Bhaskar Jadhav : ठाकरेंकडे खदखदीची साठवण, आली पवारांची आठवण Special Report
Bhaskar Jadhav : ठाकरेंकडे खदखदीची साठवण, आली पवारांची आठवण Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
भास्कर जाधव, कोकनात ठाकरेंची विजती मशाल मिणमिणत का होई ना ठेवणारा एकमेव आमदार? पक्षासाठी आक्रमक भूमिका आणि दमदार भाषणांमुळे ठाकरेंच्या सेनेची कोकणातली धडाडती तोप अशी भास्कर जाधवांची ओळख. मात्र हेच भास्कर जाधव ठाकरेंच्या पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. आपल्या मनातील खतखत ते जाहीरपणे व्यक्त करतायत इतकच नव्हे तर राजकारणातून निवृत्ती घेण्याचे बोलून दाखवत आहेत आणि सगळं सांगताना भास्कर जाधवांना शरद पवारांची ही आठवण येते. त्यामुळे आता भास्कर जाधव नेमकी काय भूमिका घेण? मी घुसमटून जाणारा माणूस नाही. कोण म्हणत भास्कर जाधवांना खंत वाटते. मी ती निर्णय घेतला तो चुकीचा होता. हे स्पष्टपणे मी बोललो लपून काही बोललो नाही. पण याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटते असा अजिबात नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातले एकमेव आमदार भास्कर जाधव सध्या आपलं मन मोकळं करतात. उद्धव ठाकरे. तुम्हाला वाटेल पण तुम्ही असा विचार कराल याचा अंदाज भास्कर रावांना आधीच आलाय त्यामुळे त्याचही उत्तर त्यांनी देऊन टाकलाय आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबाव असं वाटतं माझं वैयक्तिक मत झालं हे कोणावर नाराजी किंवा कोणी मला निवृत्त व्हायला सांगितलं माझ्यामध्ये लढण्याची धमक आहे 2022 पासून ज्या काही घटना पक्षामध्ये घडल्या मला असं वाटते की प्रत्येक मैदान. न मिळालेल मंत्रीपद असो किंवा विरोधी पक्ष नेते पदान दिलेली हुलकावणी असो, ही पद मिळाली नाहीत म्हणून भास्कर जाधव नाराज नक्कीच नाहीत, पण हे पद मिळालं असतं तर काय केलं असतं हे सांगायला मात्र ते विसरत नाहीयत. त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या पक्षाने दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या योग्य पद्धतीने पेलवलेल्या आहेत. भास्कर जाधव जेव्हा मुंबईत येतील तेव्हा माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी स्वतः बोलतील. ते एक हडाचे शिवसैनिक आहेत, कडवट शिवसैनिक आहे, आक्रमक आहेत, छान बोलतात, छान लढतात, आता अशा आमच्या भास्कर जाधवांच्या मनात काय आहे, काय वेदन आहे ते नक्की समजून घेऊ, आमचेच आहे. मंत्रीपद मिळालं नाही म्हणून भास्कर जाधव नाराज आहेत असं म्हणणाऱ्यांना ते खुले आम उत्तर देतायत, पण मला कधीही कधीही गेटवर. थांबवत नाही आणि मला चेक करण्याचा सुद्धा कोणी प्रयत्न करत नाही. त्यामुळे उद्धव साहेबांनी मला बोलवायला पाहिजे आणि मग मी गेलं पाहिजे असं काही कारण नाही मला वाटेल देवा मी कधी जाऊ शकतो. त्यांना वाटेल तेव्हा ते मला कधीही बोलवू शकतात त्यामुळे त्यांनी मला बोलवण्याची मी वाट बघावी किंवा ते मला बोलवत नंतर मी भेटेन हे अंतर शिल्लक राहिलेल नाही. आता एवढं सगळं भास्करराव करू शकत होते तर त्यांना हे पद मिळालं का नाही? त्यांच्याच तोंडून ऐका. विरोधी पक्ष नेता कसा असू शकतो? विधायक कामामध्ये चांगल्या कामामध्ये मदत करणारा आणि सध्याच सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे. त्या भ्रष्टाचाराचे वाभाडे. असं म्हणत भास्कर जाधव इतकं काही बोलू लागल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला धडकी भरणं साहजिक आहे. ठाकरेंना सोडून जाणाऱ्या नेत्यांच प्रमाण गेल्या काही महिन्यात वाढत असल्याचे चित्र आहे. याच नाराजीची लागण भास्कर जाधवांनाही झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी, दापोलीचे माजी आमदार संजय कदम, माजी आमदार सुभाष बने, माजी. बोलतो, उद्याही बोलेन, का मिळायला नको होतं, त्याच कारण कोणाकडे असेल ते स्पष्ट केलं पाहिजे, परंतु नाही मिळाल म्हणून काय रडत बसायचे का, त्यामुळे मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही, मंत्रीपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले, त्यांच्या बरोबर पण गेलो नाही, मी लढतोय पण नाही मिळालं हे नाहीच मिळाल, कार्यकर्ते कमी होतात म्हणून निवृत्ती घ्यायच काहीच कारण नाही, 39 जागांपैकी मी एकता निवडून आलो. परंतु शेवटी आता आठ आठ वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा. तर उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मध्यस्थाची गरज नसल्याच सांगत भास्कर जाधवांनी मातोशी सोबतच थेट कनेक्शन अधोरेखित केलाय. मला काम करायला संधी कमी मिळते याच कारण माझा मध्ये दोष आहे. मी जी हुजूर जी हुजूर करत कोणाच्या पाठीमागून जास्त फिरत नाही. मी होईला होई कधी म्हणत. असल्याच मानल जातय. पक्षात आपलं कुठेतरी स्थान मजबूत असावं यासाठी कदाचित त्यांच हे नाराजी नाट्य सुरू असेल किंवा कदाचित बदलते पक्ष राजकीय प्रवाह आहेत त्या प्रवाहामध्ये कुठेतरी त्यांना एखादी ऑफरही आलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु भास्कर जाधवांवर सत्ता काळातही अन्याय झाला अशी त्यांची जी भावना आहे त्यातून कुठेतरी हे नाराजी नाट्य निर्माण झालेला आहे. 1992 मध्ये जिल्हा परिषदेपासून राजकीय कारकीर्द सुरू झालेल्या भास्कर जाधवांनी अगोदर शिवसेना, मग राष्ट्रवादी आणि आता पुन्हा शिवसेना असा प्रवास केलाय. त्यानंतर आता एकाच वेळी निवृत्तीचे संकेत, शरद पवारांची आठवण आणि विरोधी पक्ष नेते पदाची इच्छा उफाळून आल्याचे चित्र आहे. आता पवारांच्या आठवणीने येणारे या राजकीय उचक्या ठाकरेंना भेटल्यानंतर थांबणार की आणखी वाढणार? याचीच आता उत्सुकता आहे.
All Shows




























