एक्स्प्लोर

Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक

Narendra Modi : महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी राज्यातील भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजप आणि महायुतीनं मिळवलेल्या यशाचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांनी भाजप आणि महायुतीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल राज्यातील जनतेचं ऋण व्यक्त केले आहेत. 

Narendra Modi : नरेंद्र मोदी काय म्हणाले?

महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!  नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपा आणि महायुतीवर विश्वास दाखवल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा ऋणी आहे. आमच्या लोक-केंद्रित विकासाच्या दृष्टीकोनावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. आम्ही राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या ऊर्जेने काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत.​भाजपा आणि महायुतीच्या तळागाळापर्यंत मेहनत घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी कौतुक करतो, असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 

अमित शाह काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील महायुतीला विजयी केल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड पाठिंबा दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार! हा विजय केंद्रातील मोदीजींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार तसेच महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या, समाजातील प्रत्येक वर्गाच्या कल्याणाच्या धोरणाला जनतेने दिलेला आशीर्वादच आहे. या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो, असं अमित शाह यांनी म्हटलं.

अमित शाह यांनी याच वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्र भाजपच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले भाजपाला सर्वाधिक जागा जिंकून देणारे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप महाराष्ट्रच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.

नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये महायुतीचं वर्चस्व

राज्यातील 242 नगरपरिषद आणि 46 नगरपंचायतींमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळालं आहे. भाजप  नगरपालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनं राज्यातील 124 नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. शिवसेनेनं 61 ठिकाणी नगरसेवक निवडून आणले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं  36 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणले आहेत.

महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीची कामगिरी मात्र समाधानकारक झालेली नाही. महाविकास आघाडीत सर्वाधिक नगराध्यक्ष काँग्रेसचे निवडून आले आहेत. काँग्रेसनं 27 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश मिळवलं. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 12 ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत. शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झालेत. इतरांनी 20 नगराध्यक्षपदांवर विजय मिळवला आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget