Shiv Sena Party Split History : शिवसेनेची सहा दशकं,अन् 4 वेळा बंडखोरी Special Report
उद्या शिवसेना ६० वर्षांची होतेय... या नावाचा पक्ष आता एकनाथ शिंदेंकडे आहे आणि पक्षाचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या चिरंजीवांकडे नाव बदललेली शिवसेना आहे... ही परिस्थिती येण्याचं कारण चार वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेली मोठी फूट... शिवसेनेला बंडखोरीचा मोठा इतिहास आहे... मात्र गेल्या चार मोठ्या बंडांचं कारण उद्धव ठाकरेंबद्दल असलेली नाराजी, हेच आहे... बघुयात नारायण राणेंच्या बंडापासून 'ऑपरेशन टायगर'पर्यंतच्या शिवसेनेतल्या बंडखोरीचा हा प्रवास... आमच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये...
राज ठाकरे यांनी २००६ साली शिवसेना सोडताना उच्चारलेलं हे वाक्य महाराष्ट्राच्या राजकारणात अमर झालंय...
शिवसेनेत आतापर्यंत छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या पाच मोठ्या नेत्यांनी बंड केली...
यातला भुजबळ-नाईकांचा अपवाद सोडला, तर उरलेल्या तिघांनी बंड आणि फुटीसाठी एकाच व्यक्तीला जबाबदार धरलंय...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे...
फेब्रुवारी ते ऑक्टोबर १९९९ या काळात मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणे यांनी २००५ साली बंडाचा झेंडा फडकवला...
एकीकडे बाळासाहेबांच्या तालमित तयार झालेल्या राणेंचं महत्त्व पक्षात वाढत होतं...
त्याच वेळी उद्धव ठाकरे हेच आपले राजकीय उत्तराधिकारी असतील, असे स्पष्ट संकेत बाळासाहेबांकडून येत होते...
पक्षाच्या ६३ आमदारांपैकी ४२ जण आपल्या पाठीशी आहेत, असा दावा करत राणेंनी बंड केलं...
त्यापैकी २२ जण प्रत्यक्षात सोबत , तर २० जणांनी फोनवर पाठिंबा दिल्याचं राणेंचं म्हणणं होतं...
मात्र खरा आकडा यापेक्षा कितीतरी कमी होता... पक्षातून काढल्यानंतर त्यांनी घेतलेल्या बैठकीला केवळ ९ विधानसभा आमदार हजर होते...
पक्षांतरबंदी कायद्यामुळे त्यांना आमदारकी सोडावी लागली अन् वेगळ्या गटाला मान्यताही मिळाली नाही...
कालांतरानं राणे आपल्यासोबत आलेल्या आमदारांसह काँग्रेसमध्ये गेले...
All Shows
































