तेव्हा साखरपुड्याबाबत सर्वांना सांगेन : विराट कोहली
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 30 Dec 2016 11:17 AM (IST)
1/6
विराट म्हणाला, “आमचा साखरपुडा ठरलेला नाही, जेव्हा ठरेल तेव्हा आम्ही लपवणार नाही. काही न्यूज चॅनेलवर आमच्या साखरपुड्याबाबत चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत. त्यामुळे हा गोंधळ दूर करुन त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न मी करत आहे”
2/6
मात्र आता स्वत: विराटने ट्विटरवरुन याबाबत स्पष्टीकरण दिलं.
3/6
विराट आणि अनुष्का बुधवारी रात्री हरिद्वारमध्ये आपल्या गुरुचा आशिर्वाद घेताना दिसले. त्यानंतरच त्यांच्या साखरपुड्याबाबतच्या चर्चांना उधाण आलं.
4/6
अजून आमचा साखरपुडा ठरला नाही, जेव्हा ठरेल तेव्हा कोणापासूनही लपवणार नाही, सर्वांना सांगू असं विराट कोहलीने म्हटलं आहे.
5/6
टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे नववर्षात साखरपुडा करणार असल्याची बातमी कालच आली. मात्र त्याबाबत स्वत: विराट कोहलीनेच प्रतिक्रिया दिली आहे.
6/6
बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि उद्योगपती अनिल अंबानी यांसारखे पाहुणे उत्तराखंडमध्ये पोहोचल्याने, विराट-अनुष्काच्या साखरपुड्याबाबतच्या चर्चांनी जोर घेतला.