एक्स्प्लोर

Year Ender 2022: वर्ल्डकप गमावला पण विराटचा फॉर्म परतला, कसोटी, वनडेपासून ते टी-20 क्रिकेटपर्यंत, टीम इंडियासाठी कसं होतं 2022?

Year Ender 2022: बांगलादेश दोऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं (Team India) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिळवला.

Year Ender 2022: बांगलादेश दोऱ्यावर गेलेल्या भारतीय संघानं (Team India) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिळवला. भारतानं ढाकाच्या शेरे नॅशनल स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या अखरेच्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पराभव करत यंदाच्या वर्षाचा शेवट गोड केला. दरम्यान, गतवर्षीप्रमाणे यावर्षीही भारतानं अनेक मालिका खेळल्या आहेत. ज्यात कसोटी आणि एकदिवसीय आणि टी-20 मालिकांचा समावेश आहे. भारताच्या ओवरऑल परफॉर्मंसवर नजर टाकली असता, यंदाच्या वर्षी संघानं तिन्ही फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यावर्षी मैदानात उतरला. भारतानं यावर्षी एकूण सात कसोटी सामने खेळले. यातील चार सामन्यात भारतानं विजय मिळवला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतानं 24 पैकी 14 सामने जिंकले आहेत. तर, टी-20 क्रिकेटमध्ये 40 पैकी 28 सामन्यात भारतानं बाजी मारलीय. 

महत्वाच्या सामन्यात पराभव
भारताची यावर्षीची कामगिरी चांगली असली तरी, त्यांना अनेक महत्वाच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकात भारतानं दमदार कामगिरी केली. परंत, सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून 10 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. 

भारतीय खेळाडूंची दुखापतींशी झुंज
या वर्षी भारतीय संघाची सर्वात मोठी समस्या दुखापत ठरली. भारताचे अनेक मोठे खेळाडू दुखापतीमुळं बाहेर संघाबाहेर झाले. दुखपतींमुळं संबंधित खेळाडूला मोठ्या सामन्याला मुकावं लागलं. परिणामी भारताला अनेक सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली होती. ज्यामुळं या मालिकेत भारताचा सलामीवीर केएल राहुलकडं भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. 

दुखापतग्रस्त खेळाडू
या वर्षी भारतीय संघातील दुखापतग्रस्त खेळाडूंच्या यादीवर नजर टाकली तर त्यात मोठ्या आणि आघाडीच्या खेळाडूंची नावे आहेत. ज्यात जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान रोहितला दुखापत झाली होती. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. याच कारणामुळे तो बांगलादेश दौरा पूर्ण न करताच भारतात परतला.

सलग 18वी कसोटी मालिका जिंकली
ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं बांगलादेशचा तीन विकेट्स राखून पराभव करत मालिका 2-0 अशी जिंकली. या सामन्यात आर अश्विन आणि श्रेयस अय्यरच्या संयमी खेळीमुळे भारतानं बांगलादेशच्या मुठीतून विजय हिसकावून घेत सामना आणि मालिका जिंकली आहे. विशेष म्हणजे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील या विजयानंतर भारतानं एक मोठा विक्रम केला आहे. भारतानं या विजयासोबत आशियामध्ये सलग 18वी कसोटी मालिका जिंकली आहे.

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : पहिला पराभव कॅप्टन श्रेयस अय्यरच्या जिव्हारी लागला! खेळाडूंना थेट वॉर्निंग देत म्हणाला, ते खपवून घेणार नाही...
पहिला पराभव कॅप्टन श्रेयस अय्यरच्या जिव्हारी लागला! खेळाडूंना थेट वॉर्निंग देत म्हणाला, ते खपवून घेणार नाही...
IND vs IRE 1st T20 : सूर्याला बाहेर बसवून श्रेयस अय्यरला किंग बनवायला गेले, पण पहिल्याच मॅचमध्ये घात झाला! 7 चेंडूंत नेमकं काय घडलं? बीसीसीआयचे धाबे दणाणले
सूर्याला बाहेर बसवून श्रेयस अय्यरला किंग बनवायला गेले, पण पहिल्याच मॅचमध्ये घात झाला! 7 चेंडूंत नेमकं काय घडलं? बीसीसीआयचे धाबे दणाणले
IND vs IRE 1st T20 : टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील मोठा उलटफेर, आयर्लंडकडून भारताचा पहिलावहिला पराभव, श्रेयस अय्यरच्या नावावर लागला कधीही न पुसणारा डाग
टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील मोठा उलटफेर, आयर्लंडकडून भारताचा पहिलावहिला पराभव, श्रेयस अय्यरच्या नावावर लागला कधीही न पुसणारा डाग
Ind vs Ire 1st T20 Live Update : भारताचा 148 वर 'ऑल आऊट': आयर्लंडचा 34 धावांनी विजयी, टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या
Ind vs Ire Live Update : भारताचा 148 वर 'ऑल आऊट': आयर्लंडचा 34 धावांनी विजयी, टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Lohagad : पहिली पायरी ते मृत्यूची दरी; कसा केला घात? Special Report
Zero Hour : प्रेयसी ठरली भावी पतीची मारेकरी, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Ram Temple Donation Row Theft : रामलल्लाचे गुन्हेगार, ८ जण गजाआड Special Report
Medha Kulkarni vs Abhimanyu Pawar Pune : जागेवरून वादंग जातीय रंग! Special Report
Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain Updates: राज्यातील 15 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट; मुंबई, रत्नागिरी, पुणे, सोलापूरमध्ये मुसळधार, पावसाचे A टू Z अपडेट्स
राज्यातील 15 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट; मुंबई, रत्नागिरी, पुणे, सोलापूरमध्ये मुसळधार, पावसाचे A टू Z अपडेट्स
Donald Trump : इराणचा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजावर 4 ड्रोनद्वारे हल्ला, डोनाल्ड ट्रम्प भडकले
होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणचा जहाजावर ड्रोन हल्ला, डोनाल्ड ट्रम्प भडकले
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
Uddhav Thackeray : दोन चार गद्दार फोडल्यानं शिवसेना संपत नसते, कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या, तरी शिवसेना संपवू शकत नाही : उद्धव ठाकरे
कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या, तरी शिवसेना संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंचा नागपूरमधून थेट इशारा
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
अग्निवीर परीक्षेच्या भरतीची अफवा; बेळगावला पोहोचलेल्या उमेदवारांना आर्थिक भुर्दंड, फुकटचा मनस्ताप
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Embed widget