एक्स्प्लोर

Shahid Afridi on MS Dhoni:'धोनीमुळं भारत-पाकिस्तान यांच्यातील वाद...' शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्यानं वेधलं सर्वांचं लक्ष 

आगामी टी-20 विश्वचषक सुरु होण्यासाठी फक्त सात दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, 16 ऑक्टोबरपासून होणाऱ्या आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेतील रोमांच पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये चांगली उस्तुकता पाहायला मिळत आहे.

T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषक सुरु होण्यासाठी फक्त सात दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, 16 ऑक्टोबरपासून होणाऱ्या आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेतील रोमांच पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये चांगली उस्तुकता पाहायला मिळत आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी क्रिकेट तज्ज्ञांनी आपली मतं मांडण्यास सुरुवात केली आहे. यातच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या (Shahid Afrid) वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखाली भारतीय संघानं पाकिस्तानच्या संघाला पूर्णपणे बाजूला केलं होतं, असं त्यानं म्हटलंय.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीनं एका मुलाखतीत असं म्हटलंय की, "भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वामुळं भारतीय संघाचा दृष्टीकोन बदलला आहे. धोनीनं भारत आणि पाकिस्तानमधील वाद पूर्णपणे संपवला होता." पुढं शाहिद आफ्रिदी असंही म्हणाला की, धोनीच्या नेतृत्वात भारतानं सातत्यानं विजय मिळवण्यास सुरुवात केली. त्याच्यामुळं भारतीय संघाच्या विचारसरणीत बदल झाला. भारतानं ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेला हरवायला सुरुवात केली. त्यांच्याशीच भारतीय संघ स्पर्धा करू लागला. त्यांनी पाकिस्तानला पूर्णपणे बाजुला ठेवलं होतं. आता गोष्टी बदलत आहेत."

पाकिस्ताननं पहिल्यांदाच भारताला विश्वचषक स्पर्धेत हरवलं
दरम्यान, पाकिस्तानच्या संघानं गेल्या वर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकात भारताचा 10 विकेट्स राखून पराभव केला होता. क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानच्या संघानं पहिल्यांदाचं भारताला टी-20 विश्वचषक स्पर्धेत पराभूत केलं. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतानं सामना गमावला. यावेळी भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या हाती आहे. आगामी टी-20 विश्वचषकात भारतीय संघ त्यांच्या पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी 23 ऑक्टोबरला भिडणार आहे.  मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्याकडं दोन्ही देशांतील प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
राखीव खेळाडू- मोहम्मद शामी, श्रेयस अय्यर, दीपक चाहर, रवि बिश्नोई.

टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ:
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफरीदी, शान मसूद, उस्मान कादिर.
राखीव खेळाडू- मोहम्मद हारिस, फखर जमां, शाहनवाज दहानी.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test : पहिली कसोटी पावसाने घातला घोळ; सामना ड्रॉ झाला तर टीम इंडिया WTC च्या शर्यतीतून OUT?, जाणून घ्या फायनलचं समीकरण
पहिली कसोटी पावसाने घातला घोळ; सामना ड्रॉ झाला तर टीम इंडिया WTC च्या शर्यतीतून OUT?, जाणून घ्या फायनलचं समीकरण
ODI World Cup 2027 : क्रिकेट वर्ल्डकपसाठी ICCचा मास्टरप्लॅन; महात्मा गांधींना अशी देणार अनोखी श्रद्धांजली? जय शाह मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
क्रिकेट वर्ल्डकपसाठी ICCचा मास्टरप्लॅन; महात्मा गांधींना अशी देणार अनोखी श्रद्धांजली? जय शाह मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
IND vs SL 1st Test DAY-2 Live : गॉलमध्ये आभाळ फाटलं, भारत-श्रीलंका कसोटीला ब्रेक! दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र पावसाने धुतलं, मॅच कधी होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट्स
गॉलमध्ये आभाळ फाटलं, भारत-श्रीलंका कसोटीला ब्रेक! दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र पावसाने धुतलं, मॅच कधी होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट्स
AUS vs BAN 1st Test : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी उलथापालथ! नंबर-1 ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने अस्मान दाखवलं, WTC Points Table मध्येही बदल, टीम इंडिया कितव्या स्थानी?
क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी उलथापालथ! नंबर-1 ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने अस्मान दाखवलं, WTC Points Table मध्येही बदल, टीम इंडिया कितव्या स्थानी?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Embed widget