एक्स्प्लोर

Nagpur Crime : गँग्ज ऑफ भागलपूर ! परिस्थितीमुळे गुन्हेगारीत आलेल्या बिहारच्या तरुणाला नागपुरात अटक

नागपूर : वडिलांची डोळ्यादेखत झालेली हत्या, कुटुंबावर अनेक वर्षांपूर्वी झालेल्या झालेला अन्याय आणि तरीही आरोपी मोकाट. या अवस्थेत सूड घेण्यासाठी एक तरुण गुन्हेगारी जगतात उतरतो. आणि स्वतःची वेळ आल्यानंतर कुटुंबावर झालेल्या अन्यायाची परतफेड करण्यासाठी तो वडिलांच्या मारेकऱ्यांना उघड धमकावतो. असे कथानक आपण चित्रपटांमध्ये नेहमीच पाहतो. मात्र, रिल लाइफची हीच पटकथा नागपुरात रियल लाईफमध्ये घडून आल्याचे पाहायला मिळाले. फरक एवढाच की रिल लाईफमध्ये अशा अँग्री यंग मॅन अभिनेत्याचा नेहमीच विजय होतो. मात्र, नागपुरात रियल लाईफचा त्या अँग्री यंग मॅनला तुरुंगाची हवा खावी लागली आहे.

"तनवीर राका"... या फेसबुक अकाउंटवरून बिहारमधील भागलपूरच्या पोलीस अधीक्षकांना धमकी दिलेली धमकी वाचा.. "भागलपूर के एसपी को चॅलेंज.. राका को पकड के दिखा, राका वापस आ रहा है, हिसाब किताब लेने के लिए".. बॉलीवूड चित्रपटातल्या एखाद्या अँग्री यंग मॅन अभिनेत्याने अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्याला दिलेल्या फिल्मी धमकी सारखीच ही तनवीर राकाची धमकी.

भागलपूरमध्ये अनेक गंभीर गुन्हे नावावर असताना तनवीर राकाने 2017 मध्ये भागलपूरच्या पोलीस अधीक्षकांना फेसबुकच्या माध्यमातून ही धमकी दिली होती. त्यानंतर भागलपूरची संपूर्ण पोलीस यंत्रणा हात धुवून त्याच्या मागे लागली होती. त्यामुळे घाबरलेल्या तनवीरने नागपूरच्या मोमिनपुरा भागात शरण घेतली होती. त्यानंतर गेले साडेतीन वर्ष तनवीर नागपूरच्या मोमिनपुरा परिसरात कापड दुकानांमध्ये काम करून गुपचूप आपला उदरनिर्वाह करत राहत होता. मात्र, काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांना बिहार मधील एक कुख्यात गुन्हेगार नागपूरच्या मोमिनपुरा परिसरात लपून राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली आणि पोलीस तनवीरपर्यंत पोहोचले.

तुरुंगातून सुटल्यानंतर 2017 मध्ये त्याने फेसबुकच्या माध्यमातून भागलपूरच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांना खुलं चॅलेंज केलं. आणि वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी मी भागलपूरला येत आहे, अशा आशयाची धमकीच दिली. वडिलांच्या मारेकऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मुंगेर मधून पिस्तूल आणि काडतुस खरेदी केल्याचेही तेव्हा तनवीरने त्याच्या फेसबुक अकाउंटवर जाहीर केले होते. मात्र, तेव्हा भागलपूर पोलिसांनी तनवीरची ती धमकी थेट पोलिस अधीक्षकांसाठी आहे, असं समजून संपूर्ण पोलीस यंत्रणा तनवीरच्या मागे लावून दिली होती. आणि त्यामुळेच तनवीरला भागलपूर सोडावं लागले होते. 2017 मध्ये तो नागपुरात आश्रयासाठी आला होता.

नागपूर पोलिसांच्या ताब्यात असताना तनवीरने आपली संपूर्ण कहाणी नागपूर पोलिसांसमोर सांगितली. आणि त्यानंतर डोळ्या देखत झालेली वडिलांची हत्या, कुटुंबावर झालेल्या अन्यायापायी सहा वर्षाचा एक बालक तरुण झाल्यावर गुन्हेगारी जगतात का आला आणि थेट पोलीस अधीक्षकांना चॅलेंज केल्यामुळे आता तो तुरुंगात पोहोचल्याची सर्व कहाणी समोर आली. चित्रपटातील रिल लाईफमध्ये नेहमीच न्यायाचा विजय होतो. मात्र, रियल लाईफ मधील "तनवीर" ला अठरा वर्षांपूर्वी त्याच्या कुटुंबावर झालेल्या अन्यायाबद्दल न्याय तर मिळाला नाहीच उलट पोलीस अधीक्षकांना उघड चॅलेंज केल्याप्रकरणी त्याची रवानगी आता तुरुंगात झाली आहे.

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget