Zero Hour on Santosh Deshmukh | संतोष देशमुख हत्या प्रकरणात 'कळंब'ची एन्ट्री का झाली?
Zero Hour on Santosh Deshmukh | संतोष देशमुख हत्या प्रकरणात 'कळंब'ची एन्ट्री का झाली?
मुंबई : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांना बदनाम करण्याचा प्लॅन आखण्यात आला होता. त्यासाठी कळंबमध्ये एक बाईही तयार ठेवण्यात आली होती. पण त्या आधीच जीव गेल्याने आरोपींचा प्लॅन अयशस्वी झाल्याचं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सांगितलं. विधानसभेत आपण पहिल्या दिवशीच ही गोष्ट सांगितली होती असंही ते म्हणाले. संतोष देशमुखांची हत्या ही अनैतिक संबंधातून झाल्याचं दाखवण्याचा प्लॅन पोलिसांचा होता असा आरोप मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीयांनी केला. त्याच आरोपांचा पुनरुच्चार सुरेश धसांनी केला.
संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या हत्येची चौकशी करा, बीडमधील राखेची अवैध वाहतूक आणि इतर आर्थिक गुन्ह्यांमधील वादग्रस्त अधिकाऱ्यांची एसआयटीमार्फत चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे केली आहे. मुंबईतील पोलिसांच्या विशेष पथकामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
बीड पोलिसांची महासंचालकांकडे तक्रार
काही निवडक पोलिस अधिकारी अनेक वर्षे बीडमध्ये कार्यरत आहे. या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात बेकायदेशीर आर्थिक व्यवहार होत असून गुन्हेगारांना पाठबळ मिळत असल्याचा आरोप धस यांनी केला आहे. पोलिस अधिकारी गणेश मुंडेची एसीबी चौकशी सुरू असतानाही त्याला क्रीम पोस्टवर कोणी आणले याची चौकशी करण्यात यावी. बीडमध्ये एकाच ठिकाणी काही पोलिस हे 15-20 वर्षे कसे कार्यरत आहेत याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुरेश धसांनी रश्मी शुक्ला यांच्याकडे केली.
All Shows

































