एक्स्प्लोर

लॉर्डस... बेभान गांगुली अन् ऐतिहासिक विजय!

1/8
आधीच्या मालिकेत ज्या फ्लिंटॉपनं भारतात विजय मिळविल्यावर भर मैदानात टी-शर्ट काढला होता. त्याच्याच ओव्हरमध्ये कैफनं इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला होता. ते देखील तीन चेंडू राखून. हा विजय मिळवताच कर्णधार गांगुली मात्र, आपल्या भावना रोखू शकला नव्हता आणि त्यानं लॉर्डसच्या गॅलरीतच थेट आपला टी-शर्ट काढून गरागरा फिरवला होता. हा सामना चाहत्यांना ज्याप्रमाणे कैफच्या खेळीसाठी लक्षात राहिला त्याचप्रमाणे तो गांगुलीच्या बिनधास्त अॅटिट्यूडसाठीही लक्षात राहिला.
आधीच्या मालिकेत ज्या फ्लिंटॉपनं भारतात विजय मिळविल्यावर भर मैदानात टी-शर्ट काढला होता. त्याच्याच ओव्हरमध्ये कैफनं इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला होता. ते देखील तीन चेंडू राखून. हा विजय मिळवताच कर्णधार गांगुली मात्र, आपल्या भावना रोखू शकला नव्हता आणि त्यानं लॉर्डसच्या गॅलरीतच थेट आपला टी-शर्ट काढून गरागरा फिरवला होता. हा सामना चाहत्यांना ज्याप्रमाणे कैफच्या खेळीसाठी लक्षात राहिला त्याचप्रमाणे तो गांगुलीच्या बिनधास्त अॅटिट्यूडसाठीही लक्षात राहिला.
2/8
त्याचवेळी मोहम्मद कैफनं तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत घेऊन गेली. या सामन्यात बरेच चढ-उतार आले होते.
त्याचवेळी मोहम्मद कैफनं तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन सामना अगदी शेवटच्या षटकापर्यंत घेऊन गेली. या सामन्यात बरेच चढ-उतार आले होते.
3/8
याच वेळी टीम इंडियासाठी दोन तरुण आणि धडाकेबाज खेळाडू धावून आले होते. मोहम्मद कैफ आणि युवराज सिंह. सुरुवातीला संयमी खेळी करत या दोघांनी डावाला पुन्हा आकार दिला. त्यानंतर त्यांनी आक्रमणाला सुरुवात केली. आता टीम इंडिया विजयाच्या समीप पोहचणार असं वाटत असतानाच युवराज कॉलिंगवूडच्या एका चेंडूवर फसला आणि 69 धावांवर बाद झाला. त्यामुळे आता हातातोंडाशी आलेला घास टीम इंडिया गमावणार का असं वाटू लागलं.
याच वेळी टीम इंडियासाठी दोन तरुण आणि धडाकेबाज खेळाडू धावून आले होते. मोहम्मद कैफ आणि युवराज सिंह. सुरुवातीला संयमी खेळी करत या दोघांनी डावाला पुन्हा आकार दिला. त्यानंतर त्यांनी आक्रमणाला सुरुवात केली. आता टीम इंडिया विजयाच्या समीप पोहचणार असं वाटत असतानाच युवराज कॉलिंगवूडच्या एका चेंडूवर फसला आणि 69 धावांवर बाद झाला. त्यामुळे आता हातातोंडाशी आलेला घास टीम इंडिया गमावणार का असं वाटू लागलं.
4/8
106 धावांवर 1 बाद अशी अवस्था असताना 146 धावांवर 5 बाद अशी केविलवाणी अवस्था टीम इंडियाची झाली. गांगुली, सेहवाग, मोंगिया, द्रविड आणि तेंडुलकर यांच्यासारखे दिग्गज फलंदाज तंबूत परतले होते.
106 धावांवर 1 बाद अशी अवस्था असताना 146 धावांवर 5 बाद अशी केविलवाणी अवस्था टीम इंडियाची झाली. गांगुली, सेहवाग, मोंगिया, द्रविड आणि तेंडुलकर यांच्यासारखे दिग्गज फलंदाज तंबूत परतले होते.
5/8
हा सामना जिंकून इंग्लंडला इंग्लंडच्याच धरतीवर लोळवण्याची नामी संधी टीम इंडियाकडे होती. मात्र, त्यासाठी तब्बल 325 धावांचा यशस्वी पाठलाग करणं महत्वाचं होतं. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार अशी ओळख असणाऱ्या सौरभ गांगुलीनंही विजय मिळवायचाच या जिद्दीनं खेळण्यास सुरुवात केली. सेहवाग आणि गांगुलीनं 106 धावांची भागीदारी करुन टीम इंडियाच्या विजयाचा भक्कम पाया रचला. मात्र, गांगुली बाद झाल्यानंतर टीम इंडिया अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू लागली.
