाच्या मुद्द्यांपासून नेते भरकटतायत?
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
प्रशांत कोरकटरला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्याला आता पोलीस कोठडी सुनवण्यात आलेली आहे. कोल्हापूर मध्ये त्याच्यावरती खटला दाखल झालेला आहे. हे प्रकरण मार्गी लागण्यात जमा आहे. शिव भक्तांचा संताप अतिशय जोरदार होता आणि अगदी प्रखर झाला होता. दुसरी घटना रायगडावरचा जो वाघ्या पुतळा आहे छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या शेजारचा तो पुतळा काढून टाकण्यात यावा अशी मागणी होते. त्याला विरोध केला जातोय कारण त्याच्याबद्दलची एक वेगळी मांडणी करणारे इतिहासतज्ञ आहेत. धनगर समाजातल्या काही नेत्यांनी. व्यक्त केलेला आहे. तिसरीकडे अमोल मिटकरी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनी मागणी केलेली आहे की संभाजी राजे किंवा अशा प्रकारच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वांच विडंबन किंवा चुकीची माहिती देणाऱ्या पुस्तकांवर नाटकांवरती बंदी आणण्यात यावी यासाठी त्याने आखी यादीच दिलेली आहे. आणखी पुढे जाऊन म्हणायचं झालं तर महाराष्ट्रातल्या गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहिल्या तर त्या इतिहासाशी संबंधित आहेत मग औरंगजेबाची कबर हटवणं असेल आणि या बाकीच्या सगळ्या गोष्टी या सगळ्यामुळे मात्र महाराष्ट्राचे आजचे प्रश्न दुर्लक्षित होतायत का? असं मात्र वाटून जातं. नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय माझा मुद्दा, एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर. प्रश्न असा आहे, महाराष्ट्रात या घडीला अनेक प्रश्न आहेत. प्राथमिक शिक्षणामध्ये मुलांच, मुळात मराठी शाळा कमी होणं, ज्याला स्कूल ड्रॉपआऊट म्हणतात, ते प्रमाण वाढत असणं असेल, शिक्षणाचा दर्जा असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे. महिलांसाठीच्या विविध योजना त्यामध्ये लाडकी बहीण योजना महत्त्वाची असतील आणि त्याच्या बाबतीत नेमकी योजना. ती पुढे किती जाणार आहे याबद्दल सरकारच्या पातळीवरन अजून प्रत्यक्ष कार्यवाही नव्या हप्त्यासह जो ₹100चा हप्ता आहे सुरू व्हायचा आहे आणि आता आता ताज्या अर्थसंकल्पामध्ये साधारणपणे आर्थिक शिस्त हा या राज्य सरकारच्या समोरचा अजेंडा असेल हे स्पष्ट झालेल आहे आणि जी चांगली गोष्ट आहे तो असलाच पाहिजे अजेंडा आणि त्या दृष्टीने सरकार काम करत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण असे महत्त्वाचे लोकांच्या रोजच्या जगण्या मरण्याशी संबंधित प्रश्न मग मेट्रोचा प्रश्न असेल, बसचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल असे प्रश्न न घेता. ऐतिहासिक आणि 300 वर्ष 400 वर्ष जुन्या विषयांमध्ये आपण आणि त्या मुद्द्यांमध्ये अर्थ असेल नाही अशातला भाग नाही किती काळ आपण आपल्याला अडकवून ठेवायचे मला इथे कौतुक वाटत अजित पवारांच अजित पवारांना जेव्हा काल की परवा पत्रकारांनी वाघ्या कुत्राच्या संदर्भातला विषय काढला अजित पवार सुद्धा म्हणाले की तुम्ही आता कोण कोणते विषय काढणार आहात कोणाचा तरी पुतळा आहे तो काढा कोणाचा असेल नसेल तर तो बसवा ऐतिहासिक आहे की नाही आहे आता