एक्स्प्लोर
अवकाळी पावसामुळं व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मिरचीला मोठा फटका
नंदुरबार जिल्ह्यातील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
unseasonal rain in Nandurbar (Photo ABP Majha)
1/10

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातही अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेती पिकांना (Agriculture Crop) बसत आहे.
2/10

नंदुरबार जिल्ह्यातील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही या पावसाचा मोठा फटका बसला आहे.
3/10

शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली ओली लाल मिरची वाळवण्यासाठी पथरींवर टाकली जात असते. मात्र, गेल्या चार दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामध्ये 15 हजार क्विंटलपेक्षा अधिक मिरची खराब होण्याची भीती
4/10

व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचेही पंचनामे करुन भरपाई त्यांना द्यावी अशी मागणी नंदुरबार जिल्हा मिरची व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
5/10

देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे.
6/10

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली ओली लाल मिरची पथारींवर वाढण्यासाठी टाकत असतात.
7/10

गेल्या चार दिवसांपासून असलेल्या अवकाळी पावसामुळं मिरची ओली होऊन काळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात मिरची खराबही होत आहे.
8/10

सरकारनं मिरची व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
9/10

पथारीवर टाकलेल्या मिरचीसाठी विमा संरक्षण देण्याची मागणी नंदुरबार जिल्हा मिरची व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रवी कोठारी यांनी केली आहे.
10/10

राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे.
Published at : 19 Mar 2023 10:53 AM (IST)
आणखी पाहा






















