Dharashiv Pawan Chakki : पवनचक्क्यांचं अर्थकारण, रक्तरंजित राजकारण;शेतकऱ्याला मारहाण Special Report
Dharashiv Pawan Chakki : पवनचक्क्यांचं अर्थकारण, रक्तरंजित राजकारण;शेतकऱ्याला मारहाण Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
कुणाची थेट हत्या तर कुणाला अमानुष मारहाण मराठवाड्यात पवन चक्कीच्या वादातन अशा घटना वारंवार घडतायत आता ही एक अशीच घटना समोर आली आहे धाराशेवच्या तांदूळवाडीत तांदूळवाडीतील शेतकरी गणेश शेरकर यांच्या शेतात पवन चक्की विद्युत लाइनचे टॉवर आहेत मोबदला देण्याची माफा अपेक्षा त्यांनी ठेवली आणि त्यासाठी आंदोलन केलं पण पुढे त्यांच्या सोबत जे झालं त्याने संपूर्ण मराठवाडा हादरून गेला पाहूया नेमक काय घडल. ही दृश्य आहे धाराशिवच्या वाशी तालुक्यातल्या तांदूळवाडीतली. पवन चक्कीच्या वादातून झालेल्या अमानुष मारहाणीमुळे पुन्हा एकदा मराठवाडा हादरलाय. पवनचक्कीच्या वादातून एका शेतकऱ्याला बेदम मारहाण झाली आहे. पवन चक्की विद्युत लाईन टॉवरचा मोबदला द्या नाहीतर काम थांबवा असं सांगणाऱ्या गणेश शेरकर या शेतकऱ्याला ही दमदाटी झाली आहे. तांदूळवाडी शिवारात शेतकरी गणेश शेरकर यांच्या शेतातून पवनचक्की विद्युत लाईनचे दोन टॉवर आहेत. एका कंपनीकडून जेवढा मोबदला मिळालाय तेवढाच मोबदला दुसऱ्या कंपनीने द्यावा अशी माफक अपेक्षा शेरकर यांची होती. यावरून त्यांनी शेतात सुरू असलेल्या टॉवरच काम थांबवलं. मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलवून थेट शेतकऱ्यावरच दमदाटी सुरू केली. यावेळी भाजप नगरसेवक राजू कवडे यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शेतकरी आणि भाजप माजी नगरसेवक राजू कवडे. यांच्यावर अमानुष लाठीमार केल्याची घटना घडली. शेतकऱ्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीला निजामाची उपमा दिली आहे. माझं सरकारला एवढच विचारायचं की तुमच्या आत्ताच्या पोलिसाची कार्यपद्धती, काही अधिकाऱ्यांची कार्यपद्धती आणि निजामाच्या काळात जे रजाकार होते. याच्या कार्यतीत काय बदल आहे ते पोलीस काम कुणासाठी करतायत मुख्यमंत्र्यांनी याच उत्तर द्यावं. हत्तेपर्यंत मजल गेलेली आपण पाहिली आहे. हे अर्थकारण नेमक काय ते समजून घेऊयात. पवन ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन खरेदी केली जाते किंवा भाडे तत्वावर दिली जाते. भाडे तत्वावर घेतल्यास 20 ते 25 वर्षांचा करार केला जातो. प्रकल्पासाठी साधारणतः दोन ते तीन एकर जमीन लागते. टेकड्या किंवा खुल्या भागातील जमिनी प्राधान्याने निवडल्या जातात. जमिनीचे मूल्यांकन हे सरकारी किंवा बाजार भावानुसार होतं. शेत जमिनीसाठी नॉन ग्रीकल्चर परवानगी आवश्यक असते. पवनचाक्की प्रकल्पाचा खर्च. क्षमतेवर अवलंबून असतो. हा खर्च सरासरी पाच ते सात कोटी प्रति मेगावॅट इतका असतो. एक मेगावॅट क्षमतेची पवनचक्की दरवर्षी दोन ते तीन लाख युनिट वीज तयार करू शकते. प्रति युनिटचा सरासरी दर अडीच ते पाच रुपये प्रति युनिट इतका आहे. दरवर्षी 25 लाख युनिट वीज निर्मिती झाल्यास सरासरी चार रुपये प्रति युनिट प्रमाण वार्षिक उत्पन्न एक कोटीच्या घरात जात. 10 वर्षात उत्पादनाचा खर्च वसूल होतो आणि उर्वरित 10 ते 15 वर्ष नफा मिळतो.
All Shows





महत्त्वाच्या बातम्या





