रायगडावर जे जातात ते प्रामुख्याने छत्रपती शिवारायांच्या समाधीच दर्शन घेण्यासाठी जातात त्या किल्ल्याचं वैभव बघण्यासाठी जातात मग इथे आता तो पुतळा आहे तो पुतळा मग मुळात होता की नाही आता त्याबद्दल सुद्धा मतमतांतर आहेत की गडकरींच्या एका नाटकामध्ये आणि त्याच्या यादीची एक आख्यायिका होती की छत्रपती शिवारांच निधन झालं आणि जेव्हा त्यांना अग्नी देण्यात आला पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले त्यावेळी त्या कुत्र्याने त्यात उडी घेतली अशी आख्यायिका आहे आणि त्यातून त्या पात्राने जन्म घेतला आणि त्यातून ती मूर्ती बनली. आता यामध्ये धनगर समाज बांधवांचं काही वेगळं म्हणणं आहे जे लक्ष्मण हाके मांडू पाहतायत संजय सोनूनी सारखे इतिहासकार त्यामध्ये वेगळं म्हणणं मांडतायत की हा एक अस्मितेचा मुद्दा आहे आणि ते अशा प्रकारे कुत्र्यांच्या समाध्या किंवा कुत्र्यांच स्मारक असणं हे राजे रजवड्यांच्या काळात पाहायला पाहायला मिळालेल आहे. मला स्वतःला मी रामराजे नायक निंबाळकर आहेत त्यांच्या फळटणच्या संस्थानामध्ये गेलो होतो तिकडे श्रीराम मंदिर अतिशय सुंदर मंदिर आहे त्याच्या आवारात सुद्धा मला अशी कुत्र्याची मूर्ती नुसती मूर्ती बघितल्याच मला आठवत आहे आता आहे की नाही मला माहित नाही पण संजय सोनवणीचा एक वेगळा मुद्दा त्यांनी या निमित्ताने मांडलेला आहे. तिकडे औरंगजेबाची कबर आहे ती हटवण्याच आंदोलन सुरू झालं ते हाहा म्हणता पसर. नागपूर मध्ये त्याचे पडसाद उमटले आणि दंगल झाली, नागपूरच जवळपास 200 कोटी किंवा याच्यापेक्षा जास्त रुपयांच नुकसान झालं या सगळ्या दंगल काळामध्ये आणि नंतर सगळ्या तयार झालेल्या तिथे जी संचारबंदी करण्यात आली होती. नेमक काय चाल हे कोणते विषय? औरंगजेबाची खबर असली काय किंवा नसली काय? असताना त्याकडे कोणी जुलूस काढत नाही, तिकडे कोणी उरूस काढत नाही, तिकडे लोक कुठल्या जयंत्या मयंत्या साजऱ्या करायला जात नाहीत. मग हा विषय एवढा महत्त्वाचा का होता आणि आज त्याच्यामुळे जे महाराष्ट्राच नागपूरच नुकसान झालं ते कोण भरून काढणार? तिकडे अमोल मिटकरी म्हणतायत की संभाजी राजांची बदनामी करणाऱ्या या या का नाटकांवरती पुस्तकांवरती बंदी आणा. आता त्यांच्या भावनेशी मी सहमत आहे. पण ही जी नाटक किंवा ग्रंथ झाले त्यातले सुद्धा काही गाजलेली नाटक होती किंवा काही पुस्तक असतील हे सगळे संदर्भ आणि आता ते नाटक बनते नाही. सगळ्यात महत्त्वाच म्हणजे ती नाटक कोणी बनवत नाही जुन्या काळाची जुन्या पद्धतीची नाटक होती. पण हेही लक्षात घ्याव आणि याच्याबद्दल अगदी जयसंघराव पवार इतिहासतज्ञ यांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे की त्या त्या इतिहासकारांसमोर त्या त्या काळातली. ऐतिहासिक साधन उपलब्ध होती आणि त्यामुळे त्या काळातल त्यांच ते ऐतिहासिक आकलन त्यांच्या लेखनामध्ये बघायला मिळतं जे नंतर दुरुस्त होतं. स्वतः जयसिंगराव डॉक्टर जयसिंगराव पवारांनी सुद्धा जर का आपण त्यांचा इतिहास पाहिला म्हणजे त्यांच्या कामाचा भाग बघितला तर त्यांनी सुद्धा वेळच्या वेळी नव्या माहितीनंतर नवीन नवीन इतिहासाची आपली वर्जन त्यांनी लोकांसमोर मांडलेली आहेत. इतिहासकाराच ते काम असतं.






















