एक्स्प्लोर
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी विधानपरिषदेत मांडला टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; अंबादास दानवे म्हणाले, पैसे न वाटता, फेरफार न करता...
Eknath Shinde On Team India: दुबई येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने विजय प्राप्त केला म्हणून आज विधानपरिषदेच्या सभागृहात अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला.
Eknath Shinde
1/9

भारतीय संघाने 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपविला. काल (9 मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव करत भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं.
2/9

रोहित शर्माच्या नेतृत्वात नऊ महिन्यांत भारताचे हे दुसरे आयसीसी जेतेपद आहे. 29 जून 2024 ला भारतीय संघाने आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकला होता.
3/9

दुबई येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने विजय प्राप्त केला म्हणून आज विधानपरिषदेच्या सभागृहात अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला.
4/9

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. यावेळी भारतीयासाठी आनंदाचा क्षण आहे. 12 वर्षानंतर आपल्याला यश मिळाल आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
5/9

दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपद जिंकल्यामुळे हे सभागृहाकडून संपूर्ण भारतीय संघाचं अभिनंदन...असं एकनाथ शिंदे म्हणाले.
6/9

भारतीय संघाचं अभिनंदन, टीम म्हणून काम केलं की दैदीप्यमान यश मिळतं, आम्हीही विधानसभा निवडणुकीत टीम म्हणून काम केलं आणि लँडस्लाईड विजय मिळवला, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.
7/9

एकनाथ शिंदेंच्या या विधानावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील जोरदार बँटिंग केली.
8/9

टीम इंडिया ज्या पद्धतीने खेळली ते अभिमानास्पद आहे, EVM मॅनेज न करता, पैसे न वाटता, फेरफार न करता सर्व सामने जिंकले, असं अंबादास दानवे म्हणाले.
9/9

सर्व खेळाडूंना विधानभवनात बोलावून सत्कार करा, राज्याची आर्थिक स्थिती चांगली असेल, तर पुन्हा 1-1 कोटीचं बक्षीस जाहीर करा, अशी मागणी देखील अंबादास दानवे यांनी सभागृहात केली.
Published at : 10 Mar 2025 01:10 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