हा सामना जिंकून इंग्लंडला इंग्लंडच्याच धरतीवर लोळवण्याची नामी संधी टीम इंडियाकडे होती. मात्र, त्यासाठी तब्बल 325 धावांचा यशस्वी पाठलाग करणं महत्वाचं होतं. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार अशी ओळख असणाऱ्या सौरभ गांगुलीनंही विजय मिळवायचाच या जिद्दीनं खेळण्यास सुरुवात केली. सेहवाग आणि गांगुलीनं 106 धावांची भागीदारी करुन टीम इंडियाच्या विजयाचा भक्कम पाया रचला. मात्र, गांगुली बाद झाल्यानंतर टीम इंडिया अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू लागली.
6/8
क्रिकेटची पंढरी ओळखलं जाणाऱ्या लॉर्डसच्या मैदानावर हा अंतिम सामना होता. नाणेफेक जिंकून इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कर्णधार नासीर हुसैन याने 115 धावांची खणखणीत खेळी केली होती. या सामन्यात इंग्लंडनं तब्बल 325 धावांपर्यंत मजल मारली होती.
क्रिकेटची पंढरी ओळखलं जाणाऱ्या लॉर्डसच्या मैदानावर हा अंतिम सामना होता. नाणेफेक जिंकून इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कर्णधार नासीर हुसैन याने 115 धावांची खणखणीत खेळी केली होती. या सामन्यात इंग्लंडनं तब्बल 325 धावांपर्यंत मजल मारली होती.
7/8
आजच्याच दिवशी म्हणजेच 14 वर्षापूर्वी 13 जुलै 2002 रोजी टीम इंडियानं इंग्लंडला त्यांच्याच धरतीवर धूळ चारली होती. अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या मोहम्मद कैफनं केलेली खेळी चाहत्यांच्या कायम स्मरणात राहिली. संपूर्ण नेटवेस्ट मालिकेत इंग्लडं आणि टीम इंडियामध्ये अटीतटीचे सामने झाले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण क्रिकेट जगाचं लक्ष लागून राहिलं होतं.
आजच्याच दिवशी म्हणजेच 14 वर्षापूर्वी 13 जुलै 2002 रोजी टीम इंडियानं इंग्लंडला त्यांच्याच धरतीवर धूळ चारली होती. अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या मोहम्मद कैफनं केलेली खेळी चाहत्यांच्या कायम स्मरणात राहिली. संपूर्ण नेटवेस्ट मालिकेत इंग्लडं आणि टीम इंडियामध्ये अटीतटीचे सामने झाले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण क्रिकेट जगाचं लक्ष लागून राहिलं होतं.
8/8
क्रिकेटमधील एखादी खेळी देखील एखाद्या खेळाडूचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. अशा काही खेळी आणि असे खेळाडू नेहमीच क्रिेकेट चाहत्यांच्या लक्षात राहतातं. अशीच चौदा वर्षापूर्वीच एक खेळी आजही भारतीय क्रिकेट चाहते आजवर विसरु शकले नाहीत. या विजयानंतर टीम इंडियाचा तत्कालिन कर्णधार सौरभ गांगुली देखील आपला आनंद लपवू शकला नव्हता आणि थेट लॉर्डसच्या गॅलरीमध्येच त्यानं आपलं टी-शर्ट काढून गरागरा फिरवलं होतं.
क्रिकेटमधील एखादी खेळी देखील एखाद्या खेळाडूचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. अशा काही खेळी आणि असे खेळाडू नेहमीच क्रिेकेट चाहत्यांच्या लक्षात राहतातं. अशीच चौदा वर्षापूर्वीच एक खेळी आजही भारतीय क्रिकेट चाहते आजवर विसरु शकले नाहीत. या विजयानंतर टीम इंडियाचा तत्कालिन कर्णधार सौरभ गांगुली देखील आपला आनंद लपवू शकला नव्हता आणि थेट लॉर्डसच्या गॅलरीमध्येच त्यानं आपलं टी-शर्ट काढून गरागरा फिरवलं होतं.
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
Dharmveer Gad : 'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
Dharmveer Gad : 'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
LPG Refill Booking : ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
Radha Patil: नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
Embed widget