एक्स्प्लोर

AI Voice Scam: 47 टक्के भारतीयांना AI Voice Scam चा अनुभव, अहवालातून माहिती समोर

AI Voice Scam: सध्या एखादी गोष्ट टाईप करुन पाठवण्यापेक्षा त्याची व्हॉईस नोट पाठवणे जास्त सोईस्कर होते. परंतु यामुळे AI Voice Scam होत असल्यांच पाहायला मिळत आहे.

AI Voice Scam: आपण सर्वांनी कधीतरी स्वत:च्या बाबतीत किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत खोटे फोन करुन किंवा खोटे मेसेज करुन फसवले गेल्याचं अनुभवलं आहे. हा सायबर गुन्ह्याचाच एक प्रकार आहे. परंतु आता आवाज बदलून हे खोटे मेसेज आणि फोन येत असल्याचं आता समोर येत आहे. याला AI व्हॉईस स्कॅम असं म्हणतात.  याच संबंधीचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालातून किती टक्के भारतीय या स्कॅमचे बळी पडत आहेत हे देखील समोर आलं आहे. 

मॅकॅफीने केलेल्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की सुमारे 47 टक्के भारतीयांनी AI व्हॉईस स्कॅमचा अनुभव घेतला आहे. या अहवलात असे देखील नमूद करण्यात आले आहे की, 83 टक्के भारतीय नागरिकांचे या AI व्हॉईस स्कॅममुळे  आर्थिक नुकसान झाले आहे. जवळपास 48 टक्के लोकांना 50,000 रुपयांपेक्षा जास्त नुकसान केले आहे. 

या अहवालातून हे स्पष्ट होते की प्रत्येकाचा आवाज वेगळा आहे. परंतु 86 टक्के भारतीयांनी त्यांचा व्हॉईस डेटा ऑनलाइन किंवा रेकॉर्ड केलेल्या नोट्समध्ये आठवड्यातून किमान एकदा सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे, कोणाचा आवाज कसा येतो याचे क्लोनिंग करणे हा आता सायबर गुन्हेगारीचे महत्त्वपूर्ण शस्र ठरत आहे. 

काय आहे AI व्हॉईस स्कॅम

AI व्हॉईस स्कॅम म्हणजे आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचा आवाज वापरुन आपल्याला फोन येतो. आपल्या जवळच्या व्यक्तीचा फोन असल्याने त्या फोनला उत्तर देतो. पण हा प्रकार सायबर गुन्ह्याचाच एक प्रकार आहे. खोटे मेसेज किंवा फोन करुन तर फसवले जातेच पण त्यात आवाज हा आपल्या ओळखीचा असतो. 

मॅकॅफीच्या अहवालातून असे समोर आले की, स्कॅमर आवाजात बदल करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. त्यानंतर बनावट व्हॉइसमेल किंवा व्हॉईस नोट पाठवतात. त्यामुळे  69 टक्के भारतीयांचे असे म्हणणे आहे की त्यांना हा बदल केलेला आवाज ओळखता येत नाही. त्यामुळे या गोष्टीचा वापर दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसून येत आहे. 

तसेच 66 टक्के भारतीयांचं असं म्हणणं आहे की, ते या बनावट आवाजाच्या फोनला उत्तर देखील देतात. त्यांना असे वाटते की त्यांच्या जवळच्या व्यक्तीला पैशांची गरज आहे, त्यामुळे लोक या बनावट आवाजावर विश्वास ठेवून त्याला बळी पडतात. 

या अहवालानुसार, खोटे मेसेज येण्याचे प्रमाण हे 70 टक्के आहे. तर, खोट्या अपघातांची बातमी, माहिती देणाऱ्या फोनचे प्रमाण 69 टक्के, फोन किंवा पाकीट हरवल्याची माहिती देणारे फोन 65 टक्के आणि तुम्हाला परदेशी जाण्यासाठी येणाऱ्या फोनचे प्रमाण 62 टक्के असल्याचं समोर आलं आहे. 

या सर्वेक्षणात असेही आढळून आले आहे की,  खोट्या आणि चुकीच्या माहितीचे प्रमाण वाढल्याने लोक ऑनलाइन जे पाहतात त्याबद्दल अधिक सावध झाले आहेत.  27 टक्के भारतीयांनी असे म्हटले आहे की, त्यांचा सोशल मीडियावर पूर्वीपेक्षा कमी विश्वास आहे. तर 43 टक्के भारतीयांना होणाऱ्या स्कॅमबद्दल चिंता वाटत असल्याचं म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या: 

भारतात नव्या विचारांची सुरुवात, प्री वेडिंग किंवा पोस्ट वेडिंग नाही तर घटस्फोटाचे फोटोशूट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Meta Subscription Plans: मेटाचा मोठा निर्णय! आता Instagram, Facebook वापरायचं तर पैसे मोजावे लागणार? नव्या प्लान्सची जोरदार चर्चा
मेटाचा मोठा निर्णय! आता Instagram, Facebook वापरायचं तर पैसे मोजावे लागणार? नव्या प्लान्सची जोरदार चर्चा
Artificial intelligence : AI, डिजिटल नवोपक्रम आणि सायबर सुरक्षेत महाराष्ट्र देशात आघाडीवर : ब्रिजेश सिंह 
AI, डिजिटल नवोपक्रम आणि सायबर सुरक्षेत महाराष्ट्र देशात आघाडीवर : ब्रिजेश सिंह 
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
Mobile Charger : सॉकेटमध्ये लावलेल्या मोबाईल चार्जरमुळे वीज बिल जास्त येतं का? सुरक्षा जोखीम काय? 
सॉकेटमध्ये लावलेल्या मोबाईल चार्जरमुळे वीज बिल जास्त येतं का? सुरक्षा जोखीम काय? 

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Embed widget