एक्स्प्लोर

IND vs BAN : बांग्लादेशला क्लिन स्विप देत टीम इंडियानं रचला इतिहास, आशियामध्ये सलग 18 वा कसोटी मालिका विजय

IND vs BAN : बांगलादेश दौऱ्यात भारताने दोन्ही कसोटी सामने जिंकत मालिका 2-0 ने जिंकली आहे. या विजयासोबत भारताने ऐतिरहासिक कामगिरी केली आहे.

Team India Win : ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा (IND vs BAN) तीन गडी राखून पराभव करत मालिका 2-0 अशी जिंकली. या सामन्यात आर अश्विन (R Ashwin) आणि श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) संयमी खेळीमुळे टीम इंडियाने बांगलादेशच्या मुठीतून विजय हिसकावून घेत सामना आणि मालिका जिंकली आहे. विशेष म्हणजे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील (India vs Bangladesh test Series) या विजयानंतर टीम इंडियाने (Team India) एक मोठा विक्रम केला आहे. भारताने या विजयासोबत आशियामध्ये सलग 18 वी कसोटी मालिका जिंकली आहे.

आशियामध्ये सलग 18 वा कसोटी मालिका विजय

बांगलादेशला कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत करण्यासोबतच भारतीय संघाने आशिया खंडात सलग 18व्या कसोटी मालिकेत विजयाची नोंद केली आहे. 2012-13 मध्ये भारताला आशियामध्ये इंग्लंडकडून (IND vs ENG Test) शेवटचा पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी टीम इंडियाला देशांतर्गत कसोटी मालिकेत 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हापासून टीम इंडियाने आशियामध्ये चमकदार कामगिरी केली आहे आणि सलग 18 व्या मालिका विजयाची नोंद करण्यात यश मिळवले आहे.

विशेष म्हणजे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यातील विजयासह भारताने 2000 सालापासून आतापर्यंतचा मोठा विक्रम कायम ठेवला आहे. टीम इंडियाने आजपर्यंत बांगलादेशविरुद्ध एकही कसोटी सामना गमावलेला नाही. 2015 मध्ये बांगलादेशला भारतासोबतचा सामना ड्रॉ करण्यात यश आले होते, मात्र या सामन्यात भारताचा पराभव झाला नव्हता. दुसरीकडे, गेल्या 13 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाने 11 सामने जिंकले आहेत, तर दोन संघांमधील दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.

कसोटी मालिका 2-0 ने जिंकली

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकत भारताने क्लिन स्वीप दिला आहे. यावेएळी पहिला कसोटी सामना चितगाव येथे खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने यजमान बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. तर दुसरा सामना फारच अटीतटीचा झाला. भारताला शेवटच्या डावात 145 धावांचे माफक लक्ष्य असतानाही 7 गडी गमावून भारत जिंकला आणि तीन विकेट्च्या फरकाने सामना जिंकत भारताने मालिका जिंकली.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
Mahavikas Aghadi Joint Press Conference : महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
Shantigiri Maharaj : 'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J P Nadda On Rss : आता भाजप सक्षम, जेपी नड्डा यांचं RSS वर मोठं वक्तव्य ABP MajhaABP Majha Headlines : 10 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 18 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09.00 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
मुंबईला तीन वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं दरवर्षी बाष्पीभवन, जलसंपदा विभागाच्या अहवालातील धक्कादायक आकडेवारी
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
आत्तापर्यंत किती कोटी मतदारांनी बजावला हक्क, चार टप्प्यात देशात किती टक्के झालं मतदान? 
Mahavikas Aghadi Joint Press Conference : महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
महाराष्ट्रात 48 पैकी 46 जागा आम्ही जिंकू अशी महाविकास आघाडीची हवा; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
Shantigiri Maharaj : 'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
'भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हाला पाठिंबा', शांतीगिरी महाराजांच्या दाव्याने खळबळ
Kolhapur Crime : भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
Virat Kohli Anushka Sharma : दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
Embed widget