एक्स्प्लोर

IND vs SL : यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं, गेलेली मॅच खेचून आणली, सुपर ओव्हरमध्ये भारतानं श्रीलंकेला लोळवलं

Team India : भारतानं सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेला पराभूत करत मालिका 3-0 अशी जिंकली. सूर्य कुमारच्या सुपर कॅप्टनसीनं भारताला विजय मिळूवन दिला.

पल्लेकेले:  भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरी मॅच पार पडली. भारतानं सुपर ओव्हरमध्ये मॅच खेचून नेत विजय मिळवला. या सामन्यात  भारतानं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 9 विकेटवर 137 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेनं 20 ओव्हरमध्ये 8 बाद 137 धावा केल्या. यामुळं मॅच सुपर ओव्हरपर्यंत गेली. श्रीलंकेला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 9 धावांची गरज असताना त्यांनी 4 विकेट गमावत 8  धावा केल्या. यामुळं मॅच ड्रॉ झाली. भारताकडून अखेरच्या दोन ओव्हर रिंकू सिंग (Rinku Singh) आणि सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) टाकल्या. या दोन्ही ओव्हरमध्ये दोघांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. आणि मॅच सुपर ओव्हरमध्ये पोहोचली.

सुपर ओव्हरचा थरार 

सुपर ओव्हरमध्ये  श्रीलंकेकडून कुशल मेंडिस आणि  कुशल परेरा फलंदाजीसाठी आले होते. भारताकडून गोलंदाजीसाठी वॉशिंग्टन सुंदरवर जबाबदारी  सोपवण्यात आली. सुंदरनं पहिला बॉल वाईड टाकला. कुशल मेंडिसनं पुढच्या बॉलवर एक रन दिली. यानंतर दुसऱ्या बॉलवर कुशल परेरा 1 रन करुन बाद झाला.  परेराचा कॅच रवि बिश्नोईनं घेतला.  यानंतर निसांका फलंदाजीसाठी आला त्यानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला.  वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलिंगवर रिंकू सिंगनं कॅच घेतला. यामुळं श्रीलंका 2 धावांवर बाद झाली. वॉशिंग्टन सुंदरनं सूर्यकुमार यादवनं सोपवलेली जबाबदारी पार पाडली.

यानंतर  सुपर ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी तीन धावांची गरज होती. सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी तीन धावांची गरज असताना कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि उपकॅप्टन शुभमन गिल फलंदाजीसाठी हे दोघे फलंदाजीसाठी आले. सूर्यकुमार यादवनं पहिल्याच बॉलवर चौकार मारला आणि संघाला विजय मिळवून दिला.  

सूर्यकुमार यादवचे तीन निर्णय गेमचेंजर ठरले

खलील अहमदनं 18 व्या ओव्हरमध्ये 12  धावा दिल्यानंतर श्रीलंकेला विजयासाठी 9 धावांची गरज होती. सूर्यकुमार यादवनं यावेळी रिंकू सिंगला गोलंदाजी दिली. त्यानं कुशल परेराला 46 धावांवर बाद केलं. यानंतर श्रीलंकेला शेवटच्या ओव्हरमध्ये 6  धावांची गरज होती. त्यावेळी सर्वांना वाटत होतं मोहम्मद सिराजनं गोलंदाजी करावी असं वाटत होतं. मात्र, कॅप्टन सूर्यकुमार यादवनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवनं 5  धावा देत दोन विकेट घेतल्या. यामुळं मॅच ड्रॉ झाली. यानंतर सूर्यकुमार यादवनं सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी वॉशिंग्टन सुंदरला दिली. त्यानं केवळ दोन विकेट घेतल्या आणि भारताचा विजय सोपा झाला. सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल हे दोघे फलंदाजीला आले. यानंतर सूर्यानं विजयी चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. 

दरम्यान, शुभमन गिल(Shubman Gill), रियान पराग (Riyan Parag) आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या खेळीच्या जोरावर भारतानं 137 धावा केल्या. या विजयासह भारतानं मालिका 3-0 अशी जिंकली. 

संबंधित बातम्या :

रिंकू सिंग- सूर्यकुमार यादवनं गेलेली मॅच खेचून आणली, अखेर मॅच ड्रा, सुपर ओव्हरचा थरार रंगणार

Suryakumar Yadav :टी 20 मालिका संपताच हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादवसह आणखी चार खेळाडू भारतात परतणार, कारण...

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार

व्हिडीओ

Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Embed widget