![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Rohit Sharma : सतरा वर्ष झाली अजून कधीपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार, रोहित शर्मानं दिली मोठी अपडेट
Rohit Sharma : रोहित शर्मानं एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत 17 वर्षांच्या प्रवासाबद्दल भाष्य केलं. 17 वर्षातील अभिमान्सपद क्षण कोणता हे देखील त्यानं सांगितलं.
![Rohit Sharma : सतरा वर्ष झाली अजून कधीपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार, रोहित शर्मानं दिली मोठी अपडेट Rohit Sharma said The 17 years journey has been wonderful still hope to play a few more years in World cricket marathi News Rohit Sharma : सतरा वर्ष झाली अजून कधीपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार, रोहित शर्मानं दिली मोठी अपडेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/15/4213057be838b81e9fd64f2058ec86bf1715761478558989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली: टीम इंडियाचा कॅप्टन आणि मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) यानं दुबई आय 103.8 या यूट्यूब चॅनेलसोबत संवाद साधला. यावेळी त्यानं विविध विषयांवर भाष्य केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गेल्या 17 वर्षांपासून खेळतोय. तुम्ही ज्या ठिकाणी खेळताय तिथून ते उच्च स्थानापर्यंत पोहोचणं सोपं नाही. 141 कोटी लोकसंख्येच्या देशातून येतो तिथं 15 खेळाडूंमध्ये निवड होणं सोपं नाही. तुमचं कठोर परिश्रम महत्त्वाचं आहे पण त्यासोबत नशिबाची साथ देखील महत्त्वाची आहे, असं रोहित शर्मा म्हणाला. मला वेळोवेळी नशिबाची साथ मिळत गेली, असं रोहित शर्मा म्हणाला.
रोहित पुढं म्हणाला, कारकिर्दीत चढ उतार पाहिले. क्रिकेट कारकिर्दीत अनेकदा कठीण काळ पाहिला. जेव्हा करिअर सुरु केलं तेव्हा संघात माझा सकारात्मक इम्पॅक्ट नव्हता. तो कठीण काळ होता.मी काय करु शकतो हे याचा विचार केला, असं रोहित शर्मा म्हणाला. सतरा वर्षांपासून क्रिकेट खेळतोय आणि काही वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.
संघातील खेळाडूंसमोर टीम इंडियाची कॅप मिळणं हा अभिमानास्पद होतं. लहान असताना जे परिश्रम केलं त्याचं फळ होतं. वयाच्या विसाव्या वर्षी ती कॅप मिळाली होती. त्यावेळी सतरा वर्षानंतर इथेच असेल असा विचार त्यावेळी केला नव्हता, असं रोहित शर्मा म्हणाला.
मोठी ध्येय न ठेवता छोटी छोटी ध्येय ठेवली याचा जीवनात फायदा झाला, असं रोहित शर्मा म्हणाला. पुढील पाच वर्षात काय घडणार यापेक्षा तुमच्यापुढं महिनभरात किंवा दोन महिन्यात जे समोर येणार आहे, त्याचा विचार केला पाहिजे, असं रोहित शर्मानं म्हटलं.
रोहित कॅप्टनपदाबाबत काय म्हणाला ?
तुम्ही तुमच्या देशाचं नेतृत्त्व करता यापेक्षा मोठा सन्मान नसतो. मी कॅप्टनसी करेल असाही एक दिवस येईल असा विचार केला नव्हता. पण, चांगल्या गोष्टी चांगल्या लोकाबाबत घडत असतात, असं रोहित शर्मानं म्हटलं. मला यापूर्वीचे भारतीय क्रिकेट संघाचे महान कॅप्टन खेळाडू माहिती होते. त्यांनी जो वारसा जपला होता तो पुढं नेण्याचं काम करायचं होतं. सध्या डाटा हा विरोधी संघासोबत तुमच्या स्वत:च्या कामगिरीचं विश्लेषण करण्यासाठी देखील महत्त्वाचं ठरतोय, असं रोहित शर्मा म्हणाला. सर्वांना एका दिशेनं घेऊन जायचा प्रयत्न असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.
मी दबावाला सकारात्मक पद्धतीनं घेतो. जोपर्यंत तुम्ही दबाव घेत नाही तोपर्यंत तुमचं खरं रुप समोर येत नाही. छोटी छोटी ध्येय मिळवत जाणं महत्त्वाचं आहे. दबाव नसल्यास तुम्ही तुमच्याकडे असणारी क्षमता समोर येत नाही, असं रोहित शर्मा म्हणाला.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)